प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चोविस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही, त्यानंतर पुढील चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 4 अं. से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. दिनांक 06 एप्रिल रोजी नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 07 एप्रिल रोजी नांदेड, लातूर, धाराशिव व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 07 ते 13 एप्रिल 2023 दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते
सरासरीपेक्षा किंचित जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या
बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे उन्हाळी भुईमूग पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील
ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी
देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा ठिबक) वापर करावा. भुईमूग पिकात
आऱ्या सुटल्या नंतर अंतर मशागत करू नये. काढणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकाची मळणी
लवकरात लवकर करून घ्यावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता
मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेल्या गहू पिकाची
मळणी यंत्राच्या सहाय्याने लवकरात लवकर करावी. मळणी करतांना दाणे फुटणार नाहीत
याची काळजी घ्यावी. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे,
वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत.
तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता हळदीची उघडयावर साठवण करू
नये.
फळबागेचे व्यवस्थापन
जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व
जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी व आंबा फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. बागेस
सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब
करावा. नविन लागवड केलेल्या फळबागेमध्ये रोपांना शेडनेटच्या साहाय्याने सावली
करावी जेणेकरून लहान रोपांचे प्रखर उन्हापासून संरक्षण होईल. आंबा बागेत फळगळ
दिसून येत असल्यास 2 % 13:00:45 + एनएए 15 पीपीएम ची फवारणी करावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा
अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या द्राक्ष फळांची काढणी करून घ्यावी.
भाजीपाला
तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा
अंदाज लक्षात घेता काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज
इत्यादी पिकांची काढणी करावी. कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या
बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील
ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी
देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा ठिबक) वापर करावा.
फुलशेती
तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा
अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून बाजार पेठेत पाठवावी. कमाल तापमानात झालेली
वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार व
जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे.
पशुधन व्यवस्थापन
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमूळे
आपल्या पशुंना उन्हामध्ये बांधु नका (निदान तिव्र उन्हाच्या कालावधीमध्ये त्यांना
झाडाखाली/सावलीमध्ये किंवा शेड/गोठ्यामध्येच बांधणे चांगले). पशुंना शक्यतो
थंड/स्वच्छ/मुबलक पाणी दोन-तिन वेळेस पाजावे. पाण्यामुळे पशुंच्या शरीरातील
पाण्याचे प्रमाण कमी (डीहायड्रोजन) होणार नाही. जमल्यास पाण्यामधून क्षार द्यावेत, 5 लिटर पाण्यामध्ये
चिमुटभर गुळ (25 ग्रॅम), थोडे मिठ (5-10 ग्रॅम) आणि 5 ग्रॅम
क्षार मिश्रण दिल्यास उत्तम, मात्र नजीकच्या पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच व्यवस्थापन
करावे. अति उष्ण काळामध्ये जनावरांच्या पाठीवर पोते टाकून ते पाण्याने भिजवून ठेवावे.
तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची
शक्यता असल्यामूळे जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी
बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा
नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व
पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये. तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबु नये.
सामुदायिक विज्ञान
स्वस्थ जीवनासाठी आश्यक बाबी : दररोज
संतुलीत आहार घ्या. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. आहारात साखर आणि मीठाचा वापर कमी करा. तेल आणि
मसालेदार पार्थांचा वापर कमी करा. सकाळची न्याहरी करण्यास कधीच टाळाटाळ करु नका.
जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळा.
कृषि
अभियांत्रिकी
रब्बी पिकांच कापणी झाल्यानंतर शेतात
नांगरणी करून घ्यावी. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील मातीचे माती परिक्षण करून घ्यावे.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 01/
2023 - 2024 सोमवार,
दिनांक –
03.04.2023
No comments:
Post a Comment