Wednesday 17 November 2021

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात दिनांक 18 नोव्हेंबर रोजी तर बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात दिनांक 19 नोव्हेंबर रोजी तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40 किलोमिटर) राहून पावसाची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात दिनांक 18 नोव्हेंबर रोजी तर बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात दिनांक 19 नोव्हेंबर रोजी तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40 किलोमिटर) राहून पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात पुढील दोन ते तिन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणावणार नाही.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या माहितीनुसार मराठवाडयात सध्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला दिसून येत आहे म्हणून रब्बी पिके, फळबाग, भाजीपाला, फुलझाडे व चारापिके यांना पाणी देण्याची गरज आहे जेणेकरून पिकांना पाण्याचा ताण बसणार नाही.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 24 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची, किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

तापमानात झालेल्या वाढीमूळे हरभरा पिकात आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. हरभरा पिकात एकरी दोन कामगंध सापळे लावावेत. बागायती गहू (उशीरा) पेरणी पूर्वी बियाण्यास थायरम या बूरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया तसेच 250 ग्रॅम अझोटोबॅक्टर  व 250 ग्रॅम स्फूरद विरघळणारे जिवाणू प्रति 10 किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.तापमानात झालेल्या वाढीमूळे रब्बी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसा तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.ऊस पिकात तणनियंत्रणासाठी लागवडी नंतर व उगवणीपूर्वी 2.5 किलो ॲट्रॅझीन 700 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी.मागील काही दिवसात ढगाळ वातावरणामूळे हळद पिकावर पानावरील ठिपके रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).

 फळबागेचे व्‍यवस्‍थापन

लिंबूवर्गीय  फळपिकात पाने पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा इमिडाक्लोप्रीड 17.8% 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. लिंबूवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा प्रापरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. डाळींब बागेत फळांनी भरलेल्या फांद्यांना आधार देण्यासाठी योग्य स्टॅकिंग किंवा आधार करावा. जर मृग बहार लवकर घतला असेल आणि फळ पूर्ण पक्व होऊन सालीचा व दाण्यांचा रंग विकसीत झाला असेल तर फळगळ आणि बूरशीचे डाग टाळण्यासाठी वेळेत फळांची तोडणी करावी.काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी.

 

भाजीपाला

मागील काही दिवसातील ढगाळ व दमट वातावरणामूळे भाजीपाला पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहेत. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी. पूर्नलागवड केलेल्या शेवंती, जिलारडीया फुलपिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

चारा पिके

रब्बी हंगामासाठी लागवड केलेल्या ज्वारी, ओट, बरसीम, लसूण घास इत्यादी चारा पिकांना आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

तुती रेशीम उद्योग

ज्या शेतकऱ्याच्या शेतात पूर्वी तंबाखू, मिरची, भाजीपाला पिक असेल त्या ठिकाणी तूतीची लागवड करू नये. त्या जमिनीत रोग कारक बळावलेले असल्याने तुतीची रोपे मृत पावतात. पूर्वीच्या पिकास दिलेल्या कीटकनाशकाचा अंश तूतीच्या पानामध्ये येतो आणि तुती पाने रेशीम किटकास खाद्य म्हणून दिल्यानंतर अळया मृत पावतात. दाणेदार किंवा रासायणीक किटकनाशके रेशीम किटकाच्या मृत्यूचे कारण ठरते आहे. त्याच बरोबर जास्त रासायणीक नत्रयूक्त खत मात्रा तुतीला देण्याची शिफारस नाही. उदा. डीएपी.

सामुदायिक विज्ञान

गर्भावस्थेत सुरूवातीच्या दोन महिन्यात गर्भाचे प्रमुख अवयव जसे की ऱ्हदय, मज्जातंतू नलिका, डोळे, नाक, कान, हात, पाय यांच्या प्राथमिक विकसनास सुरूवात होते. त्यामूळे अगदी सुरूवातीपासून गर्भवतीची सर्वतोपरी काळजी घेणे नितांत गरजेचे आहे.

 

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक67/2021 - 2022      गुरूवार, दिनांक - 18.11.2021

 

No comments:

Post a Comment

दिनांक 14 मे रोजी बीड व छत्रपती संभाजी नगर जिल्हयात व दिनांक 15 मे रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 ते 60 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. दिनांक 14 मे रोजी लातूर, धाराशिव, जालना व परभणी जिल्हयात तर दिनांक 15 मे बीड, धाराशिव व जालना जिल्हयात तर दिनांक 16 मे रोजी धाराशिव, लातूर, बीड जिल्हयात व दिनांक 17 मे रोजी धाराशिव, लातूर व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 मे रोजी बीड व छत्रपती संभाजी नगर ज...