प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे
राहण्याची तसेच दिनांक 15 व 16 मार्च रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुढील
पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व किमान तापमानात पुढील दोन
दिवस 1 ते 2 अं. से. ने वाढ होऊन त्यानंतर किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला:
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात
दिनांक 15 ते 21 मार्च दरम्यान पाऊस
सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी
राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात
बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर
जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 17 ते 23 मार्च 2024 दरम्यान पाऊस सरासरी
पेक्षा कमी, कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी व
किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
संदेश :
वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस
तयार असलेल्या रब्बी पिकांची काढणी व मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उनहात
वाळवून साठवणूक करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस
तयार असलेल्या हरभरा, रब्बी ज्वारी व गहू पिकाची काढणी व मळणी करून घ्यावी. मळणी
केलेला माल उनहात वाळवून साठवणूक करावी. कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या
बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार
सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करावे. भुईमूग पिकात अंतरमशागतीची कामे
करून तण नियंत्रण करावे.
फळबागेचे व्यवस्थापन
कमाल तापमानात झालेली वाढ,
वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, केळी
व आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीतील ओलावा टिकून
राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या आळयात आच्छादन
करावे. नविन लागवड केलेल्या केळीच्या व
आंब्याच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी. काढणीस
तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून घ्यावी.
भाजीपाला
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला
पिकांची काढणी करून घ्यावी. उन्हाळी हंगामासाठी लागवड केलेल्या भाजीपाला पिकात
अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या
बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, उन्हाळी भाजीपाला पिकात आवश्यकतेनूसार पाणी
व्यवस्थापन करावे.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलांची
काढणी कडून बाजार पेठेत पाठवावी. कमाल तापमानात
झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, फुल
पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
पशुधन व्यवस्थापन
आपल्या पशुंना उन्हामध्ये बांधु
नका (निदान तिव्र उन्हाच्या कालावधीमध्ये त्यांना झाडाखाली/सावलीमध्ये किंवा
शेड/गोठ्यामध्येच बांधणे चांगले). पशुंना शक्यतो थंड/स्वच्छ/मुबलक पाणी दोन-तिन
वेळेस पाजावे. पाण्यामुळे पशुंच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (डीहायड्रोजन)
होणार नाही. जमल्यास पाण्यामधून क्षार द्यावेत, 5 लिटर पाण्यामध्ये चिमुटभर गुळ (25 ग्रॅम), थोडे मिठ (5-10 ग्रॅम) आणि 5 ग्रॅम क्षार
मिश्रण दिल्यास उत्तम, मात्र नजीकच्या पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच व्यवस्थापन करावे.
सामुदायिक विज्ञान
उन्हाळयामध्ये शरीरातील पाण्याचा
व खनिजद्रव्यांचा ऱ्हास होऊन स्वास्थावर होणारे दुषपरिणाम टाळण्यासाठी उपलब्ध
असणारी रसाळ फळे टरबुज, खरबुज, संत्री, मोसंबी, आंबा (कैरी) व द्राक्षे आहारात
समाविष्ट करणे फायदेशीर ठरते.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला
पत्रक क्रमांक – 99/ 2023 - 2024 मंगळवार, दिनांक – 12.03.2024
No comments:
Post a Comment