प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 04 एप्रिल रोजी बीड, धाराशिव, नांदेड,
हिंगोली, लातूर व परभणी जिल्हयात तर दिनांक 05 एप्रिल रोजी लातूर व धाराशिव
जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक
(ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात
दिनांक 06 ते 08 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता
आहे. पुढील चोवीस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू
3 ते 4 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील चोविस तासात किमान तापमानात फारशी तफावत
जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 04 ते 10 एप्रिल 2025 दरम्यान पाऊस
सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा
कमी व दिनांक 11 ते 17 एप्रिल 2025 दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व
किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात
बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
संदेश : पुढील पाच
दिवस तूरळक ठिकाणी पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी व मळणी केलेल्या मालाची
सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी
द्यावे. ऊस पिकात खूरपणी करून तण नियंत्रण
करावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा
क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. ऊस
पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी
डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या हळद पिकाची
काढणी करून घ्यावी व काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक
करावी. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे ही कामे सुरु असून पावसाचा अंदाज पाहून
हळदीची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. उन्हाळी
तीळ पिकास मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी व भारी जमिनीत 12 ते 15 दिवसांच्या
अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तूषार सिंचन पध्दतीने करावे.
फळबागेचे व्यवस्थापन
काढणीस तयार असलेल्या मृग बहार
संत्रा/मोसंबी फळांची काढणी करून घ्यावी. संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार सकाळी
किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेत 00:52:34 15 ग्रॅम +
5 ग्रॅम चिलेटेड झिंक प्रति लिटर पाण्यात मिसळून
पावसाची उघाड बघून फवारणी करावी. वादळी वारा व पावसामूळे फळबागेत पडलेली फळे गोळा
करून नष्ट करावीत, तसेच मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी. नवीन लागवड केलेल्या व
लहान फळ झाडांना काठीने आधार द्यावा. डाळींब
बागेत आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. वादळी वारा व पावसामूळे
फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत, तसेच मोडलेल्या फांद्यांची छाटणी
करावी. नवीन लागवड केलेल्या व लहान फळ झाडांना काठीने आधार द्यावा. काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या
चिकू फळांची काढणी करावी. चिकू बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. वादळी वारा व पावसामूळे
फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत, तसेच मोडलेल्या फांद्यांची छाटणी
करावी. नवीन लागवड केलेल्या व लहान फळ झाडांना काठीने आधार द्यावा.
भाजीपाला
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला
पिकांची काढणी करावी. उन्हाळी भाजीपाला पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन
करावे. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)
पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या
व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10
मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची
उघाड बघून फवारणी करावी. वेलवर्गीय झाडांना काठीने आधार द्यावा. वादळी वारा व
पावसामूळे प्रादूर्भाव ग्रस्त भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज गोळा करून नष्ट करावीत.
फुलशेती
फुल पिकात खूरपणी करून फुल पिक
तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या
फुलांची काढणी करावी.
तुती रेशीम उद्योग
रेशीम किटकाद्वारे चौथी कात
टाकून परिपूर्ण वाढ झाल्यानंतर कोष न करणे ही समस्या छ. संभाजी नगर, जालना, धाराशिव
व परभणी जिल्हयातील काही शेतकऱ्यांच्या शेतावर दिसून आली. जमिनीत तुती लागवडीपूर्वी
कोणते पीक घेतले होते व त्या पीकात रासायनिक खत किंवा किटकनाशकांचा अती वापर झाला
असेल उद. कोराझीन सारख्या किटकनाशकाचा वापर केला असेल किंवा जासत युरीया, डीएपी किंवा
मिक्स खते, तणनाशके वापरली असतील तर अळी अखुड होते, अळीने कोष न करणे अशा प्रकारची
लक्षणे वाढीच्या शेवटच्या अवस्थेत दिसतात व पूर्ण पीक काही शेतकऱ्यांचे वाया जाते व प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून शिफारस
केलेले 20 टन शेणखत किंवा 5 टन गांडूळखत प्रती हेक्टर प्रती वर्ष घालणे आवश्क आहे.
पशुधन व्यवस्थापन
आपल्या पशुंना उन्हामध्ये बांधु
नका (निदान तिव्र उन्हाच्या कालावधीमध्ये त्यांना झाडाखाली/सावलीमध्ये किंवा
शेड/गोठ्यामध्येच बांधणे चांगले). पशुंना शक्यतो थंड/स्वच्छ/मुबलक पाणी दोन-तिन
वेळेस पाजावे. पाण्यामुळे पशुंच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (डीहायड्रोजन)
होणार नाही. जमल्यास पाण्यामधून क्षार द्यावेत, 5 लिटर पाण्यामध्ये चिमुटभर गुळ (25 ग्रॅम), थोडे मिठ (5-10 ग्रॅम) आणि 5 ग्रॅम क्षार
मिश्रण दिल्यास उत्तम, मात्र नजीकच्या पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच व्यवस्थापन करावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 02/2025
- 2026 शुक्रवार, दिनांक
– 04.04.2025
No comments:
Post a Comment