Friday, 27 June 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 27 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, व जालना जिल्हयात तर दिनांक 01 जुलै रोजी परभणी हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.‍ मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवस कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही तर पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 27 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, व जालना जिल्हयात तर दिनांक 01 जुलै रोजी परभणी हिंगोली व नांदेड  जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.‍ मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवस कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही तर पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक  27 जून ते 03 जुलै, 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी,, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे व दिनांक  04 ते 10 जुलै 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त,, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात ज्या तालूक्यात पेरणी योग्य पाऊस (75-100 मिमी) झाला आहे (छ. संभाजीनगर जिल्हा : खुलताबाद, कन्नड, सोयगाव, सिल्लोड व फुलंब्री तालुका; जालना जिल्हा : भोकरधन व जाफ्राबाद तालुका; नांदेड जिल्हा: नांदेड, बिलोली, हदगाव, किनवट, मुदखेड, हिमायतनगर व माहूर तालुका; हिंगोली जिल्ह्यात : हिंगोली,कळमनुरी व वसमत तालुका) या जिल्हयातील तालूक्यात वापसा असतांना पेरणी करण्यास हरकत नाही. इतर तालूक्यायत शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतरच पेरणी करावी.

संदेश : शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये. पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतरच पेरणी करावी, पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. सर्वसाधारणपणे 15 जूलै पर्यंत सर्व खरीप पिकांची (मूग, उडीद, भुईमूग सोडून) पेरणी करता येते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच सोयाबीन पिकाची पेरणी करावी. सोयाबीन पिकाची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते. सोयाबीन पिकाची पेरणी शक्यतो बी.बी.एफ (रूंद वरंबा सरी) पध्दतीने करावी ज्यामूळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपिकता टिकून राहण्यास मदत होऊन अधिक उत्पादन मिळते. पेरणी केलेल्या सोयाबीन पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. सोयाबीन पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास 0.5% (50 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी.पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच खरीप ज्वारी पिकाची पेरणी करावी. खरीप ज्वारी पिकाची पेरणी 07 जुलैपर्यंत करता येते. पेरणी केलेल्या खरीप ज्वारी पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. खरीप ज्वारी पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास 0.5% (50 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच बाजरी पिकाची पेरणी करावी. बाजरी पिकाची पेरणी 30 जुलैपर्यंत करता येते. पेरणी केलेल्या बाजरी पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. बाजरी पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास 0.5% (50 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. ऊस पिकास सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. सुरू ऊसाची पक्की बांधणी केली नसल्यास ती करन घ्यावी व पक्की बांधणी करतांना 100 किलो नत्र, 55 किलो स्फुरद व 55 किलो पालाश प्रति हेक्टरी रासायनिक खतांची मात्रा द्यावी. हळदीमध्ये आंतरपीके घेताना पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यापर्यंत काढणी होईल अशा प्रकारची आंतरपीके निवडावीत. यामध्ये पालेभाज्या सारख्या आंतरपिकांचा समावेश असावा.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा नविन बाग लागवडीसाठी नागपूर संत्रा, किन्नो तर मोसंबी नविन बाग लागवडीसाठी न्यूसेलर, सातगुडी व फुले मोसंबी इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेत कीटकनाशकाची फवारणी पावसाची उघाड बघून करावी. संत्रा/मोसंबी बागेत मृगबहारासाठी खत मात्रा दिली नसल्यास मोसंबीसाठी 400:400:40‍0 व संत्र्यासाठी 500:500:500 ग्राम प्रति झाड नत्र : स्फुरद : पालाश खत मात्रा द्यावी. डाळींब नविन बाग लागवडीसाठी भगवा, फुले भगवा सुपर, गणेश, फुले आरक्ता, इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. डाळिंब बागेत मृगबहारासाठी खत मात्रा दिली नसल्यास डाळींबासाठी 300:250:250  ग्राम प्रति झाड  नत्र : स्फुरद : पालाश खत मात्रा द्यावी. चिकू नविन बाग लागवडीसाठी कालीपत्ती, क्रिकेट बॉल इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. चिकू बागेत खत मात्रा दिली नसल्यास 500:500:500 ग्राम प्रति झाड नत्र : स्फुरद : पालाश खत मात्रा द्यावी.

