प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात आज हवामान कोरडे राहील. दिनांक
06 ते 09 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या
पावसाची शक्यता आहे. दिनांक 07 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, लातूर, धाराशिव व
बीड जिल्हयात तर दिनांक 08 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव,
लातूर व परभणी जिल्हयात तर दिनांक 09 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड,
धाराशिव व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट,
वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता आहे. दिनांक 07 एप्रिल रोजी नांदेड जिल्हयात व 08 एप्रिल रोजी नांदेड व
हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन
दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर कमाल तापमानात हळूहळू
घट होण्याची शक्यता आहे. दिनांक 05 एप्रिल रोजी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तर
दिनांक 06 एप्रिल रोजी नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी रात्रीच्या वेळी उष्णता
जाणवेल.
सामान्य सल्ला:
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 05 ते 11 एप्रिल व 12 ते 18 एप्रिल दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा जास्त,
कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी आणि किमान तापमान सरासरी पेक्षा कमी राहण्याची
शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या
उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार
मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 10 ते 16 एप्रिल 2024 दरम्यान पाऊस सरासरी
पेक्षा जास्त, कमाल तापमान मध्यमप्रमाणात सरासरी पेक्षा
कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
संदेश :
तूरळक
ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, मळणी केलेल्या
मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
दिनांक 6 ते 9 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या
पावसाचा तसेच नांदेड व हिंगोली जिल्हयात गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, मळणी
केलेल्या मालाची (हरभरा, गहू, रब्बी ज्वार व करडई) सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
मळणी केलेला माल पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. दिनांक 6 ते 9 एप्रिल दरम्यान तूरळक
ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच नांदेड व हिंगोली
जिल्हयात गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, काढणी
न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे
शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीने झाकून ठेवावा.
काढणी/मळणी केलेला माल पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. दिनांक 6
ते 9 एप्रिल दरम्यान तूरळक
ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच नांदेड व हिंगोली
जिल्हयात गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, हळदीची उघडयावर साठवण करू नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कमाल तापमानात झालेली वाढ
व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी तीळ पिकास
मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी व भारी जमिनीत 12 ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन
करावे. सिंचन हे शक्यतो तूषार सिंचन पध्दतीने करावे.
फळबागेचे व्यवस्थापन
काढणीस तयार असलेल्या मृग बहार
संत्रा/मोसंबी फळांची काढणी करून घ्यावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या
बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी
संत्रा/मोसंबी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी
रोपांना सावली करावी. दिनांक 6 ते 9 एप्रिल
दरम्यान तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच
नांदेड व हिंगोली जिल्हयात गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या
द्राक्ष फळांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या चिकू
फळांची काढणी करावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या
वेगामूळे, चिकू बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून
राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी चिकू
फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या चिकू रोपांचे उन्हापासून
संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी.
भाजीपाला
दिनांक 6 ते 9 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम
स्वरूपाच्या पावसाचा तसेच नांदेड व हिंगोली जिल्हयात गारपीटीचा अंदाज लक्षात घेता,
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज, खरबूज पिकांची काढणी करून घ्यावी. उन्हाळी
हंगामासाठी लागवड केलेल्या भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण
करावे. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, उन्हाळी
भाजीपाला पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. टरबूज व खरबूज पिकात
फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास कामगंध सापळे वापरावेत.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलांची
काढणी टप्प्याटप्प्याने करून बाजार पेठेत पाठवावी. कमाल तापमानात झालेली वाढ,
वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
चारा पीके
दिनांक 6 ते 9 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम
स्वरूपाच्या पावसाचा तसेच नांदेड व हिंगोली जिल्हयात गारपीटीचा अंदाज लक्षात घेता,
काढणी केलेल्या ज्वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण
पावसात भिजल्यास त्याची प्रत खालावून साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा
जनावरे खात नाहीत.
पशुधन व्यवस्थापन
दिनांक 6 ते 9
एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते
मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच
नांदेड व हिंगोली जिल्हयात गारपीटीचा अंदाज
लक्षात घेता, चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो
चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या
ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.
कमाल तापमानात झालेली वाढ लक्षात
घेता, जनावरांना सावलीत बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पुरवठा
करावा. पशुधनाकडून सकाळी 11 ते दुपारी 4 या दरम्यान काम करून घेऊ नये. उष्णतेपासून
पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठयाच्या छतावर गवताचे आच्छादन करावे. पशुधनाचे शेड
पत्र्याचे किंवा सिमेंटचे असल्यास त्याला पांढरा रंग द्यावा. पशुधनास मुबलक
प्रमाणा हिरवा चारा, प्रथिनेयूक्त, खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य द्यावे. तिव्र
उष्णतेच्या काळात पशुधनाच्या अंगावर पाणी शिंपडावे किंवा त्यांना पाणवठयावर
न्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चरावयास सोडावे.
सामुदायिक विज्ञान
स्वस्थ जीवनासाठी आश्यक बाबी :
दररोज संतुलीत आहार घ्या. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. आहारात साखर आणि मीठाचा वापर कमी करा. तेल आणि
मसालेदार पार्थांचा वापर कमी करा. सकाळची न्याहरी करण्यास कधीच टाळाटाळ करु नका.
जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळा.
कृषि अभियांत्रिकी
रब्बी पिकांची कापणी झाल्यानंतर
शेतात नांगरणी करून घ्यावी. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील मातीचे माती परिक्षण करून
घ्यावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 02/2024
- 2025 शुक्रवार, दिनांक
– 05.04.2024
No comments:
Post a Comment