प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 07 जूलै रोजी औरंगाबाद, जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात
दिनांक 07 जुलै रोजी
काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या, दिनांक 08 जुलै रोजी
काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या,
दिनांक 09 जुलै रोजी
तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या, दिनांक
10 व 11 जुलै रोजी
तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
विस्तारीत
अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 07 ते 13 जूलै 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त व
दिनांक 14 ते 20 जूलै दरम्यान पाऊस सरासरीएवढा
राहण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार
(ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 12 ते 18 जूलै 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी, किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा दर किंचित कमी झालेला
आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढलेले आहे.
पेरणीयोग्य (75
ते 100 मिमी) पाऊस झालेल्या भागात जमिनीत पुरेसा ओलावा असल्यची खात्री करून
बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. पेरणीयोग्य पाऊस न झालेल्या भागात शेतकऱ्यांनी
पेरणीची घाई करू नये. मान्सूनचा
पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची बिजप्रक्रिया करूनच
पेरणी करावी. सर्वसाधारणपणे
15 जूलै पर्यंत सर्व खरीप पिकांची (मूग, उडीद, भुईमूग सोडून) पेरणी करता येते.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीन पिकास हेक्टरी 30 किलो
नत्र + 60 किलो स्फुरद + 30 किलो पालाश + 20 किलो ग्रॅम गंधक खताची मात्रा
पेरणीच्यावेळी द्यावी. सोयाबीन पिकाची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते. सोयाबीन पिकाची पेरणी शक्यतो
बी.बी.एफ (रूंद वरंबा सरी) पध्दतीने करावी ज्यामूळे मातीतील ओलावा व जमिनीची
सुपिकता टिकून राहण्यास मदत होऊन अधिक उत्पादन मिळते.खरीप ज्वारीस 80 किलो नत्र,
40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश प्रति हेक्टरी खतमात्रा शिफारस केली आहे. त्यापैकी
अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणी करताना द्यावे. खरीप ज्वारी
पिकाची पेरणी जुलैच्या पहिल्या
आठवडयापर्यंत करता येते.बाजरी पिकास हलक्या जमिनीत 40:20:20 व मध्यम ते भारी
जमिनीत 60:30:30 पैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणी करताना
द्यावे. बाजरी पिकाची पेरणी 20 जुलैपर्यंत करता येते.सुरू ऊसाची पक्की बांधणी केली
नसल्यास ती करून घ्यावी व नत्र खताचा चौथा हप्ता द्यावा.हळदीमध्ये आंतरपीके घेताना
पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यापर्यंत काढणी होईल अशा प्रकारची आंतरपीके निवडावीत.
यामध्ये पालेभाज्या सारख्या आंतरपिकांचा समावेश असावा.
फळबागेचे
व्यवस्थापन
पाऊस
झालेल्या ठिकाणी नविन संत्रा/मोसंबी बागेची लागवड करावी. नवीन संत्रा/मोसंबी
लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. लिंबुवर्गीय
पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी
अर्क 5% किंवा ॲझाडिरेक्टीन (10 हजार पीपीएम) 3 ते 5 मिली
प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2.7
मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम
प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15
दिवसांच्या अंतराने करावी.पाऊस झालेल्या ठिकाणी नविन डाळींब बागेची लागवड लागवड
करावी. नवीन डाळींब लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी
करावी.पाऊस झालेल्या ठिकाणी नविन चिकू बागेची लागवड लागवड करावी. नवीन चिकू
लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.
भाजीपाला
पाऊस
झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा.
भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. गादीवाफ्यावर
तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या
ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड
करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
पाउस
झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा असल्याची
खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी.
काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी.
चारा पिके
मका या
चारापिकासाठी 80:40:40 नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्टरी खत मात्रा पेरणीच्यावेळी
द्यावी.
तुती रेशीम
उद्योग
ढगाळ
वातावरणात रेशीम कीटक संगोपनाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. बाह्य रेशीम कीटक
संगोपनगृहात 25 अं.से. तापमान व 65 टक्के सापेक्ष आर्द्रता कात अवस्थेत असणे
आवश्यक असते. कातेवर बसताना 5 ग्रॅम प्रति चौ. फुट याप्रमाणे पांढरा कळीचा चूना
अळयांवर धुरळणी करावी. 24 तास कात अवस्थेत तुतीपाने खाद्य देऊ नये. त्यामूळे कात
ओळखता येणे महत्वाचे आहे. काते वरून उठताना खाद्य देण्याअगोदर अर्धातास निर्जंतूक
विजेता किंवा अंकुश पावडर अळ्यांवर सचिद्र पातळ सुती कपडयाने धुरळणी करावी. 100
अंडीपूजास 15 कि.ग्रॅ. चुना व 4.5 कि.ग्रॅ. विजेता पावडर लागते.
पशुधन व्यवस्थापन
पीपीआर
या विषाणूजण्य रोगाचा प्रादूर्भाव पावसाळयाच्या सुरुवातीस वाढत जातो. म्हणून या
रोगावर उपलब्ध असलेल्या लसीचे तिन महिने व त्यावरील वयोगटातील शेळी-मेंढीच्या
पिल्लांमध्ये लसीकरण करून घ्यावे. ही लस गर्भ धारण शेळी-मेंढी मध्ये करू नये.
सामुदायिक विज्ञान
पावसाळयात
हिरव्या भाजी-पाल्याचा, स्वच्छ धूवून कमी प्रमाणात वापर करावा. याशिवाय फळभाज्या,
जसे की कारले, दोडके, दिलपसंद, दुधीभोपळा, बटाटा, शेंगा यांचा जास्त वापर करावा.
ईतर
शंखी
गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या
मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा
चूना टाकून नष्ट कराव्यात.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 28/
2023 - 2024 शुक्रवार, दिनांक – 07.07.2023
No comments:
Post a Comment