प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 27 व 29 फेब्रुवारी तसेच 01 मार्च रोजी तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे, किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात
दिनांक 01 ते 07 मार्च दरम्यान पाऊस
सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त
राहण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 03 ते 09 मार्च 2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा
कमी, कमाल
तापमान सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे
राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात
बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या
स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार
असलेल्या हरभरा, रब्बी ज्वारी व गहू पिकाची
काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या
बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकास कणसात दाणे
भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. दाणे भरण्याच्या
अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी पिकाचे पक्षांपासून संरक्षणासाठी उपाय योजना
कराव्यात. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, गहू
पिकास दाणे भरताना (पेरणीनंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. गव्हाच्या
पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग
गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद
करावीत. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, वेळेवर
पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे.
फळबागेचे व्यवस्थापन
कमाल तापमानात झालेली वाढ,
वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, केळी
बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. जालना जिल्हयात दिनांक 26 फेब्रुवारी
रोजी झालेल्या वादळी वारा, पाऊस व गारपीटीमूळे बागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट
करावीत. मोडलेली झाडे बागेबाहेर काढावी. बागेत रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून
मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून संरक्षणात्मक फवारणी घ्यावी. कमाल
तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन
करावे. आंबा बागेत वटाणा व सुपारीच्या आकाराच्या आंबा फळांची गळ दिसून आल्यास
याच्या व्यवस्थापनासाठी बागेत एनएए 15 पीपीएम ची फवारणी करावी. जालना जिल्हयात दिनांक 26 फेब्रुवारी रोजी
झालेल्या वादळी वारा, पाऊस व गारपीटीमूळे बागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत.
मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी. बागेत रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून
मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून संरक्षणात्मक फवारणी घ्यावी. तूरळक
ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार
असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून घ्यावी. जालना जिल्हयात दिनांक 26 फेब्रुवारी
रोजी झालेल्या वादळी वारा, पाऊस व गारपीटीमूळे बागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट
करावीत. मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे
करून तण नियंत्रण करावे. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या
वेगामूळे, भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी
द्यावे. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात
घेता, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. जालना जिल्हयात
दिनांक 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या वादळी वारा, पाऊस व गारपीटीमूळे प्रादूर्भाव
ग्रस्त भाजीपाला गोळा करून नष्ट करावा. भाजीपाला
पिकात रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून संरक्षणात्मक फवारणी घ्यावी.
फुलशेती
तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या
स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या गुलाब फुलांची काढणी
कडून बाजार पेठेत पाठवावी. कमाल तापमानात
झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, फुल
पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
पशुधन व्यवस्थापन
सध्या कमाल तापमानात होत असलेल्या
वाढीमूळे उन्हाच्या तीव्रतेपासून पशुधनाच्या संरक्षणासाठी दूपारच्या वेळी जनावरे
सावलीमध्ये बांधावीत.
जालना जिल्हयात झालेल्या गारपीटीमूळे
पशुधनास मोठ्या प्रमाणात इजा जखमा झाल्या असल्यास यावर तत्काल उपचार करणे आवश्यक
आहे. यासाठी हळद कडुलिंब तेल अथवा करंज तेलात मिसळून जखमांवर लावावी अत्यंत कमी
खर्चात हा उपचार होतो.
सामुदायिक विज्ञान
मानवी जीवनातील सुरूवातीच्या आठ
वर्षाच्या काळात बालकांचा विकास अत्यंत झपाट्याने होत असतो. या काळात बालकांच्या
सर्वांगीण विकासाला पूरक चालना देणारे वातावरण पुरवणे ही प्रत्येक कुटुंबाची
जबाबदारी आहे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला
पत्रक क्रमांक – 95/ 2023 - 2024 मंगळवार, दिनांक – 27.02.2024
No comments:
Post a Comment