प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से.
ने घट होण्याची शक्यता आहे. दिनांक 23 जून रोजी हिंगोली, नांदेड, परभणी जिल्हयात
तर दिनांक 24 जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, परभणी,
उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट,
वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 23 जून रोजी तूरळक ठिकाणी दिनांक 24 जून रोजी काही ठिकाणी तर दिनांक 25,
26 व 27 जून रोजी बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 23 ते 29 जून 2023 दरम्यान पाऊस सरासरीएवढा व
दिनांक 30 जून ते 06 जूलै दरम्यान औरंगाबाद, जालना, बीड जिल्हयात पाऊस सरासरीएवढा
तर इतर जिल्हयात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 28 जून ते 04 जूलै 2023 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा
कमी व किमान
तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा
जास्त राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे
तर जमिनीतील ओलावा किंचित कमी झालेला आहे.
अद्याप मराठवाड्यात मान्सूनचे आगमन झाले नसून शेतकऱ्यांनी पेरणीची
घाई करू नये. मान्सूनचा
पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी. सर्वसाधारणपणे 15 जूलै पर्यंत सर्व खरीप
पिकांची (मूग, उडीद, भुईमूग सोडून) पेरणी करता येते.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीनची पेरणी 45X5 सें.मी. अंतरावर व
2.5 ते 3.0 सें.मी. खोलीवर करता येते. सोयाबीन पेरणीसाठी हेक्टरी 65 किलो बियाणे
वापरावे. सोयाबीनची पेरणी 15 जुलै पर्यंत करता येते. सोयाबीन पिकाची पेरणी शक्यतो
बी.बी.एफ (रूंद वरंबा सरी) पध्दतीने करावी ज्यामूळे मातीतील ओलावा व जमिनीची
सुपिकता टिकून राहण्यास मदत होऊन अधिक उत्पादन मिळते. खरीप ज्वारीच्या पेरणीसाठी
दोन ओळीमध्ये 45 सें.मी., दोन झाडातील अंतर 12.5 सें.मी.
ठेवावे व पेरणी 3 ते 4 सें.मी. खोलीवर करता येते. पेरणीसाठी हेक्टरी 7.5 किलो
संकरित व 10 किलो सुधारीत वाणांचे बियाणे वापरावे. खरीप ज्वारीची पेरणी जुलैच्या
पहिल्या आठवड्यापर्यंत करता येते. बाजरीची पेरणी 45X15 सें.मी.
अंतरावर करता येते. पेरणी करतांना 4 सें.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये. बाजरी
पेरणीसाठी हेक्टरी 3 ते 4 किलो बियाणे वापरावे. बाजरीची पेरणी 20 जुलै पर्यंत करता येते. सुरू ऊसाची पक्की बांधणी केली नसल्यास ती करून
घ्यावी व पक्की बांधणी करतांना 100 किलो नत्र, 55 किलो स्फुरद व 55 किलो पालाश
प्रति हेक्टरी रासायनिक खतांची मात्रा द्यावी.
हळदीमध्ये आंतरपीके घेताना पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यापर्यंत काढणी
होईल अशा प्रकारची आंतरपीके निवडावीत. यामध्ये पालेभाज्या सारख्या आंतरपिकांचा
समावेश असावा.
फळबागेचे व्यवस्थापन
नवीन संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू
लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.
चारा पीके
मका या चारापिकाची पेरणी 30X45 सेंमी अंतरावर
करावी. पेरणीसाठी प्रति हेक्टरी 40 ते 45 किलो बियाणे वापरावे.
भाजीपाला
वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट
वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम
स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची
लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान
झाडांना आधार द्यावा.
फुलशेती
तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा
कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता
असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.
पशुधन
व्यवस्थापन
वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट
वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम
स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी
बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा
नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व
पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या
आडोशाला थांबू नये.
तुती रेशीम उद्योग
तुती लागवड केल्या नंतर दूसऱ्या वर्षात
जून महिन्यात आठ ते दहा महिने वयाची झाडे बेणे म्हणून छाटणी करून विक्री करता
येतात, किंवा स्वत:च लागवड क्षेत्र वाढवायचे असेल तर तुती रोप वाटीका तयार
करण्यासाठी वापरता येईल. छाटणी जमिनीलगत न करता 1.25 फुट उंचीवरून करावी म्हणजे नंतर येणाऱ्या 4 ते 5
फांद्या पासून वर्षभर व पुढील 2-3 वर्षाकरिता तुती पानाचे उत्पादन मिळेल. परिपक्व तुती
पाने उत्पादनासाठी हे आवश्यक आहे. त्याचबरोबर उच्च प्रतिच्या तुती पाने
उत्पादनासाठी शेणखत 20 मे.टन/हे./वर्ष म्हणजे 8 टन प्रति एकर दोन समान हप्त्यात 4
टन जून व 4 टन नोव्हेंबर महिन्यात द्यावा. किंवा 5 टन गांडूळ खत / हेक्टरी म्हणजे
2 टन/प्रति एकर दोन समान हप्त्यात जुन व नोव्हेंबर महिन्यात तुती बागेस द्यावा.
सामुदायिक
विज्ञान
रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण
वाढविण्यासाठी रोजच्या जेवणातील पदार्थांमध्ये विविध पानांची (पावडर) भुकटीचा
उपयोग करता येतो. जसे, कढीपत्यांची पाने, कोबीची पाने, राजगिऱ्याची पाने, शेवग्याची पाने, हरबऱ्याची
पाने आणि बिटाची पाने इत्यादी.
ईतर
शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी हंगामातील
पहिला पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी
गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट
कराव्यात.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 24/2023
- 2024 शुक्रवार, दिनांक – 23.06.2023
No comments:
Post a Comment