प्रादेशिक
हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 29 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी
वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दिनांक 30 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्हयात तुरळक
ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवसात
औरंगाबाद, जालना, हिंगोली जिल्हयात खूप हलका ते मध्यम तर बीड, उस्मानाबाद व परभणी
जिल्हयात हलका ते मध्यम तसेच लातूर व नांदेड जिल्हयात मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता आहे.
दिनांक 29 व 30
ऑगस्ट रोजी पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या मूग/उडीद पिकाची काढणी
करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेले पिक पावसात भिजणार नाही याची
काळजी घ्यावी.
विस्तारीत
अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 01 सप्टेंबर ते 07
सप्टेंबर, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस
सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीन पिकावरील उंट अळी व तंबाखूवरील पाने खाणारी
अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी फ्लुबेंडामाईड 39.35 एससी 3 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 ईसी 20
मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 15.8 एससी 3 मिली किंवा थायमिथोक्झाम 12.6 + लॅमडा साहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 2.5 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. सोयाबीन पिकावरील शेंगा करपाच्या उपाययोजनेसाठी
सोयाबीन पिकावर टेब्यूकोनॅझोल 10% डब्ल्यूपी + सल्फर 65% डब्ल्यूजी 15 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी
करावी. खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम
11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास वरील
किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.
फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. बाजरी
पिकात तणांचे नियंत्रण करावे.ऊस पिकात हूमणीच्या अळ्या दिसून
येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो
(जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5%
4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी
करावी. हळदीच्या पानावरील ठिपके याच्या
व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली +
5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी
करावी. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव
दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25%
20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून पावसाने उघाड दिल्यास फवारणी
करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून
घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे
विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी फळबागेत फळ गळ होऊ नये
म्हणून जिब्रॅलिक ॲसिड 50 पीपीएम ची (5 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात
मिसळून) पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी.मृगबहार धरलेल्या बागेत बूरशीजन्य
रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून बोर्डो मिश्रण 0.5% पावसाने
उघाड दिल्यास फवारावे. तेलकट रोग व्यवस्थापनासाठी ब्रोनोपॉल 25 ग्रॅम प्रति 100
लिटर पाणी याप्रमाणे पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. चिकू बागेत तणांचे व्यवस्थापन करावे.
भाजीपाला
टोमॅटो पिकावरील लवकर येणार करपा
याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी
करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला
पिकाची काढणी करावी. भाजीपाला पिकातील तणांचे व्यवस्थापन करावे.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी
करून घ्यावी. फुलपिकातील तणांचे व्यवस्थापन करावे.
चारा पिके
चारा
पिकासाठी लागवड केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत
असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत व 5% निंबोळी अर्काची पावसाने
उघाड दिल्यास फवारणी करावी.
तुती रेशीम
उद्योग
रेशीम किटकाच्या वाढीच्या चौथ्या
अवस्थेनंतर चौथी कात अवस्थेपूर्वी ढगाळ हवामानात फांदी खाद्य देण्यापूर्वी रॅकवर
100 अंडी पूंजासाठी 10 ते 15 किलो 10-12 दिवसात पांढरा चूना व कात पास
होण्यापूर्वी विजेता निर्जंतूक 4 किग्रॅ धूरळणी करावी. एक दिवस आड धूरळणी करावी.
पावसाळयात संगोपन गृहातील आर्द्रता 85% पेक्षा जास्त राहते त्यामूळे रॅकवर
शिल्लक अळीची विष्टा व कोष विणण्याअगोदर मूत्र विसर्जन केल्यानंतर तयार होणारे
गॅसेस कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड निर्मिती होते हे
कमी होण्यासाठी संगोपन गृहात हवा खेळती असावी (1 मी. प्रति सेकंद प्रमाणे) पक्कया
संगोपन गृहात एक्झॉस्ट फॅन दोन्ही बाजूने सुरू ठेवावेत. भिंतीवरील खिडक्या उघडया
कराव्यात व खालच्या बाजूने झरोके मोकळे असावेत. जास्त तापमान व जास्त आर्द्रता
असेल तर ग्रासरी व फ्लॅचरी रोग बळावतो. अळीचे मनके सूजल्यासारखे दिसतात अळी दूधाळ
रंगाची दिसते. पोचट कोष बनवते किंवा मृत पावते.
सामुदायिक विज्ञान
कामाचे पूर्व नियोजन केल्यास कामातील
गोंधळ कमी होऊन ठराविक वेळेत व कमी कष्टात काम पूर्ण होऊ शकते.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 43/
2021 - 2022 शुक्रवार, दिनांक – 27.08.2021
No comments:
Post a Comment