प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 4 ते 5 दिवस कमाल
तापमानात फारशी तफावता जाणवणार नाही. दिनांक 05 एप्रिल रोजी उसमानाबाद, लातूर व
नांदेड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी
30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवस
आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 10 एप्रिल ते 16 एप्रिल, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची
शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणी व मळणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकाची मळणी करूण साठवणूक करावी. बाष्पोत्सर्जनाचा वाढलेला वेग लक्षात घेता उन्हाळी भुईमूग पिकास आवश्यकतेनूसार ठिबक किंवा तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणी व मळणी केलेल्या करडई पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेल्या करडई पिकाची मळणी करूण साठवणूक करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे
केळी बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकतेनुसार बागेत
सकाळी किंवा सायंकाळी ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. कमाल तापमानात होत
असलेल्या वाढीमुळे आंबा बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी.
आवश्यकतेनुसार बागेत सकाळी किंवा सायंकाळी ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून
संरक्षणासाठी सावली करावी यामुळे कलमांची मर होणार नाही. आंबा फळबागेत फळांचा आकार
वाढवण्यासाठी व फळगळ होऊ नये म्हणून जिब्रॅलिक ॲसिड 5 ग्रॅम तसेच 13:00:45 1.5
किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी. द्राक्ष बागेमध्ये एप्रिल छाटणी ही घड निर्मितीसाठी केली जाते.
द्राक्ष बागेत एप्रिल छाटणीची पुर्व तयारी करून घ्यावी.
भाजीपाला
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे
भाजीपाल पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा
सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला
पिकाची काढणी सकाळी लवकर करावी. मिरची पिकावरील फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी
इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम किंवा फेनप्रोपॅथ्रिन 30% ईयी 3.5 मिली किंवा स्पिनोसॅड 45% एसएल 3.2 मिली
किंवा फिप्रोनिल 5% एससी 20 मिली किंवा ॲसिटामाप्रीड 7.7%
एससी 8 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी
करावी.
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे
फुल पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी
सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस
तयार असलेल्या फुलांची काढणी सकाळी लवकर करावी.
पशुधन व्यवस्थापन
वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट
वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम
स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी
बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा
नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व
पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबु नये.
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे जनावरांना
सावलीत बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पूरवठा करावा. पशुधनाकडून
सकाळी 11 ते दूपारी 4 यादरम्यान काम करून घेऊ नये. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण
करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे. पशुधनाचे शेड पत्र्याचे किंवा
सिमेंटचे असल्यास त्याला पांढरा रंग द्यावा. पशुधनास मूबलक प्रमाणात हिरवा चारा,
प्रथिनेयूक्त, खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य द्यावे. तिव्र उष्णतेच्या काळात
पशुधनाच्या अंगावर पाणी शिंपडावे किंवा
त्यांना पाणोठ्यावर न्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे.
सामुदायिक विज्ञान
स्वस्थ जीवनासाठी आश्यक बाबी : दररोज
संतुलीत आहार घ्या. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. आहारात साखर आणि मीठाचा वापर कमी करा. तेल आणि
मसालेदार पार्थांचा वापर कमी करा. सकाळची न्याहरी करण्यास कधीच टाळाटाळ करु नका.
जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळा.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 2
/ 2022 - 2023 मंगळवार, दिनांक – 05.04.2022
No comments:
Post a Comment