भाजीपाला

पाण्याची उपलब्धता असल्यास भाजीपाला (वांगी, मिरची, टोमॅटो इत्यादी) पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे. भाजीपाल्याचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

पाण्याची उपलब्धता असल्यास फुल पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे. फुलपिकाचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. पाउस झालेल्या ठिकाणी  जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी.  काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

तुती रेशीम उद्योग

ढगाळ हवामानात संगोपन गृहात तापमान २२ तते २८ अं. सें आणि आर्दता ८५% पर्यंत असावी. पाऊसात किंवा पाऊस चालू असताना आर्दता १००% असते. अशा वेळी कीटकांनी पाने खाल्यानंतर अळ्यावर पांढरा चुना धुरळणी करावी. १०० अंडी पुंजासाठी १२ ते १५ किलो ग्रॅम पांढरा चुना धुरळणी लागतो आणि निर्जंतुक पावडर म्हणून विजेता किंवा अंकुश पावडर या ४. ते ५. किलो ग्रॅम १०० अंडीपुंजासाठी वापर करावा. सतत पाऊस पडत असेल तर पाण्यानी भिजलेली तुती पाने खाद्य म्हणून चालतात पण त्याच्यासोबत माती किंवा धूळ येत कामा नये.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात वातावरणातील आर्दता, तापमानातील बदल, पाणी साचणे, चिखल होणे, माश्या व इतर कीटकाचा प्रादुर्भाव दिसून येतो, या कारणाने पशुधनाचे आरोग्य बिघडते, त्यासाठी खालील उपाययोजना करणे गरजेचे आहे. पशुधनासाठी सुरक्षित व स्वच्छ निवाऱ्याची व्यवस्था करणे, गोठ्याच्या परिसरात पाऊसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, दर 15 दिवसाने गोठ्याचे पोटॅशियम परमॅंगनेटच्या द्रावणाने निर्जंतुकिकरण करावे. 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक26/2025 - 2026         शुक्रवार, दिनांक 27.06.2025

Tuesday, 24 June 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 24 व 25 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात, दिनांक 26 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 24 जून रोजी काही ठिकाणी तर दिनांक 25 व 26 जून रोजी तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 27 व 28 जून रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 24 25 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात, दिनांक 26 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 24 जून रोजी काही ठिकाणी  तर दिनांक 2526 जून रोजी तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 2728 जून रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक  26 जून ते 03 जुलै 2025 दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच कापूस पिकाची लागवड करावी. कापूस पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. कापूस पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. लागवड केलेल्या कापूस पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच तुर पिकाची पेरणी करावी. तुर पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पेरणी केलेल्या तुर पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. पावसाळ्यात तूर पिकावरील फायटोप्थोरा करपा टाळण्यासाठी, शेताच्या चारी बाजूस तीन फूट खोल आणि दोन फूट रुंद चर काढावी जेणे करून अतिवृष्टी मध्ये शेतातील मातीची धूप होणार नाही व पिकाचे मुळे सडणार नाहीत. तसेच पुढे चरातील पाणी पाऊस ओसरल्यावर शेतातील पिकास परत कामी येईल. पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच मूग/उडीद पिकाची पेरणी करावी. मूग/उडीद पिकाची पेरणी जूलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते. पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पेरणी केलेल्या मूग/उडीद पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच भुईमूग पिकाची पेरणी करावी. भुईमूग पिकाची पेरणी 7 जूलै पर्यंत करता येते. पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पेरणी केलेल्या भुईमूग पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच मका पिकाची पेरणी करावी. मका पिकाची पेरणी जूलै अखेर पर्यंत करता येते. पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पेरणी केलेल्या मका पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.

 

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नवीन केळी बागेची लागवड करून घ्यावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. लागवडीच्या वेळेस शेणखत तर लागवडीनंतर 30 दिवसाने रासायनिक खत व्यवस्थापन करावे. केळी बागेत उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.नवीन आंबा लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. आंबा बागेत उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पाने काढून टाकावीत व रोगनाशकाची फवारणी करावी. द्राक्ष बागेतील अतिरिक्त बगल फुटी काढून घ्याव्यात जेणेकरून जास्तीत जास्त सूर्यप्रकाश डोळ्यावर पडलयास डोळा फुटण्यास मदत होते. द्राक्ष बागेतील वेलीची बांधणी करावी. द्राक्ष बागेत उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.नवीन सिताफळ लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. सिताफळ बागेत उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

