हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 13 जून रोजी धाराशिव,
लातूर, बीड जिल्हयात तर दिनांक 14 जून रोजी बीड, छत्रपती संभाजी नगर, परभणी व
जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 ते 60 कि.मी.) राहून मुसळधार पावसाची
शक्यता आहे. दिनांक 13 जून रोजी परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजी नगर, जालना
जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 14 जून रोजी
हिंगोली व नांदेड जिल्हयात काही ठिकाणी तर दिनांक 15 जून रोजी नांदेड,
हिंगोली व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक
(ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते
मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 14 जून रोजी लातूर व धाराशिव
जिल्हयात तर दिनांक 17 जून रोजी नांदेड जिल्हयात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना,
वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40
कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच
दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात
पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही तर पुढील दोन ते
तीन दिवसात किमान तापमानात 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 13 ते 19 जून 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा
कमी व किमान तापमान सरासरीएवढे व दिनांक 20 ते 26 जून 2025
दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा
कमी राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडयात ज्या तालूक्यात पेरणी
योग्य पाऊस (75-100 मिमी) झाला आहे (बीड : वडवणी ; लातूर : चाकूर ; धाराशिव : तूळजापूर, उमरगा, लोहारा ; नांदेड : बिलोली,कंधार, लोहा, देगलूर, किनवट) या जिल्हयातील
तालूक्यात वापसा असतांना पेरणी करण्यास हरकत नाही. इतर तालूक्यायत शेतकरी
बांधवांनी पेरणीची घाई करू नये पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतरच पेरणी
करावी.
संदेश : शेतकरी बांधवांनी
पेरणीची घाई करू नये. पेरणीयोग्य
पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतरच पेरणी करावी, पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास
बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीनची पेरणी 45X5 सें.मी.
अंतरावर व 2.5 ते 3.0 सें.मी. खोलीवर करता येते. सोयाबीन पेरणीसाठी हेक्टरी 65
किलो बियाणे वापरावे. सोयाबीन बियाण्यास पेरणीपूर्वी कार्बोक्झिन 37.5 % + थायरम 37.5
% (मिश्र घटक)
या बुरशीनाशकाची 3 ग्रॅम किंवा ॲझोक्सीस्ट्रोबीन 2.5 टक्के + थायोफॅनेट मिथाईल
11.25 टक्के + थायोमिथॉक्झाम 25 टक्के एफ एस 10 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणात
बिजप्रक्रिया करावी. बुरशीनाशकाच्या बिजप्रक्रियेनंतर थायामिथोक्झाम 30% एफएस 10 मिली
प्रति किलो ग्रॅमची बिजप्रक्रिया करावी. वरील बिजप्रक्रियेनंतर बियाण्यास
रायझोबियम जिवाणू खत ( ब्रेडी रायझोबियम) + स्फुरद विरघळविणारे जिवाणू खताची
(पी.एस.बी.) 250 ग्रॅम प्रति 10 किलो किंवा 100 मिली/10 किलो ग्रॅम (द्रवरूप असेल
तर) याची बिजप्रक्रिया करावी व नंतर बियाणे सावलीमध्ये वाळवून शक्य तेवढ्या लवकर
पेरणी करावी. बिजप्रक्रियेसाठी व.ना.म.कृ. वि. परभणी निर्मित द्रवरूप जैविक खताचा
(रायझोफॉस) 10 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणात वापर करता येतो. सोयाबीन
पिकाची पेरणी शक्यतो बी.बी.एफ (रूंद वरंबा सरी) पध्दतीने करावी ज्यामूळे मातीतील
ओलावा व जमिनीची सुपिकता टिकून राहण्यास मदत होऊन अधिक उत्पादन मिळते. पेरणीपूर्वी
सोयाबीन बियाण्याची तपासून पाहावी, उगवण क्षमता 70 % पेक्षा जास्त
असेल तरच बियाणे पेरणीसाठी वापरावे. खरीप
ज्वारीच्या पेरणीसाठी दोन ओळीमध्ये 45 सें.मी., दोन झाडातील अंतर 12.5 सें.मी.
ठेवावे व पेरणी 3 ते 4 सें.मी. खोलीवर करता येते. पेरणीसाठी हेक्टरी 7.5 किलो
संकरित व 10 किलो सुधारीत वाणांचे बियाणे वापरावे. खरीप ज्वारीच्या पेरणीपूर्वी
गंधक 300 मेश 4 ग्रॅम किंवा थायरम 75 टक्के 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात
बिजप्रक्रिया करावी. तसेच इमिडाक्लोप्रीड 48 टक्के एफएस 14 मिली किंवा
थायमिथॉक्झाम 30 टक्के 10 मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी.
ॲझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पी.एस.बी) प्रत्येकी 25 ग्रॅम प्रति
किलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रिया करावी.
