प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस
दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची
शक्यता आहे. दिनांक 07 मे रोजी नांदेड व लातूर जिल्हयात दिनांक 08 मे रोजी नांदेड,
लातूर व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट,
वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने
घट होऊन त्यानंतर कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला:
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 10 ते 16 मे दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीएवढे ते
सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 12 ते 18 मे
2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा जास्त, कमाल तापमान
सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
संदेश :
नविन लागवड केलेल्या फळबागेमध्ये
जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी
फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
तीन दिवसानंतर तूरळक ठिकाणी कमाल
तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, उशीरा पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग
पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी
किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा वापर करावा. पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी पावसाचा अंदाज लक्षात घेता वेळेवर पेरणी
केलेल्या व काढणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करावीत. पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी पावसाचा अंदाज
लक्षात घेता हळदीची उघड्यावर साठवण करू नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित
ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
तीन दिवसानंतर तूरळक ठिकाणी कमाल
तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व
जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी व आंबा फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. बागेस सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन
पध्दतीचा अवलंब करावा. नविन लागवड
केलेल्या फळबागेमध्ये रोपांना शेडनेटच्या साहाय्याने सावली करावी जेणेकरून लहान
रोपांचे प्रखर उन्हापासून संरक्षण होईल. काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची
काढणी शक्यतो सकाळी लवकर करून घ्यावी. काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी
शक्यतो सकाळी लवकर करून घ्यावी. द्राक्ष बागेमध्ये एप्रिल छाटणी ही घड
निर्मितीसाठी केली जाते. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणी 15 मे पर्यंत करता येते.
भाजीपाला
पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी
पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची, कांदा, टरबूज,
खरबूज इत्यादी पिकांची काढणी शक्यतो सकाळी लवकर करावी. तीन दिवसानंतर तूरळक ठिकाणी कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात
घेता, भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी
शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा
(तूषार किंवा ठिबक) वापर करावा. नविन लागवड केलेल्या व लहान वेलवर्गीय झाडांना
काठीने आधार द्यावा.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलांची
काढणी शक्यतो सकाळी करून बाजार पेठेत पाठवावी. तीन दिवसानंतर तूरळक ठिकाणी कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात
घेता, फुल पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे.
पशुधन व्यवस्थापन
तीन दिवसानंतर तूरळक ठिकाणी कमाल
तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, उन्हाळयात होणाऱ्या उष्माघाताचा ताण
टाळण्यासाठी जनावरांच्या शरीरावर दर अर्ध्या तासाने पाच मिनिटाकरीता पाणी
फवारण्यात यावे. कमाल
तापमानात झालेली वाढ व पुढील चार दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात
घेता, जनावरांना सावलीत बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पुरवठा
करावा. पशुधनाकडून सकाळी 11 ते दुपारी 4 या दरम्यान काम करून घेऊ नये. उष्णतेपासून
पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठयाच्या छतावर गवताचे आच्छादन करावे. पशुधनाचे शेड
पत्र्याचे किंवा सिमेंटचे असल्यास त्याला पांढरा रंग द्यावा. पशुधनास मुबलक
प्रमाणा हिरवा चारा, प्रथिनेयूक्त, खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य द्यावे. तिव्र
उष्णतेच्या काळात पशुधनाच्या अंगावर पाणी शिंपडावे किंवा त्यांना पाणवठयावर
न्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चरावयास सोडावे.
कुकुटपालन
तीन दिवसानंतर कमाल तापमानात वाढ
होण्याचा अंदाज लक्षात घेता, कुकुटपालन शेडमध्ये पाण्याची भांडी वाढवावीत व
पिण्यासाठी स्वच्छ आणि थंड पाण्याची मुबलक प्रमाणात व्यवस्था करावी. खाद्य सकाळी
किंवा संध्याकाळच्या वेळेस द्यावे. कोंबड्यांचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी
पोल्ट्री शेडच्या बाजुने बारदाणे लावावे व ते पाण्याने भिजवावे तसेच छतावर गवताचे
किंवा बारदाण्याचे आच्छादन करावे ज्यामूळे पोल्ट्री शेडचे तापमान नियंत्रीत
राहण्यास मदत होईल.
सामुदायिक विज्ञान
स्वस्थ जीवनासाठी आश्यक बाबी :
दररोज संतुलीत आहार घ्या. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. आहारात साखर आणि मीठाचा वापर कमी करा. तेल आणि
मसालेदार पार्थांचा वापर कमी करा. सकाळची न्याहरी करण्यास कधीच टाळाटाळ करु नका.
जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळा.
कृषि अभियांत्रिकी
रब्बी पिकांच कापणी झाल्यानंतर
शेतात नांगरणी करून घ्यावी. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील मातीचे माती परिक्षण करून
घ्यावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला
पत्रक क्रमांक – 11/ 2024- 2025 मंगळवार, दिनांक – 07.05.2024
No comments:
Post a Comment