प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 07 मे रोजी दुपारच्या
वेळी आकाश ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील तीन
ते चार दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर कमाल तापमानात घट
होण्याची शक्यता आहे. दिनांक 04 मे रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात, दिनांक 05 मे
रोजी लातूर, धाराशिव व बीड जिल्हयात तापमानात वाढ होऊन तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट
राहण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 03 ते 09 मे दरम्यान पाऊस नाही, कमाल तापमान सरासरीएवढे ते
सरासरीपेक्षा कमी राहण्याची व 10 ते 16 मे दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीएवढे
ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 08 ते 14 मे 2024 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल
तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे
राहण्याची शक्यता आहे.
संदेश :
जमिनीतील ओलावा टिकून
राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी फळझाडाच्या आळयात आच्छादन
करावे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कमाल तापमानात वाढ होण्याचा
अंदाज लक्षात घेता, उन्हाळी तीळ पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी
द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म
सिंचन पध्दतीचा वापर करावा. सध्या हळदीची
काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करावीत.
फळबागेचे व्यवस्थापन
कमाल तापमानात वाढ होण्याचा
अंदाज लक्षात घेता, जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित
राहण्यासाठी संत्रा/मोसंबी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या
फळबागेमध्ये रोपांना शेडनेटच्या साहाय्याने सावली करावी जेणेकरून लहान रोपांचे
प्रखर उन्हापासून संरक्षण होईल. द्राक्ष बागेमध्ये
एप्रिल छाटणी ही घड निर्मितीसाठी केली जाते. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणी 15 मे
पर्यंत करता येते. कमाल
तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड केलेल्या फळबागेमध्ये
जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा
फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. नविन
लागवड केलेल्या फळबागेमध्ये रोपांना शेडनेटच्या साहाय्याने सावली करावी जेणेकरून
लहान रोपांचे प्रखर उन्हापासून संरक्षण होईल. काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची
काढणी शक्यतो सकाळी लवकर करून घ्यावी. कमाल
तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व
जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. बागेस सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे
पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करावा. नविन लागवड केलेल्या फळबागेमध्ये रोपांना शेडनेटच्या साहाय्याने सावली
करावी जेणेकरून लहान रोपांचे प्रखर उन्हापासून संरक्षण होईल.
भाजीपाला
काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला
पिकांची, कांदा, टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी लवकरात लवकर करावी. कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार
व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे.
पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा ठिबक) वापर करावा. टरबूज व
खरबूज पिकात फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास कामगंध सापळे वापरावेत. नविन
लागवड केलेल्या व लहान वेलवर्गीय झाडांना काठीने आधार द्यावा.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलांची
काढणी करून बाजार पेठेत पाठवावी. कमाल तापमानात वाढ
होण्याचा अंदाज लक्षात घेता, भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे.
पशुधन व्यवस्थापन
जनावरांना सावलीत बांधावे आणि
पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पूरवठा करावा. पशुधनाकडून सकाळी 11 ते दूपारी 4
यादरम्यान काम करून घेऊ नये. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या
छतावर गवताचे आच्छादन करावे. पशुधनाचे शेड पत्र्याचे किंवा सिमेंटचे असल्यास
त्याला पांढरा रंग द्यावा. पशुधनास मूबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त,
खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य द्यावे. तिव्र उष्णतेच्या काळात पशुधनाच्या अंगावर
पाणी शिंपडावे किंवा त्यांना पाणोठ्यावर
न्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे.
सामुदायिक विज्ञान
स्वस्थ जीवनासाठी आश्यक बाबी :
दररोज संतुलीत आहार घ्या. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. आहारात साखर आणि मीठाचा वापर कमी करा. तेल आणि
मसालेदार पार्थांचा वापर कमी करा. सकाळची न्याहरी करण्यास कधीच टाळाटाळ करु नका.
जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळा.
कृषि अभियांत्रिकी
रब्बी पिकांची काढणी झाल्यानंतर
शेतात लवकरात लवकर खोल नांगरणी करून घ्यावी. त्यामूळे जमिन तापन्यास मदत होऊन
किडींचे कोष व घातक बूरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील मातीचे माती
परिक्षण करून घ्यावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 10/2024
- 2025 शुक्रवार, दिनांक
– 03.05.2024
No comments:
Post a Comment