प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 21 जून रोजी जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 22 जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे.
पेरणी योग्य पाऊस होण्याची वाट पाहावी व पेरणी
योग्य पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी.
विस्तारीत अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक (ईआरएफएस) 24 जून ते 30 जून, 2022 दरम्यान पाऊस
सरासरीपेक्षा जास्त राहण्याची
शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कोरडवाहू बिटी कापसाची लागवड 120 X 45 सें.मी. अंतरावर करता येते. लागवडीसाठी 2.5 ते
3.0 कि. ग्रॅ. प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. कापूस पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत
करता येते. कोरडवाहू तूरीची लागवड 90 X 20 ते 30 सें.मी.
अंतरावर करता येते. बागायती तूरीची लागवड 90 X 90 सें.मी.
टोकन पध्दतीने करता येते. कोरडवाहूसाठी हेक्टरी 12 ते 15 कि.ग्रॅ. बियाणे तर
बागायती टोकन पध्दतीने लागवडीसाठी 5 ते 6 कि.ग्रॅ. प्रति हेक्टरी बियाणे वापरावे.
तुर पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. मूग व उडीद पिकाची पेरणी 30 X
10 सें.मी. अंतरावर करता येते. पेरणीसाठी हेक्टरी 12 ते 15 कि.ग्रॅ.
बियाणे वापरावे. मूग/उडीद पिकाची पेरणी जूलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते. भुईमूग
पिकाची पेरणी 30 X 10 सें.मी. (उपट्या) तर 45 X 15 सें.मी. (पसऱ्या) अंतरावर करता येते. पेरणीसाठी हेक्टरी 100 ते 200
कि.ग्रॅ. उपटया तर 80 कि.ग्रॅ. पसऱ्या जातीचे बियाणे वापरावे. भुईमूग पिकाची पेरणी
7 जूलै पर्यंत करता येते. मका पिकाची पेरणी 60 X 30 सें.मी.
अंतरावर करता येते. पेरणीसाठी हेक्टरी 15 किलो बियाणे वापरावे. मका पिकाची पेरणी
जूलै अखेर पर्यंत करता येते.
फळबागेचे व्यवस्थापन
जून्या केळी बागेत आंतर मशागतीची कामे
पूर्ण करून घ्यावी. केळीच्या घडांना काठीचा आधार द्यावा. बागेतील
वाळलेली पाने काढून टाकावीत. आंबा फळबागेत 500:500:500 ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश
प्रति झाड खतमात्रा दिली नसल्यास द्यावी. झाड दहा वर्षापेक्षा मोठे असल्यास
1000:500:500 ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश प्रति झाड खतमात्रा द्यावी. वाळलेल्या व
रोगग्रस्त फांद्यांची छाटणी करावी. द्राक्ष बागेतील फुटवे काढावेत. बागेत पानांची
विरळणी करावी. सिताफळ बागेत 300:300:300 ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश प्रति झाड
खतमात्रा द्यावी.
भाजीपाला
भाजीपाल्याचे बी टाकलेल्या गादी
वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार
असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा
कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते
मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची
लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान
झाडांना आधार द्यावा.
फुलशेती
फुलपिकाचे बी टाकलेल्या गादी
वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार
असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट,
वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस
तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.
पशुधन
व्यवस्थापन
पशुधनात (गाय, म्हैस) यांना
लसीकरणाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. 1. लाळ्या खुरकूत रोगाचे लसीकरण वर्षातून
दोन वेळा लसीकरण करावे. 2. घटसर्प आणि फऱ्या रोगाचे (एकत्रित किंवा स्वतंत्र)
पावसाळा सुरू होण्यापूर्वी लसीकरण करावे. 3. ब्रुसेललोसीस कॉटन प्रजाती 19 (3 ते 4
महिने) वयोगटातील वासरांसाठी. 4. फाशी रोग होत असलेल्या विभागात फाशी रोगाची लस 2
ते 3 किलोमिटर परिसरातील पशुधनास चक्राकार पध्दतीने करावे. वादळी वारा, मेघगर्जना,
विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या
ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा
बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी
बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा
नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व
पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या
आडोशाला थांबू नये.
सामुदायिक विज्ञान
मधूमेह असणाऱ्या व्यक्तींनी
रोजच्या आहारात तंतूमय युक्त अन्न पदार्थांचा जसे की, भगर, बाजरी, नाचनी, राजमा,
चवळी, मटकी, सोयाबीन, मेथीची भाजी, राजगिऱ्याची भाजी आणि शेवग्याची पाने यांचा
वापर करावा. त्यामूळे रक्तातील वाढणारी साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 24
/ 2022 - 2023 मंगळवार, दिनांक – 21.06.2022
No comments:
Post a Comment