हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 18 जुलै
रोजी नांदेड व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग
अधिक (ताशी 30
ते 40 कि.मी.) राहून
मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 जूलै रोजी परभणी, हिंगोली, धाराशिव, बीड,
जालना, छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तर दिनांक 19 जूलै रोजी लातूर, धाराशिव
जिल्हयात तर दिनांक 20 जूलै रोजी नांदेड जिल्हयात तर दिनांक 21 जूलै रोजी परभणी,
हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक
(ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते
मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 18 व 21 जूलै रोजी काही
ठिकाणी तर दिनांक 19, 20 व 22 जूलै रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची
शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात तर किमान तापमानात
पुढील चार ते पाच दिवसात फारशी तफावत जाणवनार नाही.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 18 ते 24 जुलै, 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त व किमान
तापमान सरासरीएवढे व दिनांक 25 ते 31 जुलै
2025 दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात
बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी झालेला आहे.
संदेश : पेरणी न
झालेल्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाला असल्यास सूर्यफुल, तूर, संकरीत बाजरी, सोयाबीन + तूर
(4:2), बाजरी + तूर (3:3), एरंडी, कारळ आणि तिळ, एरंडी + धने ही पिके घ्यावीत.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीन पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.
सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळ्या व घाटेअळी (उंट अळी)चा प्रादूर्भाव दिसून येत
असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस 50% ईसी 20
मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 4.90 % सीएस 6 मिली किंवा
इंडोक्झकार्ब 15.80 % ईसी 7 मिली प्रति 10 लिटर पाणी यापैकी
कुठलेही एक किटकनाशक पाऊसाने उघाड दिल्यास फवारावे. सोयाबीन पिक पेरणी करून 20
दिवस झाले असल्यास तणांच्या व्यवस्थापनासाठी इमॅझोमॅक्स 35% + इमीझीथीपायर 35% 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून पावसाची उघाड बघून फवारवे. सोयाबीन पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार पाणी द्यावे. सोयाबीन पिकाची पेरणी
करून एक महिना झाला असल्यास 1 % (100 ग्रॅम प्रति 10 लिटर)
पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमूळे सोयाबीन पिक पिवळे दिसून येत असल्यास
याच्या व्यवस्थापनासाठी मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड
बघुन फवारणी करावी. खरीप ज्वारी पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत
ठेवावे. खरीप ज्वारी पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार
पाणी द्यावे. खरीप ज्वारी पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास 1
% (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45)
फवारणी करावी. खरीप ज्वारी पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास
उर्वरीत 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद व 20 किलो पालाश प्रति हेक्टरी खतमात्रा
द्यावी. पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया
करूनच बाजरी पिकाची पेरणी करावी. बाजरी पिकाची पेरणी 30 जुलैपर्यंत करता येते. बाजरी पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण
विरहीत ठेवावे. बाजरी पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार
पाणी द्यावे. बाजरी पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास 1 % (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. बाजरी पिकाची पेरणी करून एक महिना
झाला असल्यास उर्वरीत 40 किलो नत्र, 20
किलो स्फुरद व 20 किलो पालाश प्रति हेक्टरी खतमात्रा
द्यावी. उस पिकात पांढरी माशीचा व पाकोळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी, लिकॅनीसिलियम लिकॅनी या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी. रासायनिक कीटकनाशकामध्ये क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 30 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 3 मिली किंवा ॲसीफेट 75
% 20 ग्रॅम प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारावे. इमिडाक्लोपीड 17.8% कीटकनाशकासोबत 2 टक्के युरिया (200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) मिसळून पावसाची
उघाड बघून फवारणी करावी. ऊस पिकास पाण्याचा ताण
बसत असल्यास उपलब्धतेनूसार पाणी द्यावे. हळदीमध्ये
आंतरपीके घेताना पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यापर्यंत काढणी होईल अशा प्रकारची
आंतरपीके निवडावीत. यामध्ये पालेभाज्या सारख्या आंतरपिकांचा समावेश असावा. हळद पिकास
पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार पाणी द्यावे. हळद पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. हळद पिकास 25 किलो
नत्र प्रति हेक्टरी सूक्ष्म सिंचन पध्दतीने महिन्यातून तीन ते चार वेळा द्यावे.
