प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात
दिनांक 09 ते 15 नोव्हेंबर दरम्यान पाऊस
सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त तर
दिनांक 16 ते 22 नोव्हेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे
ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात
बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर
जमिनीतील ओलावा किंचित वाढलेला आहे.
दिनांक 09 नोव्हेंबर रोजी लातूर
जिल्हयामध्ये तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता
लक्षात घेता काढणी केलेल्या मालाचे ढिग ताडपत्रीने/पॉलीथीनने झाकून ठेवावेत. मळणी
केलेलया मालाची सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
खरीप पिकांची काढणी केल्यानंतर
पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास हरभरा पिकाची पेरणी लवकरात
लवकर करून घ्यावी. बागायती हरभरा पिकाची पेरणी 10 नोव्हेंबर पर्यंत करता येते.
बागायती हरभरा पिकाची पेरणी 45X 10 सेंमी अंतरावर
करावी. बागायती हरभरा पेरणी करतांना 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 30 किलो पालाश
प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी. करडई पिकात उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी
विरळणी करावी व दोन रोपातील अंतर 20 सेंमी ठेवावे. पाण्याची उपलब्धता असेल तरच गहू पिकाच्या लागवडीचे नियोजन
करावे. बागायती गहू वेळेवर पेरणीचा कालावधी हा 01 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर आहे.
वेळेवर पेरणीसाठी त्र्यंबक, तपोवन, गोदावरी, फुले समाधान, एम ए सी एस 6222, एम ए
सी एस 6474, इत्यादी वाणांपैकी निवड करावी. पुढील पाच दिवस कोरडे हवामान राहण्याची
शक्यता लक्षात घेता ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकावर खोड किडीचा
प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 %
25 मिली किंवा
क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकावर पांढऱ्या
माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 %
36 मिली प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. पुढील
पाच दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता लक्षात घेता हळद पिकास आवश्यकतेनूसार पाणी
द्यावे. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 %
15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद
पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत
संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे हळदीच्या पानावरील ठिपके
याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4%
10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10
लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
पुढील पाच दिवस कोरडे हवामान
राहण्याची शक्यता लक्षात घेता संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेस आवश्यकतेनूसार
पाणी द्यावे. नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी,
डाळींब व चिकू बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. संत्रा/मोसंबी
बागेत तणनाशकाची फवारणी करू नये. काढणीस
तयार असलेल्या संत्रा/मोसंबी फळांची काढणी करून घ्यावी. काढणीस तयार असलेल्या
डाळींब फळांची काढणी करून घ्यावी. काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून
घ्यावी.
भाजीपाला
पुढील पाच दिवस कोरडे हवामान
राहण्याची शक्यता लक्षात घेता भाजीपाला पिकात तण व्यवस्थापन करून आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. पाण्याची उपलब्धता
असल्यास पुर्नलागवडीसाठी तयार असलेल्या (टोमॅटो, कांदा, कोबी इत्यादी) भाजीपाला पिकांची
पुर्नलागवड करावी तसेच गाजर, मेथी, पालक इत्यादी पिकांची लागवड करावी. काढणीस तयार
असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव
दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10
मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
पुढील पाच दिवस कोरडे हवामान
राहण्याची शक्यता लक्षात घेता फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. दिवाळी सणामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी
असते. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून
बाजारपेठेत पाठवावी.
तुती रेशीम
उद्योग
उझी माशी रेशीम किटकावर उपजिविका
करणार परोपजिवी कीड आहे. या कीडीच्या प्रादूर्भावामुळे 20 टक्क्यापर्यंत कोष पीकाचे
नुकसान होते. अंडी, अळी, कोष व प्रौढ माशी अशा चार अवस्थेचा जिवन क्रम असून
एकात्मीक पध्दतीने नियंत्रण उपाय करावेत. कच्या शेडनेट संगोपनगृहात उझी माशी सरळ
प्रवेश करणार नाही यासाठी तुती पाने/ फांद्या छाटणी नंतर अंधार खोलीत अर्धा ते एक
तास साठवून नंतर संगोपनगृहात न्यावा व खाद्य द्यावे. शेडनेटच्या जाळीच्या वरच्या
बाजूस छिद्र राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. जमीनीवर फरशी करावी. चौथी कात
टाकल्यानंतर तिसऱ्या दिवशी लिसोलायनेक्स थायमंस परोपजिवी कीटकाचे दोन पाउच प्रति
शंभर अंडीपुज या प्रमाणात रॅकवर चंद्रिके जवळ ठेवावेत, कोष काढणी नंतर खताच्या
खड्डयाजवळ ठेवावेत.
पशुधन व्यवस्थापन
पशुसाठी चारा व्यवस्थापन :
मराठवाडयाच्या अनेक भागामध्ये कमी पाऊस झाल्यामूळे भविष्यामध्ये पशुधनासाठी चारा
टंचाई भासू शकते. यासाठी असलेल्या पडकातील गवत, द्विदल व तत्सम पशुची चारा पीके
याचे सायलेज (मूरघास) स्वरूपामध्ये जतन, तसेच रब्बी हंगामामध्ये ज्वारीसारखे पीक
घेऊन कडबा उत्पादन करणे, ईतर पीकांचे काड घेऊन त्यावर युरीया-मोलॅसेस यांची
ट्रीटमेंट करून वापरणे. ईत्यादी उपाय अमलात आणण्याची गरज आहे व त्यासाठी सर्वांनी
तयारी केली पाहिजे.
सामुदायिक विज्ञान
पाणी शरीरातील महत्वाची कामे
करण्याकरिता आवश्यक आहे. शरिरातील पाणी श्वासाद्वारे, घामाद्वारे आणि लघवीद्वारे
बाहेर निघून जाते. ती कमतरता पूर्ण
करण्याकरिता पाण्याची गरज असते. शरीरातील पाणी आपले डोळे, नाक आणि तोंड यांना
आर्द्रता पुरवते शरीरातील पौष्टक मुल्य खनीजे व ऑक्सीजन सर्व शरीरातील सर्व
अवयवांना पुरविते. मुत्रपिंड आणि यकृताद्वारे बेकार पदार्थ बाहेर काढण्याकरिता
पाणी आवश्यक आहे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 64/2023 - 2024 गुरूवार, दिनांक – 09.11.2023
No comments:
Post a Comment