मराठवाडयात दिनांक 09 ते 15 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा तर दिनांक 16 ते 22 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी
झालेला आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज
लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर सोयाबीन, खरीप ज्वारी, बाजरी, ऊस व हळद पिकात वापसा
स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर
काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. पुढील पाच दिवसाचा पावसाचा
अंदाज लक्षात घेता वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्या मुग/उडीद पिकाची
काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. काढणी केलेल्या शेंगाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक
करावी. शेंगा पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.
फळबागेचे व्यवस्थापन
पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज
लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेत वापसा स्थिती
निर्माण होण्यासाठी बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची
व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी
झाडांना काठीने आधार द्यावा.
भाजीपाला
पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज
लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर भाजीपाला पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी
शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी.
फवारणीची कामे पुढे ढकलावीत. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी लवकरात
लवकर करून घ्यावी. भाजीपाला पिकाच्या लहान झाडांना काठीचा आधार द्यावा.
चारा पिके
पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज
लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर मका पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात
अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची
कामे पुढे ढकलावीत.
फुलशेती
पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज
लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर फुल पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात
अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची
कामे पुढे ढकलावीत. गणपती उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी आहे. काढणीस तयार
असलेल्या फुलांची काढणी लवकरात लवकर करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.
तुती रेशीम
उद्योग
रेशीम कोषाचा बाजारातील भाव कोषातील
रेशीम धागा टक्केवारीवर अवलंबून असतो. तेव्हा ए ग्रेड कोष उत्पादन करण्यासाठी
तुतीच्या पानाची प्रत उत्तम असावी लागते. त्यासाठी विषमूक्त व सेंद्रीय खत देणे
गरजेचे आहे. एक किलो कोष होण्यासाठी कमीत कमी कोषाची संख्या हवी. साधारणपणे 550 ते
600 कोष एक किलोत बसले तर ए ग्रेड, 600 ते 700 कोष बसले तर बी ग्रेड, 700 ते 800
कोष बसले तर सी ग्रेड व 800 च्या वर बसले तर डी ग्रेड. एक कि.ग्रॅ. रेशीम धागा
तयार होण्यासाठी लागणार कोष संख्या (किलो) त्यास रिनडाटा असे म्हणतात. मागील दशकात
8.5 किलो कोष वरून सध्या 6.5 किलो पर्यंत रीनडाटा ने मजल मारली आहे.
सामुदायिक
विज्ञान
बालकांना त्यांच्या वयास व विकासात्मक
पातळीस अनुसरून मनोरंजकरित्या गोष्टी सांगाव्या, कारण गोष्टी ऐकल्यामूळे त्यांचा
शब्दसंग्रह, सामान्यज्ञान, जिज्ञासा, बौध्दीक, कल्पनाशक्ती व स्मरणशक्ती वृध्दिंगत
होते. याबरोबरच त्यांचा वाचा व भाषा भावनात्मक, सामाजिक व नैतिक विकास साधण्यासाठी
गोष्टी लाभदायी ठरतात.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 47/2022
- 2023 गुरूवार,
दिनांक –
08.09.2022
No comments:
Post a Comment