Friday, 29 April 2022
मराठवाडयात पुढील दोन दिवस कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर हळूहळू कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन दिवस कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर हळूहळू कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. मराठवाडयात दूपारनंतर आकाश अंशत: ढगाळ ते ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 04 ते 10 मे, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा
कमी तर किमान
तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता
आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
काढणीस तयार असलेल्या उन्हाळी सोयाबीन
पिकाची काढणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कमाल तापमानात होत
असलेल्या वाढीमुळे ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. नविन
लागवड केलेलया हंगामी ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत.
फळबागेचे
व्यवस्थापन
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे सध्या
आंबे बहार संत्रा/मोसंबी फळबागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी संत्रा/मोसंबी बागेस पाण्याचा
ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच बागेत 13:00:45 15 ग्रॅम प्रति लिटर पाणी
व जिब्रॅलिक ॲसिड 2 ग्रॅम प्रति 100 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून
संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार
नाही. कमाल तापमानात होत असलेल्या
वाढीमुळे चिकू बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. चिकू बागेत पाणी
व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी
सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे आंबे बहार डाळींब
बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. डाळींब बागेत आवश्यकतेनूसार
पाणी द्यावे. बागेत 13:00:45 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नवीन
लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच
खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही.
भाजीपाला
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे
भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास
आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस
तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज, खरबूज व कांदा पिकाची काढणी सकाळी लवकर करावी.
फुलशेती
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे
फुल पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनुसार
सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी सकाळी लवकर
करावी.
चारा पिके
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे
उन्हाळी चारा पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. उन्हाळी
हंगामासाठी लागवड केलेल्या चारापिकात सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन
करावे.
तुती रेशीम
उद्योग
रेशीम अळीस दुध्या रोग म्हणून विषाणू
जन्य ग्रासरी तर फ्लॅचरी रोग जिवाणू व
विषाणूच्या संयुक्त प्रादूर्भावामुळे होतो. रोगकारक जिवाणू किंवा विषाणू
कीटक संगोपन गृहात हळूहळू बळावतात. पहिल्या दुसऱ्या वर्षात यशस्वी पीके निघाल्यानंतर
संगोपन गृहातील उर्वरीत काडी कचऱ्याची, मृत अळया, प्लास्टीक चंद्रिकेवरील शिल्लक
धागा, वापरात आलेले वर्तमानपत्र इत्यादीची व्यवस्थीत विल्हेवाट लावावी. या वस्तू
निर्जंतूक करून कडक उन्हात वाळवून पून्हा वापरता येतील. 2 टक्के ब्लीचींग पावडर व
0.3 टक्के चुना द्रावणात बूडवून ट्रे, प्लास्टीक जाळया आच्छादन उन्हात
चांगलेवाळवून पुन्हा वापरता येतील, अन्यथा याच वस्तू पासून रोगाचा फैलाव होतो.
उन्हाळयात तापमान 35 अं.ये. च्या वर राहते त्यास 28 सें.ग्रे. ते 30 सें.ग्रे.
च्या दरम्यानच ठेवावे.
पशुधन व्यवस्थापन
जनावरांना सावलीत बांधावे आणि
पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पूरवठा करावा. पशुधनाकडून सकाळी 11 ते दूपारी 4
यादरम्यान काम करून घेऊ नये. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या
छतावर गवताचे आच्छादन करावे. पशुधनाचे शेड पत्र्याचे किंवा सिमेंटचे असल्यास
त्याला पांढरा रंग द्यावा. पशुधनास मूबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त,
खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य द्यावे. तिव्र उष्णतेच्या काळात पशुधनाच्या अंगावर
पाणी शिंपडावे किंवा त्यांना पाणोठ्यावर
न्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे. पशुधनातील उत्पादनवाढीसाठी
त्यांना होणारा गोचीड, गोमाशा, उवा, पिसवा यांचा प्रादूर्भाव कमी करणे आवश्यक आहे.
यासाठी उन्हाळा ऋतूमध्ये कडू निंबाच्या वृक्षाच्या पूर्ण पिकून खाली पडलेल्या
निंबोळ्या गोळा करून सावली मध्ये वाळवून साठवून ठेवाव्यात व दर महिन्यामध्ये एकवेळ
5% निंबोळी अर्क करून पधुधनास
फवारावे.
