प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना
जिल्हयात बहुतांश ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना,
विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मुसळधार ते खूप
मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 15 सप्टेंबर रोजी बीड जिल्हयात
बहुतांश ठिकाणी वादळी
वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून
हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 15 सप्टेंबर रोजी नांदेड,
परभणी व हिंगोली जिल्हयात बहुतांश ठिकाणी तर दिनांक 16 सप्टेंबर रोजी औरंगाबाद व
जालना जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा
वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 17 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर
दिनांक 18 व 19 सप्टेंबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता
आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अं.से. ने हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात
दिनांक 15 ते 21 सप्टेंबर दरम्यान पाऊस
सरासरीपेक्षा जास्त व दिनांक 22 ते 28
सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते
सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 20 ते 26 सप्टेंबर 2023 दरम्यान कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे
तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची
शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा
वेग वाढलेला आहे.
अमृत महोत्सवी मराठवाडा मुक्ती
संग्राम दिनानिमित्त दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता सभागृह कृषि
महाविद्यालय परभणी रबी पीक परिसंवाद 2023 आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व
शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
शक्य असल्यास वापसा स्थितीत
सोयाबीन पिकातील उपटतण करून घ्यावे, जेणेकरून रब्बी हंगामात होणाऱ्या तणांचा
प्रादूर्भाव कमी होईल. सध्याच्या ढगाळ व दमट हवामानामूळे सोयाबीन पिकावर चक्री
भुंगा, शेंगा पोखरणारी अळी, तंबाखू वरील पाने खाणारी अळी आणि केसाळ अळी या किडींचा
प्रादूर्भाव दिसून येत आहे. याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरॅट्रानिलीप्रोल 18.5 % - 60
मिली किंवा थायमिथोक्झाम 12.6% + लँम्बडा सायहँलोथ्रिन
9.5% (पूर्वमिश्रित कीटकनाशक) - 50 मिली किंवा इमामेक्टिन बेंझोएट 1.90 % - 170 मिली
किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल 9.3 % + लँम्बडा सायहँलोथ्रिन 4.6 %- 80 मिली (पूर्वमिश्रित
कीटकनाशक) किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18% - 100 ते 120 मिली किंवा बिटा सायफ्ल्युथ्रीन
8.49 % + इमिडाक्लोप्रीड 19.81 % (पूर्वमिश्रित कीटकनाशक) -140 मिली किंवा असिटामाप्रीड
25 % + बाइफेन्थ्रीन 25 %-100 ग्रॅम यापैकी कुठलेही एक कीटकनाशक प्रती एकर याप्रमाणात
दोन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारावे. सध्याच्या ढगाळ व दमट हवामानामूळे
सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादूर्भाव दिसून आल्यास, पानावरील ठिपके, रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट,शेंगा करपा आणि इतर बुरशीजन्य रोगाकरीता टेब्युकोनॅझोल 10%+
सल्फर 65 % (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) - 500 ग्रॅम प्रति एकर किंवा टेब्युकोनॅझोल 25.9
% -250 मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% - 150 ते 200 ग्रॅम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन
13.3 % + इपिक्साकोनाझोल
5 टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) -300 मिली प्रति एकर दोन दिवसानंतर पावसाची उघाड
बघून फवारावे. काढणी केलेल्या मुग/उडीद
पिकाच्या शेंगाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेंगा पावसात भिजणार नाहीत याची
काळजी घ्यावी. खरीप ज्वारी पिकात लष्करी
अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट
5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7
एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून दोन
दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात
पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. बाजरी
पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम
किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील
किटकनाशकांची आलटून पालटून दोन दिवसानंतर
पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल
अशाप्रकारे फवारणी करावी. ऊस पिकावर खोड
किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 %
25 मिली किंवा
क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाची उघाड बघून
फवारणी करावी. ऊस पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे,
याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाची
उघाड बघून फवारणी करावी. हळद पिकात हूमणीच्या
अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक
बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10
किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा. हळद पिकात कंदमाशीचा
प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने
क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10
मिली प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून आलटून-पालटून दोन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद
पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत
संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). मागील आठवडयात झालेल पाऊस, आर्द्रता व ढगाळ
वातावरणामूळे हळदीच्या पानावरील ठिपके याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन
18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा
प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% किंवा अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम
30 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 20 मिली किंवा प्रोपरगाईट 20 ईसी 10 मिली
किंवा इथिऑन 20 ईसी 20 मिली किंवा अबामेक्टिन 1.9 ईसी 3.7 मिली किंवा
डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 20 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 30 ग्रॅम प्रती 10 लिटर
पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास
दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. डाळींब बागेत ढगाळ वातावरण व
आर्द्रतेमुळे रोगाच्या व्यवस्थापनासाठी बोर्डो मिश्रण 0.5% किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% डब्ल्यूपी 2.5 ते 3 ग्रॅम प्रति लिटर किंवा कॉपर
हायड्रॉक्साईड 53.8% 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर + स्प्रेडर स्टिकर 0.3 ते 0.5 मिली प्रति लिटर
दोन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
भाजीपाला
मागील काही दिवसात झालेला पाऊस व
ढगाळ वातावरणामूळे, भेंडी व काकडी वर्गीय पिकावरील भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी
मायक्लोब्युटॅनील 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला (
मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण
करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी
पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन
15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
फुलशेती
पुढील आठवडयात गणपती उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी
असते. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून
बाजारपेठेत पाठवावी.