भाजीपाला

भाजीपाल्याचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

फुलपिकाचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळ्याच्या सुरुवातीला आर्द्रता, तापमानात बदल, पाणी साचणे, चिखल आणि माश्या आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो, ज्यामुळे पशुधनाचे आरोग्य बिघडते. यासाठी खालील उपाययोजना कराव्यात. पशुधनासाठी सुरक्षित आणि स्वच्छ निवाऱ्याची व्यवस्था करा, गोठ्याच्या परिसरात पावसाचे पाणी साचणार नाही याची खात्री करा आणि दर 15 दिवसांनी पोटॅशियम परमॅंगनेट द्रावणाने गोठा निर्जंतुक करा.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक25/2025- 2026    मंगळवार, दिनांक – 24.06.2025

Friday, 20 June 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 20 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, परभणी हिंगोली, नांदेड व जालना जिल्हयात तर दिनांक 21 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.‍ मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवस कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची तर त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही तर पुढील तीन ते चार दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 20 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, परभणी हिंगोली, नांदेड व जालना जिल्हयात तर दिनांक 21 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.‍ मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवस कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची तर त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही तर पुढील तीन ते चार दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 21 ते 26 जून 2025 दरम्यान पाऊस सरासरीएवढा , कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे व दिनांक  26 जून ते 03 जुलै 2025 दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

संदेश : शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये. पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतरच पेरणी करावी, पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. सर्वसाधारणपणे 15 जूलै पर्यंत सर्व खरीप पिकांची (मूग, उडीद, भुईमूग सोडून) पेरणी करता येते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीनची पेरणी 45X5 सें.मी. अंतरावर व 2.5 ते 3.0 सें.मी. खोलीवर करता येते. सोयाबीन पेरणीसाठी हेक्टरी 65 किलो बियाणे वापरावे. सोयाबीन बियाण्यास पेरणीपूर्वी कार्बोक्झिन 37.5 % + थायरम 37.5 % (मिश्र घटक) या बुरशीनाशकाची 3 ग्रॅम किंवा ॲझोक्सीस्ट्रोबीन 2.5 टक्के + थायोफॅनेट मिथाईल 11.25 टक्के + थायोमिथॉक्झाम 25 टक्के एफ एस 10 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रिया करावी. बुरशीनाशकाच्या बिजप्रक्रियेनंतर थायामिथोक्झाम 30% एफएस 10 मिली प्रति किलो ग्रॅमची बिजप्रक्रिया करावी. वरील बिजप्रक्रियेनंतर बियाण्यास रायझोबियम जिवाणू खत ( ब्रेडी रायझोबियम) + स्फुरद विरघळविणारे जिवाणू खताची (पी.एस.बी.) 250 ग्रॅम प्रति 10 किलो किंवा 100 मिली/10 किलो ग्रॅम (द्रवरूप असेल तर) याची बिजप्रक्रिया करावी व नंतर बियाणे सावलीमध्ये वाळवून शक्य तेवढ्या लवकर पेरणी करावी. बिजप्रक्रियेसाठी व.ना.म.कृ. वि. परभणी निर्मित द्रवरूप जैविक खताचा (रायझोफॉस) 10 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणात वापर करता येतो. सोयाबीन पिकाची पेरणी शक्यतो बी.बी.एफ (रूंद वरंबा सरी) पध्दतीने करावी ज्यामूळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपिकता टिकून राहण्यास मदत होऊन अधिक उत्पादन मिळते. पेरणीपूर्वी सोयाबीन बियाण्याची तपासून पाहावी, उगवण क्षमता 70 % पेक्षा जास्त असेल तरच बियाणे पेरणीसाठी वापरावे. खरीप ज्वारीच्या पेरणीसाठी दोन ओळीमध्ये 45 सें.मी., दोन झाडातील अंतर 12.5 सें.मी. ठेवावे व पेरणी 3 ते 4 सें.मी. खोलीवर करता येते. पेरणीसाठी हेक्टरी 7.5 किलो संकरित व 10 किलो सुधारीत वाणांचे बियाणे वापरावे. खरीप ज्वारीच्या पेरणीपूर्वी गंधक 300 मेश 4 ग्रॅम किंवा थायरम 75 टक्के 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रिया करावी. तसेच इमिडाक्लोप्रीड 48 टक्के एफएस 14 मिली किंवा थायमिथॉक्झाम 30 टक्के 10 मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. ॲझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पी.एस.बी) प्रत्येकी 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रिया करावी.   बाजरीची पेरणी 45X15 सें.मी. अंतरावर करता येते. पेरणी करतांना 4 सें.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये. बाजरी पेरणीसाठी हेक्टरी 3 ते 4 किलो बियाणे वापरावे. बाजरी पिकाच्या पेरणीपूर्वी बियाण्यास मेटालॅक्झील 35 % एसडी 6 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रिया करावी. 250 ग्रॅम ॲझोस्पिरीलम 10 किलो बियाण्यास चोळून पेरणी करावी किंवा शेवटी ॲझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पीएसबी) प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे याप्रमाणात बियाण्यावर बिजप्रक्रिया करून पेरणी करता येते. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  हळद पिकाची लागवड करून घ्यावी. हळद लागवडीपूर्वी बियाण्यास क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही 20 मिली + कार्बेंडेझीम 50 टक्के 10 ग्रॅम किंवा डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मिली + डायथेन एम-45 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 100-120 किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी.बियाणे 10 ते 15 मिनिट द्रावणात बूडवून ठेवावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा नविन बाग लागवडीसाठी नागपूर संत्रा, किन्नो तर मोसंबी नविन बाग लागवडीसाठी न्यूसेलर, सातगुडी व फुले मोसंबी इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेत रोगनाशकाची फवारणी पावसाची उघाड बघून करावी. अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेत फळगळ व्यवस्थापनासाठी,  चिलेटेड झिंक 500 ग्रॅम + जिब्रॅलिक ॲसिड 1.5 ग्रॅम 100 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. डाळींब नविन बाग लागवडीसाठी भगवा, फुले भगवा सुपर, गणेश, फुले आरक्ता, इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. मृग बहार धरलेल्या डाळींब बागेत तेल्या रोगाच्या व्यवस्थापनासाठी रोगनाशकाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी. चिकू नविन बाग लागवडीसाठी कालीपत्ती, क्रिकेट बॉल इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. चिकू बागेत तणांचे नियंत्रण करावे.

