प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त
झालेल्या अंदाजानुसार दिनांक 16 ऑगस्ट रोजी नांदेड, परभणी, बीड, हिंगोली,
उस्मानाबाद व लातूर जिल्हयात तर दिनांक 17 ऑगस्ट रोजी मराटवाडयातील सर्व जिल्हयात काही ठिकाणी वादळी वारा,
विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
उपग्रहाच्या आधारे मिळालेल्या
माहितीनूसार सध्या मराठवाडयात बाष्पोतसर्जानाचा वेग वाढलेला दिसून येत आहे, याचाच
परिणाम म्हणजे वातावरण दमट होते अशा वातावरणात किडींचा व रोगाचा प्रादूर्भाव
वाढतो.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 18 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस
सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
जूलै महिन्यात झालेला पाऊस त्यांनंतर पावसात पडलेला खंड,
सध्या वाढलेले तापमान त्याचबरोबर दिवस व रात्र यामधील तापमानाची तफावत यामुळे सोयाबीन
पिकावर रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी
थायामिथॉक्झाम 12.60% + लॅमडा
सायहॅलोथ्रीन 9.50% झेडसी
2.5 मिली किंवा बीटासायफ्लूथ्रीन
8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% 7 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकावरील शेंगा करपाच्या
प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी फुलोरा अवस्थेतील सोयाबीन पिकावर टेब्यूकोनॅझोल 10% डब्ल्यूपी + सल्फर 65% डब्ल्यूजी 15 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास 1%
(100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. पाण्याची उपलब्धता असल्यास सोयाबीन
पिकात तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
डायनॅमिक क्रॉप वेदर कॅलेंडर नुसार फुलोरा अवस्थेतील
सोयाबीन पिकास पुढील पाच दिवसात हलके पाणी देण्याची आवश्यकता आहे.
खरीप ज्वारी पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील
तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. खरीप ज्वारी पिकात पाण्याचा
ताण बसत असल्यास पाणी द्यावे. खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली
किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील
किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात
पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. बाजरी पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील
ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. बाजरी पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास पाणी द्यावे.ऊस
पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. ऊस पिकात हूमणीच्या
अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा
4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव
दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.हळद पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास ठिबक
सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे
स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद
पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत
संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).
फळबागेचे व्यवस्थापन
नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी बागेत हलकी कोळपणी
करावी जेणेकरून बागेतील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.
संत्रा/मोसंबी बागेत पाण्याचा ताण बसत असल्यास ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा
प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली
किंवा प्रोपरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य गंधक
3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी
15 दिवसांच्या अंतराने करावी. नविन लागवड केलेल्या डाळींब बागेत हलकी कोळपणी करावी जेणेकरून बागेतील तणांचे
नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. डाळींब बागेत पाण्याचा ताण
बसत असल्यास ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.नविन लागवड केलेल्या चिकू बागेत हलकी
कोळपणी करावी जेणेकरून बागेतील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास
मदत होईल. चिकू बागेत पाण्याचा ताण बसत असल्यास ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
भाजीपाला
भाजीपाला पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे
नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. भाजीपाला पिकात पाण्याचा ताण
बसत असल्यास सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. मिरची पिकात भूरी रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत
असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोव्यूटॅनील 10% डब्ल्यूपी 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी. भाजीपाला
( मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण
करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी
पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली
किंवा डायमेथोएट 30% 13 मीली
प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
नविन लागवड केलेल्या फुल पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून
पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. फुल पिकात पाण्याचा
ताण बसत असल्यास सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
चारा पिके
चारा पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे
नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. चारा पिकात पाण्याचा ताण बसत
असल्यास पाणी द्यावे. चारा पिकासाठी लागवड केलेल्या मका पिकावरील लष्करी
अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त
झाडे उपटून नष्ट करावीत व 5% निंबोळी
अर्काची फवारणी करावी.
तुती रेशीम
उद्योग
नविन तूती लागवड तूती बेणे ऐवजी तिन महिने वयाच्या तूती
रोपांपासून करण्याचे निर्बंध महाराष्ट्र शासनाच्या वतीने लावण्यात आले आहेत. ज्या शेतातपूर्वी
मिरची, तंबाखू किंवा भाजीपाला लागवड असेल किंवा जास्त किटकनाशकाचा वापर केला असेल अशा
शेतात तूतीची लागवड करू नये. अशा शेतात जमिनीतील विषाचे जास्त प्रमाण असेल तर सहा महिन्यापर्यंत
रेशीम किटक मृत पावतात. रेशीम संगोपन अशा ठिकाणी करू नये. अशा शेतात कूजलेले शेणखत
जून महिन्यात चार टन व नोव्हेंबर महिन्यात चार टन असे एकूण एकरी आठ टन द्यावे. गांडूळ
खत जूनमहिन्यात एक टन व नोव्हेंबर महिन्या एक टन असे दोन टन एकरी दोन हप्त्यात द्यावेत.
पाणी हलक्या जमिनीत सात दिवसाच्या व भारी जमिनीत दहा दिवसाच्या अंतराने द्यावे.
सामुदायिक विज्ञान
पावसाळयामध्ये
पाणी दूषित झालेले असते. अशा पाण्याचा वापर केल्याने, अतिसार, उलटया, गॅस्ट्रो,
कावीळ, टायफाईड असे आजार होण्याची शक्यता असते. त्यामूळे असे घातक आजार
टाळण्यासाठी पिण्याच्या पाण्यात तूरटी फिरवून पाणी उकळून, गाळून आणि थंड करून
त्याचा वापर करावा.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 39
/ 2021 - 2022 शुक्रवार, दिनांक - 13.08.2021
No comments:
Post a Comment