सामुदायिक विज्ञान
कपडे वाळत घालतांना ते अडकून फाटणार
नाही याची काळजी घ्यावी. कपडे वाळवितांना त्यांच्या घडया संपूर्णपणे उकलवून वाळत
घालावे. कपडे कधीही घडीमध्ये वाळवू नयेत.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 09/2022
- 2023 शुक्रवार, दिनांक – 29.04.2022
Tuesday, 26 April 2022
दिनांक 26 व 27 एप्रिल रोजी लातूर व उस्मानाबाद जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच आज दि. 26 एप्रिल रोजी बीड, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दूपारनंतर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 4 ते 5 दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.सें ने वाढ होण्याची शक्यता आहे. दिनांक 26 व 27 एप्रिल रोजी लातूर व उस्मानाबाद जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच आज दि. 26 एप्रिल रोजी बीड, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दूपारनंतर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
विस्तारीत
अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 01 मे ते 07 मे, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस
तयार असलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी. उशीरा लागवड केलेल्या उन्हाळी
भुईमूग पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. पिकाच्या आवश्यकतेनुसार
व उपलब्धेनुसार पिकाला सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट,
वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता असल्यामुळे काढणी केलेल्या उन्हाळी भूईमूग पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक
करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
नवीन लागवड केलेल्या व लहान
झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी यामुळे कलमांची मार होणार नाही
तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. केळी
बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची
काळजी घ्यावी. केळी बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी
व्यवस्थापन करावे. वादळी वारा, मेघगर्जना,
विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता असल्यामुळे नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना आधार द्यावा. काढणीस तयार
असलेल्या आंबा फळांची काढणी करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या आंबा बागेला
पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी
घ्यावी. आंबा बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी
व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी
सावली करावी तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन
करावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा
कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता असल्यामुळे नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना आधार द्यावा तसेच काढणी
केलेल्या आंबा फळांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. द्राक्ष बागेमध्ये एप्रिल छाटणी ही घड
निर्मितीसाठी केली जाते. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणी 15 मे पर्यंत करता येते. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट,
वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता असल्यामुळे नवीन लागवड केलेल्या व लहान द्राक्ष वेलींना आधार द्यावा. नविन
लागवड केलेल्या सीताफळ बागेला पाण्याचा
ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. सीताफळ बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने
सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान
झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट,
वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता असल्यामुळे नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना आधार द्यावा.
भाजीपाला
भाजीपाला पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. भाजीपाला पिकात सुष्म सिंचन पद्धतीने सकाळी
लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला,
टरबूज, खरबूज, कांदे पिकाची सकाळी लवकर काढणी करून घ्यावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा
वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज, खरबूज पिकाची लवकरात
लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान झाडांना आधार
द्यावा. काढणी केलेल्या कांदा पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
फुलशेती
फुल पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. फुल पिकात
सुष्म सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस
तयार असलेल्या फुलांची सकाळी लवकर काढणी करून घ्यावी.
पशुधन
व्यवस्थापन
जनावरांना सावलीत बांधावे आणि
पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पूरवठा करावा. पशुधनाकडून सकाळी 11 ते दूपारी 4
यादरम्यान काम करून घेऊ नये. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या
छतावर गवताचे आच्छादन करावे. पशुधनाचे शेड पत्र्याचे किंवा सिमेंटचे असल्यास
त्याला पांढरा रंग द्यावा. पशुधनास मूबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त,
खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य द्यावे. तिव्र उष्णतेच्या काळात पशुधनाच्या अंगावर
पाणी शिंपडावे किंवा त्यांना पाणोठ्यावर
न्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे. पशुधनातील उत्पादनवाढीसाठी
त्यांना होणारा गोचीड, गोमाशा, उवा, पिसवा यांचा प्रादूर्भाव कमी करणे आवश्यक आहे.
यासाठी उन्हाळा ऋतूमध्ये कडू निंबाच्या वृक्षाच्या पूर्ण पिकून खाली पडलेल्या
निंबोळ्या गोळा करून सावली मध्ये वाळवून साठवून ठेवाव्यात व दर महिन्यामध्ये एकवेळ
5% निंबोळी अर्क करून पधुधनास
फवारावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40
कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये.
निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास
खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती
अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या
वेळी झाडाच्या आडोशाला थांबु नये.
सामुदायिक विज्ञान
लोकरीच आणि रेशमी कपडयातील पाणी ते
कपडे ठॉवेलमध्ये गुंडाळूनए दाबून काढावे. या कपडयांना पिळू नये त्यामूळे कपडयांचे
तंतू सहजपणे तुटतात.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 8
/ 2022 - 2023 मंगळवार, दिनांक – 26.04.2022
Friday, 22 April 2022
दिनांक 22 एप्रिल रोजी उस्मानाबाद व लातूर जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उस्मानाबाद व लातूर जिल्हयात दिनांक 25 व 26 एप्रिल रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे व त्यानंतर कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 22 एप्रिल रोजी उस्मानाबाद व लातूर जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उस्मानाबाद व लातूर जिल्हयात दिनांक 25 व 26 एप्रिल रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 27 एप्रिल ते 3 मे, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे
तर किमान तापमान
सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
काढणीस तयार असलेल्या उन्हाळी सोयाबीन
पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा
कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते
मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे काढणी केलेल्या उन्हाळी सोयाबीन
पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे ऊस
पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. नविन लागवड केलेलया हंगामी ऊस
पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. हळदीची
काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश
करणे ही कामे करून घ्यावीत. सध्या
हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. वादळी वारा,
मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक
ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे हळदीची उघडयावर
साठवण करू नये.
