प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 28 व 29 जून रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्हयात तर दिनांक 30 जून रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात
दिनांक 28 जून ते 02 जुलै दरम्यान
बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात
ज्या तालूक्यात पेरणी योग्य मौसमी पाऊस (75-100 मिमी) झाला असल्यास (औरंगाबाद
जिल्हा : गंगापूर, खुलताबाद, सोयगाव, औरंगाबाद, कन्नड, पैठण, फुलंब्री, शिल्लोड, वैजापूर ; बीड जिल्हा : आंबाजोगाई,
माजलगाव, परळी, वडवणी, धारूर, केज ;
हिंगोली जिल्हा :
कळमनूरी ; जालना
जिल्हा : भोकरदन, मंठा, अंबड, परतूर ; परभणी जिल्हा : गंगाखेड, मानवत, पालम, परभणी, सोनपेठ, सेलू, पाथरी, पूर्णा ;
नांदेड जिल्हा : देगलूर,
मुदखेड, मुखेड, नांदेड, उमरी, हिमायतनगर, किनवट, धर्माबाद, कंधार, लोहा, माहूर ;
लातूर जिल्हा : अहमदपूर,
चाकूर, देवणी, जळकोट,
रेणापूर, शिरूर अनंतपाल, उदगीर, लातूर, निलंगा उस्मानाबाद : भूम, वाशी) जमिनीतील
ओलावा बधून बिजप्रक्रिया करूनच पेरणी
करावी.
सॅक, इसरो
अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय
छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे.
पेरणीयोग्य पाऊस न झालेल्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस
होण्याची वाट पाहावी व पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कापूस बियाण्यास
थायरम/कॅप्टन/सुडोमोनास या बूरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात
बिजप्रक्रिया करावी. यामूळे मर व करपा यासारख्या रोगांचा प्रादूर्भाव कमी होतो.
नत्र स्थिरीकरणासाठी ॲझोटोबॅक्टर/ॲझोस्पिरीलम या जिवाणू संवर्धकाची 10 मिली प्रति
किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. कापूस पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते.
पेरणीपूर्वी तूर बियाण्यास 2.5 ग्रॅम थायरम किंवा बाविस्टीन 2 ग्रॅम प्रति किलो
बियाण्यास चोळावे यामूळे जमिनीतून उदभवणाऱ्या विविध रोगापासून पिकाचा बचाव होतो.
पेरणीपूर्वी बियाण्यास 10 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया
करावी यानंतर 250 ग्रॅम रायझोबियम प्रति 10 किलो बियाण्यास गूळाच्या द्रावणातून
चोळावे. स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक (पीएसबी) 250 ग्रॅम प्रति 10 किलो
बियाण्यास योग्य प्रकारे लावावे. तुर पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. मूग/उडीद
पेरणीपूर्वी बियाण्यास 1 ग्रॅम बाविस्टीन किंवा 2 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे. तसेच
ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. जिवाणू संवर्धक
रायझोबियम व पीएसबी 250 ग्रॅम प्रत्येकी प्रति 10 किलो बियाण्यास बिजप्रक्रिया
करावी. मूग/उडीद पिकाची पेरणी जूलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते. भुईमूग
पिकाची पेरणी 30 X 10 सें.मी.
(उपट्या) तर 45 X 15 सें.मी. (पसऱ्या) अंतरावर करता येते.
पेरणीसाठी हेक्टरी 100 ते 200 कि.ग्रॅ. उपटया तर 80 कि.ग्रॅ. पसऱ्या जातीचे बियाणे
वापरावे. भुईमूग पिकाची पेरणी 7 जूलै पर्यंत करता येते. मका पिकास पेरणीपूर्वी
सायॲन्ट्रानिलीप्रोल 19.8% + थायामिथॉक्झाम 19.8% एफएस 6 मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी या बिजप्रक्रियेमूळे
पेरणीनंतर 15 ते 20 दिवसापर्यंत पिकाचे अमेरिकन लष्करी अळीपासून संरक्षण होते.
बियाण्यास थायरम 2 ते 2.5 ग्रॅम तसेच ॲझोटोबॅक्टर हे जिवाणू संवर्धक 25 ग्रॅम
प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. मका पिकाची पेरणी जूलै अखेर पर्यंत करता
येते.
फळबागेचे व्यवस्थापन
पाऊस झालेल्या ठिकाणी नविन केळी
बागेची लागवड करावी. आंबा फळबागेत 500:500:500 ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश प्रति
झाड खतमात्रा दिली नसल्यास द्यावी. झाड दहा वर्षापेक्षा मोठे असल्यास 1000:500:500
ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश प्रति झाड खतमात्रा द्यावी. वाळलेल्या व रोगग्रस्त
फांद्यांची छाटणी करावी. द्राक्ष बागेतील
फुटवे काढावेत. बागेत पानांची विरळणी करावी. बागेत आर्द्रता वाढणार नाही याची
दक्षता घ्यावी. सिताफळ बागेत 300:300:300 ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश प्रति झाड
खतमात्रा द्यावी.
भाजीपाला
भाजीपाल्याचे बी टाकलेल्या गादी
वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार
असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा
कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते
मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची
लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान
झाडांना आधार द्यावा.
फुलशेती
फुलपिकाचे बी टाकलेल्या गादी
वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार
असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट,
वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस
तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.
पशुधन
व्यवस्थापन
पावसाळयामध्ये शक्यतो शेळ्या मेंढ्यांना उघडयावर ठेवण्याऐवजी
शेडमध्ये बांधावे त्यामूळे त्यांना पावसाचा मार बसणार नाही आणि त्यांचे शरीर
तापमान कमी होणार नाही. भिजल्यामुळे
शेळ्या-मेंढ्यांना फुफ्फूसाचा दाह होण्याची
शक्यता असते (थंड पाण्याच्या मारामूळे) तसेच दलदल जमीनीमूळे खूर सडण्याची समस्या
उद्भवणार नाही. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30
ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार
नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे,
ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा
होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.
सामुदायिक विज्ञान
मातेचे पहिले दूध नवजात शिशूस
पाजण्यापूर्वी इतर पदार्थ जसे-मध, एरंडेल तेल, ग्लुकोजचे पाणी इ. देणे टाळावे.
सुरूवातीच्या सहा महिन्यात नवजात बालकास केवळ स्तनपान देणेच योग्य आहे.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 26
/ 2022 - 2023 मंगळवार, दिनांक – 28.06.2022
No comments:
Post a Comment