प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस
तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक
12 एप्रिल रोजी नांदेड, बीड, हिंगोली,
परभणी, धाराशिव व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
दिनांक 12 एप्रिल रोजी नांदेड, बीड, हिंगोली, परभणी, धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजी
नगर व जालना जिल्हयात काही ठिकाणी तर दिनांक 13 एप्रिल रोजी जालना, नांदेड, लातूर,
बीड, धाराशिव, हिंगोली व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना,
विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम
स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात किंचित
घट होऊन त्यानंतर कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला:
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 12 ते 18 एप्रिल दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा जास्त, कमाल तापमान
सरासरीपेक्षा कमी आणि किमान तापमान सरासरी पेक्षा कमी राहण्याची व 19 ते 25 एप्रिल
दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी आणि किमान तापमान
सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या
उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार
मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग किचिंत कमी झालेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 17 ते 23 एप्रिल 2024 दरम्यान पाऊस सरासरी
पेक्षा जास्त, कमाल तापमान मध्यमप्रमाणात सरासरी पेक्षा
कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
संदेश :
तूरळक
ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, मळणी केलेल्या
मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
दिनांक 12 व 13 एप्रिल रोजी तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते
मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच दिनांक 12 एप्रिल रोजी नांदेड, बीड, हिंगोली, परभणी, धाराशिव व लातूर जिल्हयात
गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, मळणी
केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणी केलेला माल पावसात भिजणार
नाही याची दक्षता घ्यावी. दिनांक 12 व 13 एप्रिल रोजी तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते
मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच दिनांक 12 एप्रिल रोजी नांदेड, बीड, हिंगोली, परभणी, धाराशिव व लातूर जिल्हयात
गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, काढणी न
केलेल्या व काढणीस तयार असलेल्या गहू व करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी
करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीने झाकून ठेवावा.
काढणी/मळणी केलेला माल पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. दिनांक 12
व 13 एप्रिल रोजी तूरळक
ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच दिनांक 12
एप्रिल रोजी नांदेड, बीड,
हिंगोली, परभणी, धाराशिव व लातूर जिल्हयात गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, हळदीची उघडयावर साठवण करू नये.
काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
दिनांक 11 एप्रिल रोजी तूरळक
ठिकाणी झालेल्या वादळी वारा, पाऊस व गारपीट यामूळे संत्रा/मोसंबी व आंबा बागेत
पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत तसेच मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी. दिनांक 12 व 13 एप्रिल रोजी तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते
मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच दिनांक 12 एप्रिल रोजी नांदेड, बीड, हिंगोली, परभणी, धाराशिव व लातूर जिल्हयात
गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार
असलेल्या संत्रा/मोसंबी फळांची काढणी करावी. नविन लागवड केलेल्या व लहान संत्रा/मोसंबी
व आंबा झाडांना काठीने आधार द्यावा. दिनांक 11 एप्रिल
रोजी तूरळक ठिकाणी झालेल्या वादळी वारा, पाऊस व गारपीट यामूळे द्राक्ष बागेत
पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत तसेच मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी. दिनांक 12
व 13 एप्रिल रोजी तूरळक
ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच दिनांक 12
एप्रिल रोजी नांदेड, बीड,
हिंगोली, परभणी, धाराशिव व लातूर जिल्हयात गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या द्राक्ष फळांची काढणी लवकरात
लवकर करून घ्यावी. द्राक्ष बागेमध्ये एप्रिल छाटणी ही घड निर्मितीसाठी केली जाते. द्राक्ष
बागेत एप्रिल छाटणीची पुर्व तयारी करून घ्यावी. दिनांक 12 व 13 एप्रिल रोजी तूरळक ठिकाणी
वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच दिनांक 12 एप्रिल रोजी नांदेड, बीड, हिंगोली,
परभणी, धाराशिव व लातूर जिल्हयात गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, नविन
लागवड केलेल्या व लहान केळी झाडांना काठीने आधार द्यावा.
काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. दिनांक 11
एप्रिल रोजी तूरळक ठिकाणी झालेल्या वादळी वारा, पाऊस व गारपीट यामूळे फळबागेत
पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. मोडलेली झाडे बागेबाहेर काढावी. दिनांक 11 एप्रिल रोजी तूरळक ठिकाणी झालेल्या वादळी
वारा, पाऊस व गारपीट यामूळे चिकू बागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत तसेच
मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी. दिनांक 12 व 13 एप्रिल रोजी तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते
मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच दिनांक 12 एप्रिल रोजी नांदेड, बीड, हिंगोली, परभणी, धाराशिव व लातूर जिल्हयात
गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार
असलेल्या चिकू फळांची काढणी करावी. नविन लागवड केलेल्या व लहान चिकू झाडांना
काठीने आधार द्यावा.
भाजीपाला
दिनांक 11 एप्रिल रोजी तूरळक
ठिकाणी झालेल्या वादळी वारा, पाऊस व गारपीट यामूळे प्रादूर्भाव ग्रस्त भाजीपाला
पिके, टरबूज, खरबूज गोळा करून नष्ट करावीत. दिनांक 12 व 13 एप्रिल रोजी
तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच दिनांक 12
एप्रिल रोजी नांदेड, बीड,
हिंगोली, परभणी, धाराशिव व लातूर जिल्हयात गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज, खरबूज
पिकांची काढणी करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या व लहान वेलवर्गीय झाडांना काठीने
आधार द्यावा.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलांची
काढणी टप्प्याटप्प्याने करून बाजार पेठेत पाठवावी.
चारा पीके
दिनांक 12 व 13 एप्रिल रोजी तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते
मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच दिनांक 12 एप्रिल रोजी नांदेड, बीड, हिंगोली, परभणी, धाराशिव व लातूर जिल्हयात
गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, काढणी
केलेल्या ज्वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण पावसात
भिजल्यास त्याची प्रत खालावून साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात
नाहीत.
पशुधन व्यवस्थापन
दिनांक 12 व 13 एप्रिल रोजी तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते
मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच दिनांक 12 एप्रिल रोजी नांदेड, बीड, हिंगोली, परभणी, धाराशिव व लातूर जिल्हयात
गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, चेतावनीच्या
काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू
नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.
सामुदायिक विज्ञान
स्वस्थ जीवनासाठी आश्यक बाबी :
दररोज संतुलीत आहार घ्या. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. आहारात साखर आणि मीठाचा वापर कमी करा. तेल आणि
मसालेदार पार्थांचा वापर कमी करा. सकाळची न्याहरी करण्यास कधीच टाळाटाळ करु नका.
जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळा.
कृषि अभियांत्रिकी
रब्बी पिकांची कापणी झाल्यानंतर
शेतात नांगरणी करून घ्यावी. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील मातीचे माती परिक्षण करून
घ्यावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 04/2024
- 2025 शुक्रवार, दिनांक
– 12.04.2024
No comments:
Post a Comment