Friday, 8 July 2022

दिनांक 08 जुलै रोजी परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 09 जुलै रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 11 व 12 जुलै रोजी परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 08 जुलै रोजी परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 09 जुलै रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 11 व 12 जुलै रोजी परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 08, 09, 1112 जुलै रोजी तुरळक ठिकाणी  जोरदार तर दिनांक 10 जुलै रोजी तूरळक ठिकाणी  हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 08 ते 14 जुलै दरम्यान पाऊस सरासरी एवढा तर दिनांक 15 ते 21 जुलै दरम्यान पाऊस सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेले आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढलेले आहे. 

मराठवाडयात ज्या तालूक्यात पेरणी योग्य मौसमी पाऊस (75-100 मिमी) झाला असल्यास (हिंगोली जिल्हा : औंढा नागनाथ, वसमत ; जालना जिल्हा : जाफराबाद ; नांदेड जिल्हा : बिलोली, नायगाव ; उस्मानाबाद : लोहरा) जमिनीतील ओलावा बधून वापसा येताच बिजप्रक्रिया करूनच  पेरणी करावी.

पेरणीयोग्य पाऊस न झालेल्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस होण्याची वाट पाहावी व पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतरच जमिनीतील ओलावा बधून वापसा येताच बिजप्रक्रिया करूनच खरीप पिकांची पेरणी करावी. 8 जूलै नंतर भुईमूग, मुग, उडीद हि पिके घेऊ नये.

सध्या बऱ्याच ठिकाणी सोयाबीन, कापूस, भाजीपाला व विविध फळबागांमध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी सोयाबीन व कापूस यांसारख्या पिकांमध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे तर फळबागेमध्ये झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रतिझाड 10 ग्रॅम पसरून टाकावे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)  मराठवाड्यात दिनांक 14 जुलै ते 20 जू, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरी एवढा राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतर वापसा येताच बिजप्रक्रिया करून सोयाबीन पिकाची पेरणी करावी. सोयाबीन पिकाची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते. पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतर वापसा येताच बिजप्रक्रिया करून संकरित खरीप ज्वारी पिकाची पेरणी करावी. संकरित खरीप ज्वारी पिकाची पेरणी  15 जुलैपर्यंत करता येते.

पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतर वापसा येताच बिजप्रक्रिया करून बाजरी पिकाची पेरणी करावी. बाजरी पिकाची पेरणी 20 जुलैपर्यंत करता येते. जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी ऊस पिकात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी हळद पिकात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी संत्रा/मोसंबी बागेत झाडाच्या खोडाजवळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.  जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी डाळींब बागेत झाडाच्या खोडाजवळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.  जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी चिकू बागेत झाडाच्या खोडाजवळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

भाजीपाला

गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

पाउस झालेल्या ठिकाणी  जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी.  काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी.

चारा पिके

पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतर वापसा येताच बिजप्रक्रिया करून चारा पिकांची पेरणी करावी.

तुती रेशीम उद्योग

ढगाळ वातावरणात रेशीम कीटक संगोपनाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. बाह्य रेशीम कीटक संगोपनगृहात 25 अं.से. तापमान व 65 टक्के सापेक्ष आर्द्रता कात अवस्थेत असणे आवश्यक असते. कातेवर बसताना 5 ग्रॅम प्रति चौ. फुट याप्रमाणे पांढरा कळीचा चूना अळयांवर धुरळणी करावी. 24 तास कात अवस्थेत तुतीपाने खाद्य देऊ नये. त्यामूळे कात ओळखता येणे महत्वाचे आहे. काते वरून उठताना खाद्य देण्याअगोदर अर्धातास निर्जंतूक विजेता किंवा अंकुश पावडर अळ्यांवर सचिद्र पातळ सुती कपडयाने धुरळणी करावी. 100 अंडीपूजास 15 कि.ग्रॅ. चुना व 4.5 कि.ग्रॅ. विजेता पावडर लागते.

सामुदायिक विज्ञान

रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी रोजच्या जेवणातील पदार्थांमध्ये विविध पानांची (पावडर) भुकटीचा उपयोग करता येतो. जसे, कढीपत्यांची पाने, कोबीची पाने,  राजगिऱ्याची पाने, शेवग्याची पाने, हरबऱ्याची पाने आणि बिटाची पाने इत्यादी.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक29/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक – 08.07.2022

  

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 18 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात, दिनांक 19 जून रोजी नांदेड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात, दिनांक 20 जून रोजी नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात, तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 17 ते 21 जून रोजी तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...