बाजरीची पेरणी
45X15 सें.मी. अंतरावर करता येते. पेरणी करतांना 4 सें.मी. पेक्षा जास्त
खोल पेरू नये. बाजरी पेरणीसाठी हेक्टरी 3 ते 4 किलो
बियाणे वापरावे. बाजरी पिकाच्या पेरणीपूर्वी बियाण्यास मेटालॅक्झील 35 % एसडी 6 ग्रॅम
प्रति किलो बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रिया करावी. 250 ग्रॅम ॲझोस्पिरीलम 10 किलो
बियाण्यास चोळून पेरणी करावी किंवा शेवटी ॲझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणारे जिवाणू
(पीएसबी) प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे याप्रमाणात बियाण्यावर
बिजप्रक्रिया करून पेरणी करता येते. ऊस पिकावर खोड
किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा
क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. हळद पिकाची
लागवड करून घ्यावी. हळद लागवडीपूर्वी बियाण्यास क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही 20
मिली + कार्बेंडेझीम 50 टक्के 10 ग्रॅम किंवा डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मिली
+ डायथेन एम-45 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 100-120 किलो बियाण्यास
बिजप्रक्रिया करावी.बियाणे 10 ते 15 मिनिट द्रावणात बूडवून ठेवावे.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा नविन बाग लागवडीसाठी नागपूर
संत्रा, किन्नो तर मोसंबी नविन बाग लागवडीसाठी न्यूसेलर, सातगुडी व फुले मोसंबी
इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची
खरेदी करावी. अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेत रोगनाशकाची फवारणी पावसाची उघाड
बघून करावी. अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेत फळगळ व्यवस्थापनासाठी, चिलेटेड झिंक 500 ग्रॅम + जिब्रॅलिक ॲसिड 1.5
ग्रॅम 100 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. डाळींब नविन
बाग लागवडीसाठी भगवा, फुले भगवा सुपर, गणेश, फुले आरक्ता, इत्यादी जातींची निवड
करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. मृग बहार
धरलेल्या डाळींब बागेत तेल्या रोगाच्या व्यवस्थापनासाठी रोगनाशकाची पावसाची उघाड
बघून फवारणी करावी. चिकू नविन बाग लागवडीसाठी कालीपत्ती, क्रिकेट बॉल इत्यादी जातींची
निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. तूरळक ठिकाणी
वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड केलेल्या व लहान चिकू
झाडांना काठीने आधार द्यावा. चिकू बागेत तणांचे नियंत्रण करावे. संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू फळबागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
भाजीपाला
पाण्याची उपलब्धता असल्यास भाजीपाला
(वांगी, मिरची, टोमॅटो इत्यादी) पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी
टाकावे. काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करावी.
फुलशेती
पाण्याची उपलब्धता असल्यास फुल पिकाची
रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे. काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची
काढणी करून घ्यावी.
तुती रेशीम उद्योग
रेशीम उद्योग कृषिवर आधारीत असून
खेड्यागावात शेती सोबत रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता रेशी उद्योगात आहे. दिड
एकर तुती लागवड केली तर (अठरा हजार पाचशे सतरा) 18517 झाडे/हेक्टर बसतात वर्षाला 5
कोषाची पीके घेतली तर 450 अंडीपुंजाच एक पीक दुसऱ्या वर्षापासून पुढे 15 ते 20
वर्ष घेता येते. त्यास एक वेळा 3.5 ते 4 क्विंटल कोष उत्पादन मिळते व त्यास कमीत
कमी रू. 400 प्रति किलो भाव लागला तर 40 X 5 पीके 20
क्विंटल वर्षाचे म्हणजे एकूण आठ लाख रूपये कमीत कमी खर्च वजा जाता उत्पन्न मिळते.
इतर पीकाच्या तुलनेत निश्चित चांगले उत्पन्न शेतकऱ्यास मिळते.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळा ऋतुच्या आगमनासोबतच अनेक
आजारांचे देखील आगमन होते. म्हणून पशुधनाच्या आरोग्यासाठी त्रिसुत्री 1) भौतीक
सुविधा म्हणजेच व्यवस्थीत गोठा ज्यायोग्य किटक व पावसापसून संरक्षण. 2) जैविक
सुविधा जसेकी लसीकरण, जंतनाशकाची मात्रा आणि 3)रासायनीक सुविधा म्हणजे आजाराची
लागण झाल्यास तात्काळ पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार लसीकरण आणि पावसाच्या आगमनासोबतच तात्काळ शेळी
मेंढी मध्ये तसच वासरांना वयाच्या सातव्या दिवशी द्यावयाची जंतनाशकाची मात्रा
आवश्यक ठरते.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 22/2025
- 2026 शुक्रवार, दिनांक
– 13.06.2025
No comments:
Post a Comment