फळबागेचे व्यवस्थापन
मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षत
घ्यावी व आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. संत्रा नविन बाग लागवडीसाठी नागपूर
संत्रा, किन्नो तर मोसंबी नविन बाग लागवडीसाठी न्यूसेलर, सातगुडी व फुले मोसंबी
इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची
खरेदी करावी. अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेत रसशोषण करणाऱ्या किडींच्या
व्यवस्थापनासाठी कीटकनाशकाची फवारणी पावसाची उघाड बघून करावी. डाळींब बागेतील अतिरिक्त फुटवे काढावेत. मृग
बहार डाळींब बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षत घ्यावी व आवश्यकतेनूसार
पाणी व्यवस्थापन करावे. डाळींब नविन बाग लागवडीसाठी भगवा, फुले भगवा सुपर, गणेश,
फुले आरक्ता, इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत
रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. डाळींब बागेत 00:52:34 15 ग्रॅम प्रति लिटर
पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. चिकू नविन बाग लागवडीसाठी
कालीपत्ती, क्रिकेट बॉल इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत
रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. चिकू बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन
करावे.
भाजीपाला
भाजीपाला पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास आवश्यकतेनूसार सूक्ष्म
सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला
पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून
भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. पाऊस झालेल्या
ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी,
कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. काढणीस तयार असलेल्या
भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव
दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
फुल पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास आवश्यकतेनूसार सूक्ष्म सिंचन
पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. पाउस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची
पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. काढणीस तयार
असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.
तुती रेशीम उद्योग
चिन देशाच्या तुलनेत भारतात वर्षाकाठी रेशीम कोषाची सरासरी निम्मी
पिके म्हणजे 4-5 पिके घेतली जातात याउलट चिन देशात वर्षाला कोषाची 10 ते 12 पिके
घेतली जातात. प्रती एकर प्रती पिक चिन देशात 250 ते 300 अंडीपूजाचे एक पीक तर
भारतात 1550 ते 200 अंडीपूज सरासरी घेतले जातात. जागतीक कच्च्या रेशीम उत्पादनात
सातत्याने चिन देश प्रथम क्रमांकावर आहे. भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रेशीम
उद्योगात भारत देशात 8.9 दशलक्ष लोकांना रोजगार उपलब्ध होतो तर चिन देशात फक्त 1
दशलक्ष लोक हे रेशीम उद्योगाचे कार्य करत आहेत. चिन देशाच्या तुलनेत आपल्या
शेतकऱ्यांनी तुती पानाची प्रत आणि रेशीम किटक संगोपन तंत्रज्ञान सुधारणा करणे
गरजेचे आहे तरच जागतीक स्पर्धेत राहता येईल.
पशुधन व्यवस्थापन
गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी स्कीन रोगाचा प्रादूर्भाव अत्यंत वेगाने
होत आहे. याची सर्वात जास्त झळ लहान वयातील वासरांना जाणवत असून मृत्यूचे प्रमाण
वाढत आहे. अशा वेळी नियंत्रणासाठी व त्यांची शारिरीक प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी
1) वासरांना चिक पाजावा. 2) वयाच्या सातव्या दिवशी जंतनाशक औषधीची मात्रा द्यावी.
3) महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक तत्वानूसार लसीकरण करून घ्यावे. 4)आजारी
आणि निरोगी वासरे, गोधन स्वतंत्र पणे विलगीकरण करावे. 5) सर्वात महत्वाचे म्हणजे
20% सूश्रूषा व 80% काळजी (ज्यामध्ये पाणी, सकस चारा,
जखमांची सुश्रुषा ईत्यादी) गोष्टी कराव्यात.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 32/2025
- 2026 शुक्रवार, दिनांक
– 18.07.2025
No comments:
Post a Comment