Friday 29 July 2022

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 35/2022 - 2023 शुक्रवार, दिनांक – 29.07.2022


 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 29 जुलै रोजी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची तर औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, बीड व जालना जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे

 मराठवाडयात दिनांक 30 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 31 जुलै ते 02 ऑगस्ट दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 29 जुलै ते 04 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरी एवढा तर दिनांक 05 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढलेले आहे. 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 07 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन पिक पिवळे पडत असल्यास (क्लोरोसीस) याच्या व्यवस्थापनासाठी शेतात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी व नंतर सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड-2 ची 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. पहिल्या फवारणीने पाने हिरवी न झाल्यास परत आठ दिवसांनी दूसरी फवारणी करावी. सोयाबीन पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी सोयाबीन संशोधनालय इंदौर यांच्या शिफारसीनूसार  थायामिथॉक्झाम 25% 40 ग्रॅम प्रति एकर पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारावे. सोयाबीन पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी सोयाबीन पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे. खरीप ज्वारी पिकात वापसा स्थिती निर्माण होईल अशी व्यवस्था करावी. खरीप ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. बाजरी पिकात वापसा स्थिती निर्माण होईल अशी व्यवस्था करावी. ऊस पिकात वापसा स्थिती निर्माण होईल अशी व्यवस्था करावी. सध्या ढगाळ वातावरणामूळे व रिमझीम पावसामूळे ऊस पिकावर पायरीला (पाकोळी) याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी किंवा मेटारायझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. रासायनिक व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20% 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36% 200 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. हळद पिकात वापसा स्थिती निर्माण होईल अशी व्यवस्था करावी. सततच्या पावसामूळे हळद पिवळी पडत असल्यास पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर 2% यूरियाची फवारणी करावी. हळद पिकात पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर बायोमिक्सची आळवणी करावी. आळवणीसाठी 25 ते 50 लिटर पाण्यात 4 किलो (पावडर)/ 4 लिटर (लिक्वीड) बायोमिक्स याप्रमाणे द्रावण तयार करावे व ते ठिबक सिंचनाद्वारे पिकास सोडावे किंवा पंपाचा नोझल काढून 200 ग्रॅम (पावडर) / 200 मिली (लिक्वीड) प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी.

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बागेत वापसा स्थिती निर्माण होईल अशी व्यवस्था करावी. पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर संत्रा/मोसंबी बागेत रोगनाशकाची आळवणी करावी, खोडाला बोर्डोपेस्ट लावावी, झाडांवर 19:19:19 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. डाळींब बागेत वापसा स्थिती निर्माण होईल अशी व्यवस्था करावी.पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर डाळिंब बागेत तेलकट डागाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन (स्ट्रेप्टोमायसीन सल्फेट 90% + टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराईड 10%) 0.5 ग्रॅम प्रति लिटर हे महिन्यातून एकदा आणि सात ते दहा दिवसाच्या अंतराने ब्रोनोपाल नंतर फवारावे. पाऊस झाल्यानंतर लगेचच स्ट्रेप्टोसायक्लीन + कॉपरजन्य बूरशीनाशकाची फवारणी करावी. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे फुलकळीची गळ होऊ नये म्हणून बागेत 19:19:19 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  चिकू बागेत वापसा स्थिती निर्माण होईल अशी व्यवस्था करावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात वापसा स्थिती निर्माण होईल अशी व्यवस्था करावी.सध्या ढगाळ वातावरणामूळे काकडीवर्गीय भाजीपाला पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी अझोऑक्सीस्ट्रोबिन 23% एससी 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. मिरची पिकावरील अँन्थ्रॅकनोज/डायबॅक रोगाच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड 50% डब्ल्यूपी किंवा मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

फुल पिकात वापसा स्थिती निर्माण होईल अशी व्यवस्था करावी.

तुती रेशीम उद्योग

निरनिराळया येणाऱ्या रोगामूळे रेशीम किटक मृत पावतात. चिन देशात रेशीम कोष पीकात फक्त 5 ते 6 % पर्यंत रोगामूळे कोष पिकाचे नुकसान होते तर भारतात 25 ते 30 % नुकसान होते. रोग येऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी हाच रामबाण उपाय होय. संगोपनगृह व संगोपन साहित्याचे वेळोवेळी निर्जंतूकीकरण 2% ब्लिचिंग पावडर व 0.3% चुना, अस्त्र, सेरी स्वच्छ, क्लोरीनडाय ऑक्साईड, सॅनिटेक 2.5% इ. निर्जंतूके यांचा वापर करावे. प्रत्येक कात भरताना कीटकांवर पांढरा चुना धुरळणी करावी व कातेवरून उठण्याअगोदर अर्धा तास निर्जंतूक विजेता पावडर शिफारसी प्रमाणे धुरळणी करावी.

सामुदायिक विज्ञान

पारंपारिक पध्दतीने कपडे धुताना कपडे धुण्यासाठी लागणारे इतर साहित्य नजरेच्या व हाताच्या टप्प्यात असेल तर कपडे धुण्याचा वेळ वाचतो आणि डोळयांवर व शरिरावर येणारा ताण कमी होतो.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक35/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक – 29.07.2022

 

Tuesday 26 July 2022

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 34 / 2022 - 2023 मंगळवार, दिनांक – 26.07.2022


 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 26 जुलै रोजी नांदेड, परभणी, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची तर हिंगोली व बीड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 27 व 28 जुलै रोजी नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलावा वाढलेला आहे. 

मराठवाडयात दिनांक 29 जुलै ते 04 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरी एवढा राहण्याची शक्यता आहे.

पिकात, फळबागेत, भाजीपाला पिकात, फुल पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 31 जुलै ते 07 ऑगस्ट, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

पाऊस झालेल्या भागातील कापूस पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. कापूस पिकात मर किंवा मूळकुज दिसून येत असल्यास जमिनीत वापसा आल्यानंतर कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम + युरीया 200 ग्रॅम + पांढरा पोटॅश 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणात घेऊन हे द्रावण झाडाच्या मूळाजवळ प्रति झाड 100 मिली द्यावे. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या (मावा, तूडतूडे) किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी 40 ग्रॅम किंवा ॲसिटामाप्रिड 20% 60 ग्रॅम किंवा डायमिथोएट 30% 260 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. कापूस पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे.  पाऊस झालेल्या भागातील तुर पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी. तसेच जिथे मर रोगाची सुरूवात होत असल्यास जमिनीत वापसा आल्यानंतर कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम + युरीया 200 ग्रॅम + पांढरा पोटॅश 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणात घेऊन हे द्रावण झाडाच्या मूळाजवळ प्रति झाड 100 मिली द्यावे. पाऊस झालेल्या भागातील मूग/उडीद पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. मुग/उडीद पिकात मावा किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 13 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. मूग/उडीद पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी मूग/उडीद पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे. पाऊस झालेल्या भागातील भुईमूग पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. भुईमूग पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी भुईमूग पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे. पाऊस झालेल्या भागातील मका पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी. केळी बागेत रोगनाशकाची आळवणी करावी. द्राक्ष बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. द्राक्ष बागेत करपा आणि डाउनी मिल्ड्यू च्या नियंत्रणासाठी थायोफेनेट मिथाईल 1 ग्रॅम + मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे पावसाची उघाड बघून फवारणी करावी. द्राक्ष  बागेत जिवाणूजन्य करपा नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. सिताफळ बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी.

भाजीपाला

सध्या ढगाळ वातावरणामूळे काकडीवर्गीय भाजीपाला पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी अझोऑक्सीस्ट्रोबिन 23% एससी 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी भाजीपाला पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे. पाणी साचलेल्या ठिकाणी भाजीपाला पिकात 1 टक्का 13:00:45 ची पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी.

फुलशेती

फुल पिकात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळयामध्ये पशुधनामध्ये घटसर्प हा विषाणूजन्य आजार एक घातक रोग आहे. या रोगामधील फुफुसाचा दाह (न्यूमोनिया) हा प्रकार जिवघेणा ठरतो. जनावरे अचानक आजारी पडणे, नाकावाटे श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे प्रामूख्याने आढळतात. वेळीच उपचार न केल्यास जनावर दगावण्याची भिती असते. मात्र पशुवैद्यकांच्या सल्ल्याने प्रतिजैविकाची वेळी मात्रा दिल्यास हा रोग बरा होतो. हा रोग होऊच नये म्हणून आपल्या जनावरांचे लसीकरण करता येईल.

सामूदायीक विज्ञान

पारंपारिक पध्दतीन कपडे धुताना कपडयांना साबण लावणे, घासणे इ. क्रिया बसुन केल्या तर गुडघ्यांवर आणि पायांवर येणारा ताण कमी होऊ शकतो. पारंपारिक पध्दतीने कपडे धुताना मधून मधून बसण्यासाठी स्टुलचा  वापर केल्यास शारिरीक श्रम कमी पडतात.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक34 / 2022 - 2023      मंगळवार, दिनांक – 26.07.2022

 

Friday 22 July 2022

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 33/2022 - 2023 शुक्रवार, दिनांक – 22.07.2022


 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 22 जुलै रोजी हिंगोली, लातूर व नांदेड जिल्हयात तर दिनांक 23 जुलै रोजी हिंगोली व नांदेड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 मराठवाडयात पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 22 ते 28 जुलै दरम्यान पाऊस सरासरी एवढा तर दिनांक 29 जुलै ते 04 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरी एवढा राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढलेले आहे. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. सोयाबीन पिक पिवळे पडत असल्यास (क्लोरोसीस) याच्या व्यवस्थापनासाठी शेतात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी व नंतर सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड-2 ची 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. पहिल्या फवारणीने पाने हिरवी न झाल्यास परत आठ दिवसांनी दूसरी फवारणी करावी. सध्या बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी सोयाबीन पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे. कापूस पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या (मावा, तूडतूडे) किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी 40 ग्रॅम किंवा ॲसिटामाप्रिड 20% 60 ग्रॅम किंवा डायमिथोएट 30% 260 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकात आकस्मिक मर किंवा मूळकुज दिसून असल्यास कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम + युरीया 200 ग्रॅम + पांढरा पोटॅश 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणात घेऊन हे द्रावण झाडाच्या मूळाजवळ प्रति झाड 100 मिली द्यावे. सध्या बऱ्याच ठिकाणी कापूस पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे. तुर पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. जिथे मर रोगाची सुरूवात होत असल्यास कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम + युरीया 200 ग्रॅम + पांढरा पोटॅश 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणात घेऊन हे द्रावण झाडाच्या मूळाजवळ प्रति झाड 100 मिली द्यावे. मुग/उडीद पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. सध्या बऱ्याच ठिकाणी मूग/उडीद पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी मूग/उडीद पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे. भुईमूग पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. सध्या बऱ्याच ठिकाणी भुईमूग पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी भुईमूग पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे. सध्या ढगाळ वातावरणामूळे व रिमझीम पावसामूळे ऊस पिकावर पायरीला (पाकोळी) याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी किंवा मेटारायझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

डाळींब बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. डाळिंब बागेत तेलकट डागाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन (स्ट्रेप्टोमायसीन सल्फेट 90% + टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराईड 10%) 0.5 ग्रॅम प्रति लिटर हे महिन्यातून एकदा आणि सात ते दहा दिवसाच्या अंतराने ब्रोनोपाल नंतर फवारावे. पाऊस झाल्यानंतर लगेचच स्ट्रेप्टोसायक्लीन + कॉपरजन्य बूरशीनाशकाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे फुलकळीची गळ होऊ नये म्हणून बागेत 19:19:19 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  द्राक्ष बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.  द्राक्ष बागेत करपा आणि डाउनी मिल्ड्यू च्या नियंत्रणासाठी थायोफेनेट मिथाईल 1 ग्रॅम + मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. सध्या ढगाळ वातावरणामूळे काकडीवर्गीय भाजीपाला पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी अझोऑक्सीस्ट्रोबिन 23% एससी 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. सध्या बऱ्याच ठिकाणी भाजीपाला पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी भाजीपाला पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे. पाणी साचलेल्या ठिकाणी भाजीपाला पिकात 1 टक्का 13:00:45 ची पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

फुलशेती

फुल पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

तुती रेशीम उद्योग

पावसाळयात ढगाळ हवामानात रेशीम कीटक संगोपन ग्रहातील आर्द्रता 95 ते 99 टक्के पर्यंत राहते. अशा वेळी बाल्य तथा प्रोढ कीटक संगोपन क्रहात अनुक्रमे तापमान 28 ते 26 अं.से. व आर्द्रता 85 ते 65 टक्के च्या वर गेली तर ग्रासरी रोगाची व फ्लॅचरी रोगाची बाधा कीटकांना होते. त्यामूळे संगोपन ग्रहात स्वच्छता राखणे, आजूबाजूला शेडनेटच्या दरवाजा तेथे 0.3 % चुना + 2% ब्लीचींग पावडर द्रावण पाण्यात तयार करून शिंपडावे. संगोपन साहित्य ट्रे स्वच्छता जाळया, अच्छादन जाळया 2% फॉर मॅलीन मध्ये निर्जंतूक करून कडक उन्हात वाळवून पुन्हा वापराव्यात.

सामुदायिक विज्ञान

पारंपारिक पध्दतीने कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दगडाची उंची आणि उपलब्ध पाण्याचा स्त्रोत कपडे धुणाऱ्या  व्यक्तीच्या उंचीच्या प्रमाणात असेल तर कपडे धुणाऱ्या व्यक्तीची  शरीर संस्थिती योग्य राहते आणि ऊर्जा अपव्य कमी होतो.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक33/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक – 22.07.2022

 

Tuesday 19 July 2022

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 32 / 2022 - 2023 मंगळवार, दिनांक – 19.07.2022


 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पूढील पाच दिवस आकाश ढगाळ ते पूर्णत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 22 जुलै रोजी हिंगोली, नांदेड व लातूर जिल्हयात तर दिनांक 23 जुलै रोजी हिंगोली व नांदेड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण किंचित कमी झालेले आहे. 

मराठवाडयात दिनांक 22 ते 28 जुलै दरम्यान पाऊस सरासरी एवढा राहण्याची शक्यता आहे.

जास्त पाऊस झालेल्या भागातील पिकात, फळबागेत, भाजीपाला पिकात, फुल पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 24 जुलै ते 30 जुलै, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठपरभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

जास्त पाऊस झालेल्या भागातील कापूस पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावीकापूस पिकात आकस्मिक मर किंवा मूळकुज दिसून असल्यास कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम + युरीया 200 ग्रॅम + पांढरा पोटॅश 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणात घेऊन हे द्रावण झाडाच्या मूळाजवळ प्रति झाड 100 मिली द्यावे. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या (मावा, तूडतूडे) किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी 40 ग्रॅम किंवा ॲसिटामाप्रिड 20% 60 ग्रॅम किंवा डायमिथोएट 30% 260 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. सध्या बऱ्याच ठिकाणी कापूस पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे.  जास्त पाऊस झालेल्या भागातील सोयाबीन पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी. सोयाबीन पिक पिवळे पडत असल्यास (क्लोरोसीस) याच्या व्यवस्थापनासाठी शेतात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी व नंतर सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड-2 ची 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. पहिल्या फवारणीने पाने हिरवी न झाल्यास परत आठ दिवसांनी दूसरी फवारणी करावी. सध्या बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी सोयाबीन पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे. जास्त पाऊस झालेल्या भागातील तुर पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावीतसेच जिथे मर रोगाची सुरूवात होत असल्यास कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम + युरीया 200 ग्रॅम + पांढरा पोटॅश 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणात घेऊन हे द्रावण झाडाच्या मूळाजवळ प्रति झाड 100 मिली द्यावे. जास्त पाऊस झालेल्या भागातील मूग/उडीद पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी. सध्या बऱ्याच ठिकाणी मूग/उडीद पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी मूग/उडीद पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे. जास्त पाऊस झालेल्या भागातील भुईमूग पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी. सध्या बऱ्याच ठिकाणी भुईमूग पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी भुईमूग पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

जास्त पाऊस झालेल्या भागातील  डाळींब बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी. डाळिंब बागेत तेलकट डागाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन (स्ट्रेप्टोमायसीन सल्फेट 90% + टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराईड 10%) 0.5 ग्रॅम प्रति लिटर हे महिन्यातून एकदा आणि सात ते दहा दिवसाच्या अंतराने ब्रोनोपाल नंतर फवारावे. पाऊस झाल्यानंतर लगेचच स्ट्रेप्टोसायक्लीन + कॉपरजन्य बूरशीनाशकाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी जास्त पाऊस झालेल्या भागातील  केळी बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी.  जास्त पाऊस झालेल्या भागातील  द्राक्ष बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. द्राक्ष बागेत करपा आणि डाउनी मिल्ड्यू च्या नियंत्रणासाठी थायोफेनेट मिथाईल 1 ग्रॅम + मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

भाजीपाला

जास्त पाऊस झालेल्या भागात भाजीपाला पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावीकाढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. गादीवाफ्यावर लागवड केलेल्या रोपवाटीकेतील रोपांना बुरशी नाशकाची  आळवणी करावी. सध्या बऱ्याच ठिकाणी भाजीपाला पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी भाजीपाला पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे. पाणी साचलेल्या ठिकाणी भाजीपाला पिकात 1 टक्का 13:00:45 ची पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

फुलशेती

जास्त पाऊस झालेल्या भागातील फुल पिकात  अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी.

पशुधन व्यवस्थापन

पावसामूळे चरण्यासाठी गवत सर्वत्र उपलब्ध होत आहे. गवत प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यामूळे रवंथ करणाऱ्या पशुधनामध्ये “पोटफुगी” संभवते. यासाठी टरपेंटाईन तेल 50 मिली + गोडतेल 200 मिली गाय व म्हशींमध्ये तोंडाद्वारे पाजावे. शेळी व मेंढीमध्ये याचे प्रमाण  25 मिली + 100 मिली एवढे असावे.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरेमुख्य प्रकल्प समन्वयकग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 32 / 2022 - 2023      मंगळवारदिनांक – 19.07.2022

 

Friday 15 July 2022

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 31/2022 - 2023 शुक्रवार, दिनांक – 15.07.2022


 

दिनांक 18 जुलै रोजी लातूर, नांदेड व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 19 जुलै रोजी लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 18 जुलै रोजी लातूर, नांदेड व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 19 जुलै रोजी लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून  तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 15 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 16 व 17 जुलै रोजी काही ठिकाणी  हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 15 ते 21 जुलै दरम्यान पाऊस सरासरी एवढा तर दिनांक 22 ते 28 जुलै दरम्यान पाऊस सरासरी एवढा राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेले आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढलेले आहे. 

जास्त पाऊस झालेल्या भागातील खरीप पिकात, फळबागेत, भाजीपाला पिकात, फुल पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

जास्त पाऊस झालेल्या भागातील सोयाबीन पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. सध्या बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी सोयाबीन पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे. सोयाबीन पिक पिवळे पडत असल्यास (क्लोरोसीस) याच्या व्यवस्थापनासाठी शेतात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी व नंतर 0.5 % (50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) फेरस सल्फेटची  पानांवर फवारणी करावी किंवा ईडीटीए चेलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रिएंट ग्रेड (II) 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यास फवारणी करावी. सोयाबीन पिकात खोडमाशी व उंटअळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम  12.6 + लॅमडा साहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  जास्त पाऊस झालेल्या भागातील कापूस पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. सध्या बऱ्याच ठिकाणी कापूस पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे.  कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी 40 ग्रॅम किंवा ॲसिटामिप्रिड 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. जास्त पाऊस झालेल्या भागातील खरीप ज्वारी पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. जास्त पाऊस झालेल्या भागातील बाजरी पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. जास्त पाऊस झालेल्या भागातील ऊस पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. जास्त पाऊस झालेल्या भागातील हळद पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी.

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

जास्त पाऊस झालेल्या भागातील  संत्रा/मोसंबी बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. जास्त पाऊस झालेल्या भागातील  डाळीब बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. जास्त पाऊस झालेल्या भागातील  चिकू बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. जास्त पाऊस झालेल्या भागातील  द्राक्ष बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. द्राक्ष बागेत करपा आणि डाउनी मिल्ड्यू च्या नियंत्रणासाठी थायोफेनेट मिथाईल 1 ग्रॅम + मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

भाजीपाला

जास्त पाऊस झालेल्या भागात भाजीपाला पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. गादीवाफ्यावर लागवड केलेल्या रोपवाटीकेतील रोपांना बुरशी नाशकाची  आळवणी करावी. सध्या बऱ्याच ठिकाणी भाजीपाला पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी भाजीपाला पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे. पाणी साचलेल्या ठिकाणी भाजीपाला पिकात 1 टक्का 13:00:45 ची पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

फुलशेती

जास्त पाऊस झालेल्या भागातील फुल पिकात  अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी.

चारा पिके

जास्त पाऊस झालेल्या भागातील चारा पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी.

तुती रेशीम उद्योग

वनस्पतीच्या वाढीसाठी सोळा प्रकारचे अन्न द्रव्य अवश्यक असतात. हवा, सुर्यप्रकाश आणि  पाणी अन्न तयार करण्यासाठी या  तिन घटकांची गरज असते. ढगाळ हवामानात सुर्यप्रकाशाच्या अभावामूळे पिकाची वाढ खुंटते. भारतात भरपूर सुर्यप्रकाश मिळत असल्यामूळे बारामाही रेशीम कोष उत्पादन शक्य आहे. जमिनीचा सामू 6.5 ते 7.3 पर्यंत असावा. सामू आम्ल किंवा अल्काईन असल्यास तुती वृक्षास अन्नघटक जमिनीतून घेणे शक्य होत नाही. जमिन आम्ल धर्मी असेल व 1.0 ने वाढवायची असेल तर 4 टन प्रति हेक्टर चूना (कॅल्शियम कार्बोनेट) व जमीन अल्काईन असेल व 1.0 ने कमी करण्यासाठी तेवढेच जिप्सम जमिनीत टाकावे लागते.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक31/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक – 15.07.2022