प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 48 तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर पुढील तिन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. दिनांक 23 मे रोजी लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तसेच इतर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 26 मे ते 01 जून 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण किंचित कमी झालेले आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 28 मे ते 03 जून 2023
दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची
शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
मध्यम
ते भारी, कसदार व पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये कापूस
पिकाची लागवड करावी. हलक्या तसेच पाण्याचा निचरा न होणाऱ्या चिबड
जमिनीवर कापूस पिकाची लागवड करू नये. कापूस पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची खोली 60
ते 100 सेंमी असावी, जमिनीचा सामू 6.5 ते 8.5 एवढा असावा. मध्यम
ते भारी (30 ते 45 सेंमी खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या
जमिनीत तूर पिकाची लागवड करावी. तुरीच्या पिकास चोपन व
क्षारयुक्त जमिन मानवत नाही. तुर पिकाच्या वाढीस जमिनीचा सामु 6.5 ते 7.5 योग्य
असतो. आम्लयुक्त जमिनीत पिकाच्या मुळांवरील गाठींची योग्य वाढ होत नसल्यामुळे रोपे
पिवळी पडतात. योग्य निचऱ्याच्या मध्यम ते भारी जमिनीत
मुग/उडीद या पिकांच्या लागवड करावी. एकदम
हलक्या प्रतिची मुरमाड जमिन या पिकास योग्य नाही. पाणी साठवूण ठेवणाऱ्या जमिनीत हे
पीक घेऊ नये. मध्यम ते हलकी, भुसभुशीत, सेंद्रिय पदार्थ आणि कॅल्शियमचे भरपूर
प्रमाण असलेल्या जमिनीत भुईमूग पिकाची लागवड करावी. भुसभुशीत जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते यामुळे मुळांची
चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभरीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत
होते. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे
काढणी केलेल्या भुईमूग पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. वेळेवर लागवड केलेल्या
व काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी कोरड्या हवामानात करावी. मध्यम
ते भारी, सुपीक, उत्तम निचऱ्याची जमिनी मका पिकाची लागवड करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
काळी
व कसदार, भुसभुशीत गाळाची, पोयटयाची, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत केळीची मृग बाग लागवड करावी. लागवडीसाठी क्षारयुक्त जमिनीची निवड करू नये. नवीन लागवड केलेल्या व
लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी यामुळे कलमांची मर होणार नाही
तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. केळी
बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. केळी बागेत ठिंबक सिंचन
पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. मध्यम ते भारी प्रतीची
पाण्याचा चांगला निचरा होणारी, थोडीशी आम्लयुक्त जमिनीत आंबा
पिकाची लागवड करावी. चोपन व
चुनखडीयुक्त जमिनीत लागवड करू नये. जमिनीची खोली कमीतकमी 1.5 ते 2 मीटर असावी.
नविन लागवड केलेल्या आंबा बागेला पाण्याचा
ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. नविन लागवड केलेल्या आंबा बागेत ठिंबक
सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड
केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. वेळेवर एप्रिल
छाटणी केलेल्या द्राक्ष बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. द्राक्ष बागेत अतिरिक्त फुटव्यांची विरळणी करावी. मुरमाड, अत्यंत हलक्या,
डोंगर उताराच्या जमिनीत तसेच मध्यम खोल जमिनीत सिताफळ लागवड करावी.
भाजीपाला
खरीप
हंगामात मिरची, वांगी, टोमॅटो, कांदा या भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी मध्यम
काळी, निचऱ्याची भुसभुशीत जमिन निवडावी. काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भाजीपाला
पिके, टरबूज, खरबूज इत्यादींची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला
पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार
सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
पशुधन व्यवस्थापन
तापमान-आर्द्रता-निर्देशांकामध्ये
वाढ झाल्याने दुधाळ जनावरावर हिट ट्रेस (उष्णतेचा ताण) होतो. दुधाळ जनावरांमध्ये तापमान-आर्द्रता
निर्देशांकात वाढ झाल्याने दुध उत्पादन कमी होते व त्याचबरोबर दुधातील स्निग्ध पदार्थ
व प्रथिने यांचे प्रमाण कमी होते. हया पासून दुधाळ जनावरांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या
गोठ्याच्या शेड वरील छताला स्प्रिंकलर्स किंवा फॉगर्स ने थंडावा निर्माण करावा, दुपारी
जनावरांना धुवून काढावे, जमलेच तर पंखा किंवा कुलर्सची व्यवस्था शेड मध्ये करावी, शेडच्या
बाजूला पोत्याचे पडदे बांधून त्यांना भिजवावे. गोठ्याची उंची कमीत कमी मध्यभागी 15
फुट उंच असावी. पशुधनास पिण्यास भरपूर पाणीद्यावे.
तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता असल्यामूळे
चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू
किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी
घ्यावी. पशुधनास खुले पाणी तलाव किंवा नदीपासून दुर ठेवावे, ट्रॅकटर आणि इतर
धातुंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये, तसेच
पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोश्याला थांबू नये.
सामुदायिक विज्ञान
उन्हाळ्यामध्ये
अतिउन्हामध्ये काम करत असताना अतिशय घाम येतो. घशाला कोरड पडते व शरीरातील पाणी
कमी होते. त्यामूळे दवाखान्यात भरती देखील व्हावे लागते. तेव्हा अशा बाबी
टाळण्यासाठी डोकयाला रूमाल बांधावा व अंगात सनकोट किंवा घरात कापूस वेचणीकोट अथवा
पूर्ण भायाचा शर्ट असेल तर तो घालावा. अंगावर फिक्या रंगाचे कपडे घालावे. जेणेकरून
उन्हाची किरणे परावर्तित होतील. घाम आल्यामूळे शरीरातील क्षार कमी होतात. यावर
उपाय म्हणून लिंबू, मीठ व साखर यांचे शरबत करून ठेवून थोड्या थोड्या वेळाने घेत
रहावे. तसेच काम करत असताना सावलीत अधून मधून विश्रांती घ्यावी.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम
सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला
पत्रक क्रमांक – 15/ 2023 - 2024 मंगळवार, दिनांक – 23.05.2023
No comments:
Post a Comment