फळबागेचे व्यवस्थापन
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे
संत्रा/मोसंबी बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. आंबे बहार
संत्रा/मोसंबी फळबागेत पाणी व्यवस्थापन करावे, नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना
उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची
मर होणार नाही. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी
30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या
ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे नवीन लागवड केलेल्या व लहान
झाडांना आधार द्यावा. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे चिकू बागेस
पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. चिकू बागेत पाणी व्यवस्थापन करावे. नवीन
लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच
खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही. वादळी वारा, मेघगर्जना,
विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता असल्यामुळे नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना आधार द्यावा. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे डाळींब
बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. डाळींब बागेत आवश्यकतेनूसार
पाणी द्यावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली
करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही. वादळी वारा, मेघगर्जना,
विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता असल्यामुळे नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना आधार द्यावा.
भाजीपाला
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे
भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास
आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस
तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी सकाळी लवकर करावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा
वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज, खरबूज पिकाची लवकरात
लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान झाडांना आधार
द्यावा. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे
काढणी केलेल्या कांदा पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
फुलशेती
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे
फुल पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनुसार
सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी सकाळी लवकर
करावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40
कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते
मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी
लवकरात लवकर करून घ्यावी.
चारा पिके
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे
उन्हाळी चारा पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. उन्हाळी
हंगामासाठी लागवड केलेल्या चारापिकात सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन
करावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा
कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम
स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणी केलेल्या ज्वारीचा कडबा पावसात
भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण पावसात भिजल्यास त्याची प्रत खालावून
साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत.
तुती रेशीम
उद्योग
रेशीम अळीस दुध्या रोग म्हणून विषाणू
जन्य ग्रासरी तर फ्लॅचरी रोग जिवाणू व
विषाणूच्या संयुक्त प्रादूर्भावामुळे होतो. रोगकारक जिवाणू किंवा विषाणू
कीटक संगोपन गृहात हळूहळू बळावतात. पहिल्या दुसऱ्या वर्षात यशस्वी पीके निघाल्यानंतर
संगोपन गृहातील उर्वरीत काडी कचऱ्याची, मृत अळया, प्लास्टीक चंद्रिकेवरील शिल्लक
धागा, वापरात आलेले वर्तमानपत्र इत्यादीची व्यवस्थीत विल्हेवाट लावावी. या वस्तू
निर्जंतूक करून कडक उन्हात वाळवून पून्हा वापरता येतील. 2 टक्के ब्लीचींग पावडर व
0.3 टक्के चुना द्रावणात बूडवून ट्रे, प्लास्टीक जाळया आच्छादन उन्हात
चांगलेवाळवून पुन्हा वापरता येतील, अन्यथा याच वस्तू पासून रोगाचा फैलाव होतो.
उन्हाळयात तापमान 35 अं.ये. च्या वर राहते त्यास 28 सें.ग्रे. ते 30 सें.ग्रे.
च्या दरम्यानच ठेवावे.
पशुधन व्यवस्थापन
वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट
वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम
स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी
बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा
नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व
पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये. तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबु नये. जनावरांना
सावलीत बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पूरवठा करावा. पशुधनाकडून
सकाळी 11 ते दूपारी 4 यादरम्यान काम करून घेऊ नये. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण
करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे. पशुधनाचे शेड पत्र्याचे किंवा
सिमेंटचे असल्यास त्याला पांढरा रंग द्यावा. पशुधनास मूबलक प्रमाणात हिरवा चारा,
प्रथिनेयूक्त, खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य द्यावे. तिव्र उष्णतेच्या काळात
पशुधनाच्या अंगावर पाणी शिंपडावे किंवा
त्यांना पाणोठ्यावर न्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे.