चारा पिके
मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत व 5% निंबोळी अर्काची किंवा अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 30 मिली प्रति 10 लिटर
पाणी याप्रमाणे दोन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
तुती रेशीम
उद्योग
तुती बागेची वाढ दणकट होण्यासाठी
शेणखत व्यवस्थापन होणे महत्वाचे आहे. 20 मे. टन शेणखत/वर्ष/हे. किंवा 5 टन गांडूळ
खत/हे./वर्ष द्यावे म्हणजे सर्व 16 प्रकारचे अन्न घटक तुती बागेस मिळतात.
शेतकऱ्यांनी युरीया डिएपी सारख्या खतांचा अतिरेक तुती बागेत करणे घातक ठरते.
त्यामूळे रसशोषण करण्याऱ्या किडीचा उदा. तुडतुडे, फुलकिडे यांचा प्रादुर्भाव वाढतो
व पावसाच्या खंड कालावधीत शेतकरी किड नियंत्रण करण्यासाठी किटकनाशकाची फवारणी
करतात. तुती बागेवर किटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक किंवा रासायनिक खत हे
शिफारसीशिवाय तुती बागेवर वारू नयेत. विषबाधेमुळे रेशीम किटक मृत पावतात. त्यामूळे
जैविक किटकनाशके, लिंबोळी अर्क, लिंबोळी पेंड यांचा फवारणीसाठी वापर करावा.
पशुधन व्यवस्थापन
तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह
मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्यामूळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू
नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे
व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी स्कीन
रोगाचा प्रादूर्भाव अत्यंत वेगाने होत आहे. याची सर्वात जास्त झळ लहान वयातील
वासरांना जाणवत असून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी नियंत्रणासाठी व त्यांची
शारिरीक प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी 1) वासरांना चिक पाजावा. 2) वयाच्या सातव्या
दिवशी जंतनाशक औषधीची मात्रा द्यावी. 3) महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक
तत्वानूसार लसीकरण करून घ्यावे. 4)आजारी आणि निरोगी वासरे, गोधन स्वतंत्र पणे
विलगीकरण करावे. 5) सर्वात महत्वाचे म्हणजे 20% सूश्रूषा व 80% काळजी (ज्यामध्ये पाणी, सकस चारा, जखमांची सुश्रुषा
ईत्यादी) गोष्टी कराव्यात. 6) “माझे पशुधन माझी जबाबदारी” या सुत्रानूसार आपल्या
गोवंशीय पशुधनाची या कालावधीमध्ये जास्तीत जास्त काळजी घ्यावी.
सामुदायिक विज्ञान
बालकांचा विकास साधण्यासाठी
कुटुंबियांनी त्यांना सोप्या भाषेत लहान लहान गोष्टी सांगाव्यात. गोष्टी सांगत
असतांना त्या आवाजात चढउतार करून, चेहऱ्यावर योग्य हाव-भाव करून व त्यासाठी
चित्रांची मदत घेऊन सांगितल्यास बालकांना त्या अधिक मनोरंजक वाटतात.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 48/2023 - 2024 शुक्रवार, दिनांक – 15.09.2023
No comments:
Post a Comment