प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस
तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक
19 एप्रिल रोजी धाराशिव जिल्हयात
तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
दिनांक 19 व 20 एप्रिल रोजी धाराशिव,
लातूर व नांदेड जिल्हयात तर दिनांक 21 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड,
नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 22 एप्रिल रोजी बीड व धाराशिव
जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक
(ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात पुढील चोविस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर
कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.सें. ने घट होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला:
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 19 ते 25 एप्रिल दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा जास्त, कमाल तापमान
सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी आणि किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची व 26
एप्रिल ते 02 मे दरम्यान पाऊस सरासरी एवढा, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा
कमी आणि किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या
उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार
मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग किचिंत वाढलेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 24 ते 30 एप्रिल 2024 दरम्यान पाऊस सरासरी
पेक्षा जास्त, कमाल तापमान मध्यमप्रमाणात सरासरी पेक्षा
कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
संदेश :
जमिनीतील ओलावा टिकून
राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी फळझाडाच्या आळयात आच्छादन
करावे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे
उन्हाळी तीळ पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी
शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा
वापर करावा. पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी वादळी
वाऱ्यासह पावसाचा तसेच दिनांक 19 एप्रिल
रोजी धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी गारपीटीचा
अंदाज लक्षात घेता उशीरा पेरणी केलेल्या व
काढणीस तयार असलेल्या गहू व करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य
नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीने झाकून ठेवावा.
काढणी/मळणी केलेला माल पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह
पावसाचा तसेच दिनांक 19 एप्रिल रोजी धाराशिव
जिल्हयात तूरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज
लक्षात घेता हळदीची उघडयावर साठवण करू नये.
काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी
वादळी वाऱ्यासह पावसाचा तसेच दिनांक 19
एप्रिल रोजी धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी
गारपीटीचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या संत्रा/मोसंबी फळांची
काढणी करावी. नविन लागवड केलेल्या व लहान संत्रा/मोसंबी झाडांना काठीने आधार
द्यावा. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे
तापमान संतुलित राहण्यासाठी संत्रा/मोसंबी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. नविन
लागवड केलेल्या फळबागेमध्ये रोपांना शेडनेटच्या साहाय्याने सावली करावी जेणेकरून
लहान रोपांचे प्रखर उन्हापासून संरक्षण होईल. पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा तसेच दिनांक 19 एप्रिल रोजी धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज लक्षात
घेता काढणी राहिलेल्या द्राक्ष फळांची
काढणी करून घ्यावी. द्राक्ष बागेमध्ये एप्रिल छाटणी ही घड निर्मितीसाठी केली जाते. द्राक्ष
बागेत एप्रिल छाटणी 15 एप्रिल ते 15 मे या दरम्यान करावी. नविन
लागवड केलेल्या फळबागेमध्ये जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान
संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या फळबागेमध्ये रोपांना
शेडनेटच्या साहाय्याने सावली करावी जेणेकरून लहान रोपांचे प्रखर उन्हापासून संरक्षण
होईल. पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा तसेच दिनांक 19 एप्रिल रोजी धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज लक्षात
घेता काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची
काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. जमिनीतील
ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या
आळयात आच्छादन करावे. बागेस सकाळी
किंवा संध्याकाळी पाणी द्यावे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करावा.
नविन लागवड केलेल्या फळबागेमध्ये रोपांना
शेडनेटच्या साहाय्याने सावली करावी जेणेकरून लहान रोपांचे प्रखर उन्हापासून
संरक्षण होईल. पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा तसेच दिनांक 19 एप्रिल रोजी धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज लक्षात
घेता काढणीस तयार असलेल्या केळीच्या
घडांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी.
भाजीपाला
पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी
वादळी वाऱ्यासह पावसाचा तसेच दिनांक 19
एप्रिल रोजी धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी
गारपीटीचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार
आसलेल्या भाजीपाला पिकांची, कांदा, टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी लवकरात
लवकर करावी. कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे
भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो
सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार
किंवा ठिबक) वापर करावा. टरबूज व खरबूज पिकात फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत
असल्यास कामगंध सापळे वापरावेत. नविन लागवड केलेल्या व लहान वेलवर्गीय झाडांना
काठीने आधार द्यावा.
फुलशेती
पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी
वादळी वाऱ्यासह पावसाचा तसेच दिनांक 19
एप्रिल रोजी धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी
गारपीटीचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार
असलेल्या फुलांची काढणी करून बाजार पेठेत पाठवावी. कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार व
जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे.
चारा पीके
पुढील
पाच दिवस तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा तसेच दिनांक 19 एप्रिल रोजी धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज लक्षात
घेता काढणी केलेल्या ज्वारीचा कडबा पावसात
भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण पावसात भिजल्यास त्याची प्रत खालावून
साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत.
पशुधन व्यवस्थापन
कमाल
तापमानात होत असलेल्या वाढीमूळे आपल्या पशुंना उन्हामध्ये बांधु नका (निदान तिव्र
उन्हाच्या कालावधीमध्ये त्यांना झाडाखाली/सावलीमध्ये किंवा शेड/गोठ्यामध्येच
बांधणे चांगले). पशुंना शक्यतो थंड/स्वच्छ/मुबलक पाणी दोन-तिन वेळेस पाजावे.
पाण्यामुळे पशुंच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (डीहायड्रोजन) होणार नाही. जमल्यास
पाण्यामधून क्षार द्यावेत, 5 लिटर पाण्यामध्ये चिमुटभर गुळ (25
ग्रॅम), थोडे मिठ (5-10 ग्रॅम) आणि 5 ग्रॅम क्षार मिश्रण
दिल्यास उत्तम, मात्र नजीकच्या पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच व्यवस्थापन करावे. अति
उष्ण काळामध्ये जनावरांच्या पाठीवर पोते टाकून ते पाण्याने भिजवून ठेवावे.
पुढील
पाच दिवस तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा तसेच दिनांक 19 एप्रिल रोजी धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज लक्षात
घेता जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये.
निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास
खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती
अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये. तसेच
पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या
आडोशाला थांबु नये.
सामुदायिक विज्ञान
स्वस्थ जीवनासाठी आश्यक बाबी : दररोज संतुलीत आहार घ्या.
दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. आहारात
साखर आणि मीठाचा वापर कमी करा. तेल आणि मसालेदार पार्थांचा वापर कमी करा.
सकाळची न्याहरी करण्यास कधीच टाळाटाळ करु नका. जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळा.
कृषि अभियांत्रिकी
रब्बी पिकांच कापणी झाल्यानंतर शेतात नांगरणी करून घ्यावी.
शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील मातीचे माती परिक्षण करून घ्यावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 06/2024
- 2025 शुक्रवार, दिनांक
– 19.04.2024
No comments:
Post a Comment