हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस आकाश
स्वच्छ राहून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील 48 तासात कमाल तापमानात
फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची तर
पुढील तीन ते चार दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 10 ते 16 ऑक्टोबर, 2025 दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी
व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचीत कमी व दिनांक 17 ते 23 ऑक्टोबर, 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा
कमी तर कमाल
तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचीत कमी राहण्याची शक्यता आहे.
संदेश : पुढील पाच
दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता, फवारणीची, काढणीची व
अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
काढणीस तयार असलेल्या सोयाबीन
पिकची काढणी लवकरात लवकर करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेले सोयाबीन पिक वाळल्यानंतर मळणी करावी.
जमिनीत साचलेल्या पाण्यामुळे किंवा
ओलाव्या मुळे तूर पिकात फायटोप्थेरा रोग मोठ्या प्रमाणात पसरतो, प्रादूर्भाव दिसून आल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी 500 ग्रॅम
(25 ग्रॅम
प्रति 10 लिटर पाण्यात)
मेटालॅक्झील एम 4 टक्के + मॅन्कोझेब 64 टक्के (पुर्व मिश्रीत बुरशीनाशक)
प्रति एकर या प्रमाणात खोडावर आणि झाडावर फवारणी करून आळवणी पण करावी. किंवा ट्रायकोडर्मा
500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) पाण्यात मिसळून प्रति एकर या प्रमाणात फवारणी व आळवणी करावी. जमिनीत वापसा असतांना तूर पिकात
तण नियंत्रण करावे.
उस पिकात पांढरी माशीचा व
पाकोळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी, लिकॅनीसिलियम
लिकॅनी या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून फवारणी
करावी. रासायनिक कीटकनाशकामध्ये क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 30 मिली
किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 3 मिली किंवा ॲसीफेट 75
% 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारावे. इमिडाक्लोपीड 17.8% कीटकनाशकासोबत 2 टक्के
युरिया (200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) मिसळून फवारणी करावी. ऊस पिकात पोक्का बोइंग या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्ल्यूपी 50 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 50%
डब्ल्यू पी 20 ग्रॅम प्रति
10 लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह 10 ते 12 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या
कराव्यात.
कंदकूजचा प्रादूर्भाव दिसून
आल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी जमिनीतून कार्बेडेंझीम 50% -200 ग्रॅम (10 ग्रॅम
प्रति 10 लिटर पाण्यात)
किंवा मॅन्कोझेब 75% -600 ग्रॅम
(30 ग्रॅम
प्रति 10 लिटर पाण्यात)
किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड 50% -1000 ग्रॅम
(50 ग्रॅम
प्रति 10 लिटर पाण्यात) यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकरी या प्रमाणात दरवेळी महिन्यातून एकदा आळवणी
करावी. (आळवणी करताना जमिनीमध्ये
वापसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास पाण्याचा थोडा ताण द्यावा.) हळद पिकास 25
किलो नत्र प्रति हेक्टरी सूक्ष्म सिंचन पध्दतीने तीन ते चार वेळा विभागून द्यावे.
हरभरा पिकाची पेरणी 30X10 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी लहान आकाराच्या देशी
वाणासाठी 60 किलो, मध्यम आकाराचे बियाणे 70 किलो तर टपोरे दाण्याच्या काबूली
वाणासाठी 100 किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. हरभरा पिकाच्या पेरणीसाठी
बीडीएनजी-9-3, बीडीएनजी-797 (आकाश), दिग्विजय, जाकी-9218, साकी-9516, फुले विक्रम,
फुले विक्रांत, पीडीकेव्ही कांचन, विश्वास इत्यादी वाणांपैकी निवड करावी.
करडई पिकाची पेरणी 45X20 सेंमी
अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 10 ते 12 किलो बियाणे वापरावे. करडई पिकाच्या
पेरणीसाठी शारदा, परभणी कुसुम (परभणी-12), पूर्णा (परभणी-86), परभणी-40 (निम
काटेरी), अन्नेगीरी-1, एकेएस-327, एसएसएफ-708,आयएसएफ-764 इत्यादी वाणांपैकी निवड
करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत 00:00:50 1.5किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
संत्रा/मोसंबी बागेत रोगनाशकाची फवारणी करून घ्यावी.
डाळींब बागेत 00:00:50 1.5 किलो प्रती 100 लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या डाळींब फळांची काढणी करून घ्यावी.
काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी व सुरक्षित
ठिकाणी साठवणूक करावी.
भाजीपाला
रब्बी हंगामात ब्रोकोली, टोमॅटो, फुल कोबी व पत्ता कोबी या
भाजीपाला पिकाचे गादी वाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी टाकावे तर मुळा, गाजर,
मेथी व पालक ईत्यादी पिकाची लागवड करून घ्यावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला
पिकाची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
आष्टूर व जिलार्डीया या फुलपिकाची लागवड करण्यासाठी गादीवाफ्यावर
रोपे तयार करण्यासाठी बी टाकावे. लांब दांड्यांच्या फुलाची (गुलाब) काढणी करतांना
कळी उमलण्याच्या अवस्थेत असतांना काढणी करावी तर झेंडू, आष्टूर या सारख्या फुलांची
काढणी पूर्ण उमलल्याच्या नंतर करावी.
तुती रेशीम उद्योग
भरपूर रेशीम उद्योजक शेतकरी तूती बागेस पशूधन व शेणखत उपलब्ध
नसल्यामूळे देण्याचे टाळत आहेत आणि पर्यायी बाजारात उपलब्ध जाहिरातीच प्रभावामूळे
तुती बागेत इतर निविष्ठा देत आहेत. जमिनीची प्रत खराब होण्यामध्ये मोठ्या
प्रमाणावर जबाबदार रासायनिक खतच आहेत. नऋयुक्त खताच्या अनिर्बंध वापर वाढला असून
त्यामूळे कपाशी, सोयाबीन सारखे पीके किडीस बळी पडत आहेत. रेशीम किटक संगापनानंतर
तुतीची पाने, फांद्या, रेशीम कीटक विष्ठा प्रती एकर 6 टन तर हेक्टरी 15 टन पर्यंत
शिल्लक राहते. त्यापासून कंम्पोस्ट खत किंवा गांडूळखत तयार करता येतो त्यासाठी 16 X 8 X 4 फुट आकाराच्या दोन खड्डयात 6 महिने तुतीचे
शिल्लक अवशेष कुजवल्यास उत्तम प्रकारचा खत तयार होतो.
पशुधन व्यवस्थापन
दुधावरील जनावरांना योग्य प्रमाणात खनिज द्राव्याचे मिश्रण द्यावे
तसेच हिरवा चारा (बरसीम/लुसर्ण) व सुका चारा (गव्हाचा पेंढा) यांचे पशुधनांना
संतुलित आहार द्यावा. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य वेळी जंतनाशकाची औषधे
देण्यात यावी.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 56/2025
- 2026 शुक्रवार, दिनांक
– 10.10.2025
No comments:
Post a Comment