सामुदायिक विज्ञान
कपडयांचा रंग टिकून राहण्याकरीता कपडे
पाण्यातून खळबळवितांना शेवटच्या पाण्यात मीठ टाकावे. तर रेशमी कपडे खळबळवितांना
लिंबाच्या रसाचा वापर करावा.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 07/2022
- 2023 शुक्रवार, दिनांक – 22.04.2022
Tuesday, 19 April 2022
दिनांक 21 एप्रिल रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 22 एप्रिल रोजी हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात तसेच दिनांक 23 एप्रिल रोजी हिंगोली, परभणी, नांदेड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 22 एप्रिल रोजी परभणी, बीड, औरंगाबाद जिल्हयात तर दिनांक 23 एप्रिल रोजी बीड, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 48 तासात कमाल तापमानात फारशी तफावता जाणवणार नाही त्यानंतर पुढील 3 दिवस कमाल तापमानात 2 ते 3 अं.सें ने घट होण्याची शक्यता आहे. दिनांक 21 एप्रिल रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 22 एप्रिल रोजी हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात तसेच दिनांक 23 एप्रिल रोजी हिंगोली, परभणी, नांदेड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 22 एप्रिल रोजी परभणी, बीड, औरंगाबाद जिल्हयात तर दिनांक 23 एप्रिल रोजी बीड, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय
व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार
पाणी द्यावे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 24 एप्रिल ते 30 एप्रिल, 2022 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा जास्त तर किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा
जास्त तर पाऊस सरासरी एवढा राहण्याची शक्यता
आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
उन्हाळी भुईमूग पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी
घ्यावी. पिकाच्या आवश्यकतेनुसार व उपलब्धेनुसार पिकाला सकाळी लवकर किंवा सायंकाळी
पाणी व्यवस्थापन करावे. उन्हाळी भुईमूग
पिकात आऱ्या सुटु लागल्यास अंतरमशागतीची कामे करू नयेत.
फळबागेचे व्यवस्थापन
नवीन लागवड केलेल्या व लहान
झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी यामुळे कलमांची मार होणार नाही
तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. केळी बागेला पाण्याचा ताण
बसणार नाही याची काळजी घ्यावी. केळी बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा
सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. वादळी
वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते
मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना आधार द्यावा.आंबा बागेला
पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी
घ्यावी. आंबा बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी
व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी
सावली करावी तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन
करावे. आंबा बागेत खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भाव झालेल्या
झाडाच्या जुन्या वाळलेल्या फांद्या कापून टाकाव्यात. मुख्य खोडा लगत भुसा दिसून
आल्यास तारेच्या आकड्याने आतील अळ्या काढून नष्ट कराव्यात व छिदामध्ये
पेट्रोलमध्ये बुडविलेला बोळा किंवा क्लोरोपायरीफॉस द्रावणाचा (2 मिली प्रती लिटर पाणी) बोळा टाकावा व छिद्र शेणाने अथवा मातीने
लिपून घ्यावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30
ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता असल्यामुळे नवीन
लागवड केलेल्या व लहान झाडांना आधार द्यावा. द्राक्ष बागेमध्ये एप्रिल छाटणी ही
घड निर्मितीसाठी केली जाते. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणीची पुर्व तयारी करून घ्यावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी
30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता असल्यामुळे नवीन
लागवड केलेल्या व लहान द्राक्ष वेलींना आधार द्यावा. सीताफळ बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. सीताफळ
बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे.
नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे.सीताफळ बागेत
खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास
याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या जुन्या वाळलेल्या
फांद्या कापून टाकाव्यात. वादळी
वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते
मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना आधार द्यावा.
भाजीपाला
भाजीपाला पिकाला पाण्याचा
ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.
भाजीपाला पिकात सुष्म सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी
व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची सकाळी लवकर काढणी करून
घ्यावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40
कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज, खरबूज पिकाची लवकरात लवकर
काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान झाडांना आधार द्यावा. काढणी केलेल्या कांदा पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
फुलशेती
फुल पिकाला पाण्याचा ताण बसणार
नाही याची काळजी घ्यावी. फुल पिकात सुष्म सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा
सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची सकाळी लवकर काढणी
करून घ्यावी.
पशुधन
व्यवस्थापन
वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30
ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.
पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या
शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू
होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला
थांबु नये.
जनावरांना
सावलीत बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पूरवठा करावा. पशुधनाकडून
सकाळी 11 ते दूपारी 4 यादरम्यान काम करून घेऊ नये. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण
करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे. पशुधनाचे शेड पत्र्याचे किंवा
सिमेंटचे असल्यास त्याला पांढरा रंग द्यावा. पशुधनास मूबलक प्रमाणात हिरवा चारा,
प्रथिनेयूक्त, खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य द्यावे. तिव्र उष्णतेच्या काळात
पशुधनाच्या अंगावर पाणी शिंपडावे किंवा
त्यांना पाणोठ्यावर न्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी
चारावयास सोडावे.
सामुदायिक विज्ञान
कपड्यांवर
गंजाचे डाग पडू नयेत म्हणून ओल्या कपड्यांवर लोखंडी पिन्स, टाचण्या, आकडे लावणे
टाळावे.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 6
/ 2022 - 2023 मंगळवार, दिनांक – 19.04.2022
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तूरळ...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 23 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालन...