हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र,
मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 24 व 25 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात, दिनांक 26 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना
जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 24 जून रोजी काही ठिकाणी तर दिनांक 25 व 26 जून रोजी तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 27 व 28 जून रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची
शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल व किमान तापमानात फारशी
तफावत जाणवनार नाही.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 26 जून ते 03 जुलै 2025 दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता
आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला
आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
पेरणी न केलेल्या भागात
पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच कापूस पिकाची लागवड करावी. कापूस पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. कापूस पिकास पाण्याचा ताण बसत
असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन
पध्दतीने पाणी द्यावे. लागवड
केलेल्या कापूस पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. पेरणी न केलेल्या भागात
पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच तुर पिकाची पेरणी
करावी. तुर
पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. पिकास पाण्याचा ताण बसत
असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन
पध्दतीने पाणी द्यावे.
पेरणी केलेल्या तुर पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. पावसाळ्यात तूर पिकावरील
फायटोप्थोरा करपा टाळण्यासाठी, शेताच्या चारी बाजूस तीन फूट खोल आणि दोन फूट रुंद चर
काढावी जेणे करून अतिवृष्टी मध्ये शेतातील मातीची धूप होणार नाही व पिकाचे मुळे सडणार
नाहीत. तसेच पुढे चरातील पाणी पाऊस ओसरल्यावर शेतातील पिकास परत कामी येईल. पेरणी न केलेल्या भागात
पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच मूग/उडीद पिकाची
पेरणी करावी. मूग/उडीद
पिकाची पेरणी जूलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते. पिकास पाण्याचा
ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन
पध्दतीने पाणी द्यावे. पेरणी
केलेल्या मूग/उडीद पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. पेरणी न केलेल्या भागात
पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच भुईमूग पिकाची पेरणी
करावी. भुईमूग
पिकाची पेरणी 7 जूलै पर्यंत करता येते. पिकास
पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन
पध्दतीने पाणी द्यावे. पेरणी
केलेल्या भुईमूग पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. पेरणी न केलेल्या भागात
पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच मका पिकाची पेरणी
करावी. मका
पिकाची पेरणी जूलै अखेर पर्यंत करता येते. पिकास
पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन
पध्दतीने पाणी द्यावे. पेरणी
केलेल्या मका पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.
फळबागेचे व्यवस्थापन
नवीन केळी बागेची लागवड करून घ्यावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत
रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. लागवडीच्या वेळेस शेणखत तर लागवडीनंतर
30 दिवसाने रासायनिक खत व्यवस्थापन करावे. केळी बागेत उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन
पध्दतीने पाणी द्यावे.नवीन
आंबा लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. आंबा बागेत उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन
पध्दतीने पाणी द्यावे.द्राक्ष
बागेतील रोगग्रस्त पाने काढून टाकावीत व रोगनाशकाची फवारणी करावी. द्राक्ष बागेतील अतिरिक्त बगल फुटी
काढून घ्याव्यात जेणेकरून जास्तीत जास्त सूर्यप्रकाश डोळ्यावर पडलयास डोळा
फुटण्यास मदत होते. द्राक्ष बागेतील वेलीची बांधणी करावी. द्राक्ष बागेत उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन
पध्दतीने पाणी द्यावे.नवीन
सिताफळ लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. सिताफळ बागेत उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन
पध्दतीने पाणी द्यावे.
भाजीपाला
भाजीपाल्याचे बी टाकलेल्या गादी
वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी
द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
फुलपिकाचे बी टाकलेल्या गादी
वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी
द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळ्याच्या सुरुवातीला आर्द्रता, तापमानात
बदल, पाणी साचणे, चिखल आणि
माश्या आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो, ज्यामुळे
पशुधनाचे आरोग्य बिघडते. यासाठी खालील उपाययोजना कराव्यात. पशुधनासाठी सुरक्षित आणि
स्वच्छ निवाऱ्याची व्यवस्था करा, गोठ्याच्या परिसरात पावसाचे पाणी साचणार
नाही याची खात्री करा आणि दर 15 दिवसांनी पोटॅशियम परमॅंगनेट द्रावणाने गोठा
निर्जंतुक करा.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला
पत्रक क्रमांक – 25/2025- 2026 मंगळवार, दिनांक – 24.06.2025
No comments:
Post a Comment