भाजीपाला

पाण्याची उपलब्धता असल्यास भाजीपाला (वांगी, मिरची, टोमॅटो इत्यादी) पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे. भाजीपाल्याचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

पाण्याची उपलब्धता असल्यास फुल पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे. फुलपिकाचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

तुती रेशीम उद्योग

रेशीम उद्योगात वर्षभर १२ लोकांना रोजगार उपलब्ध होतो. चीन देशात १ दश लक्ष लोकांना तर भारतात ७.९ दश लक्ष लोकांना रेशीम उद्योगात रोजगार उपलब्ध होतो. खेड्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हि काळाची गरज असून शेतीवर आधारित पशुपालन, कुकुटपालन, शेळी, मेंढी, दुग्ध व्यवसाय आणि रेशीम उद्योगामुळे शेतीची अर्थकारण बळकट होण्यास मदत मिळते. शहराकडे रोजगारासाठी होणारे अथलांतर थांबवण्याची क्षमता रेशीम उद्योगात आहे. समाजात१२ बलुतेदाराबरोबर विणकर, बूनकर, रंगारी, कातारी याना पण रेशीम उद्योगामुळे खेड्यात रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात वातावरणातील आर्दता, तापमानातील बदल, पाणी साचणे, चिखल होणे, माश्या व इतर कीटकाचा प्रादुर्भाव दिसून येतो, या कारणाने पशुधनाचे आरोग्य बिघडते, त्यासाठी खालील उपाययोजना करणे गरजेचे आहे. पशुधनासाठी सुरक्षित व स्वच्छ निवाऱ्याची व्यवस्था करणे, गोठ्याच्या परिसरात पाऊसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, दर 15 दिवसाने गोठ्याचे पोटॅशियम परमॅंगनेटच्या द्रावणाने निर्जंतुकिकरण करावे. 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक24/2025 - 2026         शुक्रवार, दिनांक 20.06.2025

 

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 19 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, परभणी,नांदेड व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे तर लातूर जिल्हयात वादळी वारासह मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 20 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, परभणी व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर इतर जिल्ह्यात हलक्या पाऊसाची शक्यता आहे. दिनांक 21 ते 23 ऑगस्ट कालावधीत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पाऊसाची शक्यता आहे.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...