प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात पुढील तीन दिवसात हळूहळू वाढ होऊन त्यानंतर किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात
दिनांक 16 ते 22 फेब्रुवारी दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान व किमान तापमान
सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 18 ते 24 फेब्रुवारी 2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा
जास्त, कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी व
किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात
बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या
बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील सात दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज
लक्षात घेता, रब्बी ज्वारी, पिकास कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 90
ते 95 दिवस) पाणी द्यावे. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी पिकाचे
पक्षांपासून संरक्षणासाठी उपाय योजना कराव्यात. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या
बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील सात दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज
लक्षात घेता, गहू पिकास दाण्यात दुधाळ पीक अवस्था (पेरणी नंतर 80 ते 85
दिवस) व दाणे भरताना (पेरणीनंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास
याच्या व्यवस्थापनासाठी झिंक फॉस्फाईड 1
भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या
बिळात टाकुन बिळे बंद करावीत. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या
बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील सात दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज
लक्षात घेता, वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार पाणी
व्यवस्थापन करावे.
फळबागेचे व्यवस्थापन
कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या
बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील सात दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज
लक्षात घेता, केळी, आंबा बागेत आवश्यकतेनूसार
पाणी व्यवस्थापन करावे. नांदेड जिल्हयात वादळी वारा, पाऊस व गारपीटीमूळे बागेत
पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. मोडलेली झाडे बागेबाहेर काढावी. मोडलेल्या
फांद्यांची छाटणी करावी. केळी व आंबा बागेत रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून
मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून संरक्षणात्मक फवारणी घ्यावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे
करून तण नियंत्रण करावे. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या
वेगामूळे तसेच पुढील सात दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला
पिकांची काढणी करून घ्यावी. नांदेड जिल्हयात वादळी वारा, पाऊस व गारपीटीमूळे
प्रादूर्भाव ग्रस्त भाजीपाला गोळा करून नष्ट करावा. भाजीपाला पिकात रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून मॅन्कोझेब 25 ग्रॅम
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून संरक्षणात्मक फवारणी घ्यावी.
फुलशेती
व्हॅलेंटाइन्स डेमुळे बाजार पेठेत गुलाब फुलांना अधिक मागणी
असते काढणीस तयार असलेल्या गुलाब फुलांची काढणी करून बाजार पेठेत पाठवावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या
बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील सात दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज
लक्षात घेता, फुल
पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
पशुधन व्यवस्थापन
सध्याच्या अचानक होत असलेल्या
वातावरण बदलामध्ये (सकाळी थंड तर दुपारी उष्ण वातावरण) या पासून लहान वयातील
पशुधनाचे संरक्षण करणे महत्वाचे ठरते. मोठे पशुधन अनेक वेळा वातावरणातील बदलास
सामोरे गेलेले असतात परंतू वासरे, करडे व कोकरे (नवीन जन्मास आलेली) हा बदल
प्रथमत: अनुभवत आहेत. अशा सर्वांना सकाळी थंड दुपारी उन्हापासून संरक्षणाची काळजी
घ्यावी. विशेषत: गोठ्यामध्ये संरक्षणा बरोबरच उर्जायूक्त आहार देणे आवश्यक आहे.
जेणे करून ते आपल्या शरीराची उब कायम ठेवतात. परजीवी आजारांची लागण होऊ नये यासाठी वयाच्या सातव्या दिवशी
जंतनाशक व तिन महिन्यांच्या वासरांना व करडास/कोकरांना पट्टकृमीनाशक व रक्ती हागवण
आजारावरील औषधीची मात्रा द्यावी. नांदेड
जिल्हयात गारपीटीमूळे पशुधनास इजा
झाली असल्यास लवकरात लवकर पशुवैद्यक तज्ञांकडून उपचार करून घ्यावेत.
सामुदायिक विज्ञान
रोजच्या
आहारात 30 ग्रॅम पेक्षा जास्त साखर वापरू नये कारण जास्त साखरेमूळे जास्त कॅलरी
मिळतात त्यामूळे वजन वाढते. वजन वाढल्यामूळे ऱ्हदयरोग आणि मधूमेह होण्याचा धोखा
असतो.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला
पत्रक क्रमांक – 91/ 2023 - 2024 मंगळवार, दिनांक – 13.02.2024
No comments:
Post a Comment