प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार दिनांक 08 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40
किलोमीटर) राहून जोरदार पावसाची तर नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी व हिंगोली
जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा,
विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40
किलोमीटर) राहून पावसाची शक्यता आहे. दिनांक 09 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद
व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40
किलोमीटर) राहून पावसाची शक्यता आहे. दिनांक 10 ऑक्टोबर रोजी
उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40
किलोमीटर) राहून पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात पूढील दोन ते तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होईल.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 08 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी
राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
पावसामूळे सोयाबीन पिकात पाणी साचून
राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून
द्यावे. शेतकऱ्यांनी काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाची काढणी पावसाची उघाड बघून करून
घ्यावी. काढणी शक्यतो सकाळी लवकर सुरू करून ढीग तयार करून सायंकाळपूर्वी तो झाकून
ठेवावा म्हणजे संध्याकाळी पडणाऱ्या पावसामूळे सोयाबीन भिजणार नाही.पावसामूळे खरीप ज्वारी पिकात पाणी
साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर
काढून द्यावे.पावसामूळे बाजरी पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे.पावसामूळे ऊस पिकात पाणी
साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर
काढून द्यावे.पावसामूळे हळद पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. हळदीच्या पानावरील ठिपके याच्या
व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली +
5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची
उघाड बघून फवारणी करावी. हळद पिकात
कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या
अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 %
10 मिली प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून
घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे
विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले
आहेत).
फळबागेचे व्यवस्थापन
पावसामूळे संत्रा/मोसंबी बागेत पाणी
साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेत साचलेले अतिरिक्त पाणी बागेबाहेर
काढून द्यावे.पावसामूळे डाळींब बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
बागेत साचलेले अतिरिक्त पाणी बागेबाहेर काढून द्यावे.पावसामूळे चिकू बागेत पाणी
साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेत साचलेले अतिरिक्त पाणी बागेबाहेर
काढून द्यावे.
भाजीपाला
पावसामूळे भाजीपाला पिकात पाणी साचून
राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून
द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून बाजारपेठेत पाठवावीत.
सध्याच्या ढगाळ व दमट वातावरणामूळे काकडीवर्गीय भाजीपाला पिकात केवडा व भूरी
रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. काकडीवरील भूरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी
मायक्लोब्यूटॅनील 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. तसेच केवडा रोगाच्या व्यवस्थापनासाठी मेटालॅक्सील + मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची
उघाड बघून फवारणी करावी. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव
दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन
15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड
बघून फवारणी करावी.
फुलशेती
पावसामूळे फुल पिकात पाणी साचून राहणार
नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे.
सध्या नवरात्र व पूढे येणाऱ्या दसरा उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी
असते. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून
बाजारपेठेत पाठवावी.
चारा पिके
पावसामूळे चारा पिकात पाणी साचून
राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून
द्यावे.
तुती रेशीम उद्योग
पावसाळयात पाणथळ जमिनीत किंवा खोल
जमिनीत तुती लागवडीत पाणी साठून राहता कामा नये असे झाल्यास आर्द्रता वाढल्यामूळे
पानावर बुरशिजन्य रोगाचा (भूरी) प्रादूर्भाव होतो व पानाची प्रत खराब होते रेशीम
कीटकास रोग प्रादूर्भाव होण्याची दाट शक्यता असते त्यामूळे पिकात साचलेले अतिरिक्त
पाणी शेताबाहेर काढून द्यावे.
सामुदायिक विज्ञान
घराच्या आसपास तलाव, नाला किंवा डबकी
नसावेत. कारण त्यामूळे जमिनीत पाणी साचून घराला ओल येऊन हवेतील आर्द्रता वाढते आणि
धान्य तसेच अन्नपदार्थास लवकर बुरशी येते.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 55
/ 2021 - 2022 शुक्रवार, दिनांक - 08.10.2021
No comments:
Post a Comment