प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 19 जुलै रोजी नांदेड जिल्हयात
तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जनेसह वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून
मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर जालना, परभणी, लातूर व हिंगोली जिल्हयात
तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 20 जुलै
रोजी नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जनेसह वाऱ्याचा वेग अधिक
(ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मुसळधार ते खूप मुसळधार स्वरूपाच्या पावसाची तर लातूर
व हिंगोली जिल्हयात मूसळधार स्वरूपाच्या पावसाची तर बीड, धाराशिव, छत्रपती संभाजी नगर, परभणी व
जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जनेसह वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30
ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक
21 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 22 व 23
जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 19 ते 25 जूलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा
जास्त व 26 जुलै
ते 01 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 24 ते 30 जूलै 2024 दरम्यान पाऊस
सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
संदेश :
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात तूरळक ठिकाणी
मुसळधार पावसाची शक्यता पाहता पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा
करण्याची व्यवस्था करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीन, खरीप ज्वारी, बाजरी
पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. सोयाबीन
पिकात पाने खाणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
5 % निंबोळी अर्क किंवा
अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 500 मिली प्रति एकर याप्रमाणे पावसाची उघाड बघुन फवारणी
करावी. सोयाबीन, खरीप ज्वारी, बाजरी, ऊस व हळद पिकात पाणी साचून राहणार नाही याची
दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. सूक्ष्म
अन्नद्रव्याच्या कमतरतेमूळे सोयाबीन पिक पिवळे दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 50 ग्रॅम किंवा 50 मिली + 19:19:19 खत 100 ग्रॅम प्रति
10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. सोयाबीन पिकाच्या
पानाच्या शिरा करपलेल्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 00:00:50 100
ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. खरीप ज्वारी
पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन
बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा
स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची
आलटून पालटून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक
पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. खरीप ज्वारी पाणी साचून राहणार नाही याची
दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. खरीप ज्वारी पिकास पेरणी करून 30
दिवस झाले असल्यास 40 किलो नत्र प्रति हेक्टरी वर खताची मात्रा द्यावी. ऊस पिकात
हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली
या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त
प्रादुर्भाव असल्यास 10 किलो) प्रति
एकर जमिनीतून वापर करावा. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी पावसाची उघाड
बघुन करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू
बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा
निचरा करावा.डाळींब बागेतील अतिरिक्त फुटवे काढून घ्यावेत.
भाजीपाला
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला
पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला
पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.
भाजीपाला पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त
पाण्याचा निचरा करावा.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची
काढणी करून घ्यावी. फुल पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण
विरहीत ठेवावे. फुलपिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या
अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
चारा पिके
चारा पिकात जमिनीत वापसा असतांना
अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. चारापिकात पाणी साचून राहणार नाही याची
दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळयात पशुचे खाद्य नियोजन
व्यवस्थित ठेवावे व जनावरांचे खाद्य स्वच्छ व कोरडे असावे. जनावरांच्या गोठयात
जिवजंतूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी वेगवेगळया आजाराच्या विशेष
संसर्गजन्य आजार प्रतिबंधक लसीकरण पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने वेळेवर
करून घ्यावे.
तुती रेशीम उद्योग
रेशीम कीटक संगोपनात स्वच्छतेला
अनन्य साधारण महत्व आहे. हात स्वच्छ धुवूनच संगोपनगृहात प्रवेश करावा पादत्राणे
गोणपाटाचे असतिल तर 2% फॉरमॅलीन मध्ये
बूडवून निर्जंतूक करावे व वेगळी स्लीपर/चप्पल संगोपन गृहासाठी वापरावी. किटकनाशक,
बुरशीनाशक, तणनाशक किंवा खत पेरणी/फवारणी करून आल्यानंतर संगोपनगृहात लगेच प्रवेश
करू नये. रेशीम कीटकांना फांद्या खाद्य द्यावे. अळ्यांना हात लागणार नाही याची
काळजी घ्यावी. संगोपन गृहात कोबा/सिमेंट काँक्रेटची फरशी करून घ्यावी. चोही बाजून
अर्धा फुट खोल नाली करावी म्हणजे प्रत्येक रेशीम कीटक संगोपनानंतर निर्जंतूकीकरण
करणे सोईचे होइल. 0.3 टक्के कळीचा चुना + 0.2 टक्के ब्लीचिंग पावडर म्हणजे 100
लिटर पाण्यात 300 ग्रॅम चुना व 2 कि.ग्रॅ. ब्लिचींग पावडरची रॅकवर, जमिनीवर व
शेडनेटवर फवारणी करून घ्यावी.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 32/2024
- 2025 शुक्रवार, दिनांक
– 19.07.2024
No comments:
Post a Comment