Friday 28 July 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 28 जूलै रोजी उसमानाबाद, परभणी, हिंगोली व लातूर जिल्हयात तर दिनांक 31 जूलै रोजी नांदेड व हिंगोली जिल्हयात तर 01 ऑगस्ट रोजी नांदेड, हिंगोली, परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 28 जुलै रोजी नांदेड जिल्हयात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 28 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी व दिनांक 29 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 30 व 31 जुलै रोजी काही ठिकाणी व 01 ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 28 जूलै रोजी उसमानाबाद, परभणी, हिंगोली व लातूर जिल्हयात तर दिनांक 31 जूलै रोजी नांदेड व हिंगोली जिल्हयात तर 01 ऑगस्ट रोजी नांदेड, हिंगोली, परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 28 जुलै रोजी नांदेड जिल्हयात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 28 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी व दिनांक 29 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 30 व 31 जुलै रोजी काही ठिकाणी व 01 ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 28 जूलै ते 03 ऑगस्ट 2023 दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त व दिनांक 04 ते 10 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा दर कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढलेले आहे.

पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाला असल्यास सूर्यफुल, तूर, संकरीत बाजरी, सोयाबीन + तूर (4:2), बाजरी + तूर (3:3), एरंडी, कारळ आणि तिळ, एरंडी + धने, एरंडी + तूर ही पिके घ्यावीत.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 02 ते 08 ऑगस्ट 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतकऱ्यांनी खत देणे किंवा फवारणी करणे टाळावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

मागील काही दिवसात झालेला पाऊस, जास्त पाऊस झालेल्या भागातील सोयाबीन, खरीप ज्वारी, बाजरी, ऊस व हळद पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. सोयाबीन पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात किंवा पावसाची उघाड बघून दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. सोयाबीन पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. तणांच्या व्यवस्थापनासाठी सोयाबीन पिकात 20 दिवस झाले असल्यास इमॅझोमॅक्स 35% + इमीझीथीपायर 35% 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारवे. पेरणी न झालेल्या भागात पेरणी योग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाला असल्यास जमिनीत वापसा येताच सोयाबीन + तूर (4:2) या अंतरपिक पध्दतीचा अवलंब करावा.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मागील काही दिवसात झालेला पाऊस, जास्त पाऊस झालेल्या भागातील  संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फळ बागेत शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात किंवा पावसाची उघाड बघून झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे. संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेत जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून बाग तण विरहीत ठेवावी.

भाजीपाला

मागील काही दिवसात झालेला पाऊस, जास्त पाऊस झालेल्या भागात भाजीपाला पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. भाजीपाला पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात किंवा पावसाची उघाड बघून दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे.

 

फुलशेती

मागील काही दिवसात झालेला पाऊस, जास्त पाऊस झालेल्या भागातील फुल पिकात  अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी करून घ्यावी. फुल पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.

चारा पिके

मागील काही दिवसात झालेला पाऊस, जास्त पाऊस झालेल्या भागातील चारा पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. चारा पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.

तुती रेशीम उद्योग

ढगाळ हवामानात पाऊस झाला तर रेशीम किटक संगोनपनगृहात 99 टक्के आर्द्रता राहते. अशा वेळी तुती पाने खाद्य द्यायला हरकत नाही पण सोबत माती किंवा धुळ जाणर नाही याची काळजी घ्यावी. अशा वेळेस कोष काढणी करायची असेल तर संगोपन गृहात हवा खेळती 1 मी/सेकंदाच्या प्रमाणात राहणे आवश्यक असून कोष सुकण्यासाठी आवश्यक आहे. संगोपन गृहात झरोखे (ढक्झास्ट फॅन) असतील तर ते चालू करावेत. कोष काढणीच्या वेळी एक कोष निमुळत्या बाजूने कापून लाल रंगाचा झाला आहे याची खात्री करून कोष काढणी करावी. काढलेले कोष ढिग स्वरूपात न साठवता रॅक किंवा प्लास्टीक ट्रे मध्ये पसरून ठेवावेत. बाजारात नेताना सच्छिद्र गोणपाट किंवा कांद्याच्या बारदाण्यात कोष हवेशिर स्थलांतरित करावेत. कोषाच्या आत जास्त पाण्यात प्रमाण किंवा जास्त आर्द्रता राहिली तर कोषाला बाजार पेठेत जाई पर्यंत पाणी सुटण्याची भीती असते व भाव कमी लागतो. रेशीम धाग्याची प्रत खराब होते.

पशुधन व्यवस्थापन

पावसामूळे चरण्यासाठी गवत सर्वत्र उपलब्ध होत आहे. कोवळे गवत प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यामूळे रवंथ करणाऱ्या पशुधनामध्ये “पोटफुगी” संभवते. यासाठी टरपेंटाईन तेल 50 मिली + गोडतेल 200 मिली गाय व म्हशींमध्ये तोंडाद्वारे पाजावे. शेळी व मेंढीमध्ये याचे प्रमाण  25 मिली + 100 मिली एवढे असावे.

सामुदायिक विज्ञान

पावसाळयामध्ये पाणी दूषि‍त झालेले असते. अशा पाण्याचा वापर केल्याने, अतिसार, उलटया, गॅस्ट्रो, कावीळ, टायफाईड असे आजार होण्याची शक्यता असते. त्यामूळे असे घातक आजार टाळण्यासाठी पिण्याच्या पाण्यात तूरटी फिरवून पाणी उकळून, गाळून आणि थंड करून त्याचा वापर करावा.

ईतर

शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात. कापूस व सोयाबीन या सारख्या पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पावसाची उघाड बघून दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. केळी, आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पावसाची उघाड बघून झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे.

 

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक34/2023 - 2024     शुक्रवार, दिनांक – 28.07.2023

 

 

 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 0ते 13 जूलै 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त व दिनांक 14 ते 20 जूलै दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

दिनांक 14 मे रोजी बीड व छत्रपती संभाजी नगर जिल्हयात व दिनांक 15 मे रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 ते 60 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. दिनांक 14 मे रोजी लातूर, धाराशिव, जालना व परभणी जिल्हयात तर दिनांक 15 मे बीड, धाराशिव व जालना जिल्हयात तर दिनांक 16 मे रोजी धाराशिव, लातूर, बीड जिल्हयात व दिनांक 17 मे रोजी धाराशिव, लातूर व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 मे रोजी बीड व छत्रपती संभाजी नगर ज...