Friday, 23 August 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 23 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तर दिनांक 24 ऑगस्ट रोजी नांदेड, छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तूरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 25 ऑगस्ट रोजी हिंगोली जिलहयात बहुतांश ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तूरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 23 ऑगस्ट रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव व लातूर जिल्हयात तर दिनांक 24 ऑगस्ट रोजी परभणी व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 25 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिलहयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 23 ऑगस्ट रोजी  छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तर दिनांक 24 ऑगस्ट रोजी नांदेड, छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तूरळक ठिकाणी मुसळधार  स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 25 ऑगस्ट रोजी हिंगोली जिलहयात बहुतांश ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तूरळक ठिकाणी मुसळधार  स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 23 ऑगस्ट रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव व लातूर जिल्हयात तर दिनांक 24 ऑगस्ट रोजी परभणी व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 25 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिलहयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 23 ते 29 ऑगस्ट दरम्यान व 30 ऑगस्ट 05 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

संदेश :

कापूस पिकात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कपाशीच्या पिकात हेक्टरी पाच याप्रमाणात पिकाच्या उंचीच्या 1 ते 1.5 फुट उंचीवर कामगंध सापळे लावावेत. याद्वारे गुलाबी बोंडअळीच्या प्रादूर्भावाची निरीक्षणे नोंदवीता येतील.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन पिकात पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी एकरी 10 ते 15 पिवळे चिकट सापळे लावावेत. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅकच्या व्यवस्थापनासाठी ‍ॲसिटामिप्रिड 25% + बाइफेन्थ्रीन 25% डब्ल्यू जी 100 ग्रॅम किंवा बीटा साइफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% ओडी 140 मिली किंवा थायमिथोक्झाम 12.6% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन 9.6% झेड सी 50 मिली प्रति एकर यापैकी एका किटकनाशकाची कोणत्याही प्रकारचे तणनाशक न मिसळता पावसाची उघाड बघून याप्रमाणे फवारणी करावी. सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी इथिऑन 50% 600मिली किंवा थायामिथॉक्झाम 12.6% + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 9.5% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 50 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50%  400 मिली किंवा प्रादूर्भाव खूप जास्त असल्यास क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली प्रति एकर यापैकी कुठलेही एक किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारणी करावी. सोयाबीन पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. खरीप ज्वारी पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. पिकात अतिरिक्त पाणी साचणे, कमी तापमान व वाढलेल्या आर्द्रतेमूळे ऊस पिकात पोक्का बोइंग या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्ल्यूपी 50 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 50% डब्ल्यू पी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह पावसाची उघाड बघून 10 ते 12 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात. ऊस पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 ‍किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. ऊस पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). हळद पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. हळद पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 25-30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत फळगळ दिसून येत असल्यास  एनएए 15 पीपीएम ची पावसाची उघाड बघून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. डाळींब बागेतील अतिरिक्त फुटवे काढून टाकावेत. डाळींब बागेत किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 25-30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. डाळींब बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. डाळींब बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. चिकू बागेत जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. चिकू बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

भाजीपाला

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. काकडीवर्गीय पिकात डाऊनी मिल्ड्यू रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटालॅक्झील 4% + मॅर्न्कोझेब 64% 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. भाजीपाला पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. फुल पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. फुल पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

चारा पिके

बहुवार्षिक चारा पिकाला खताचा दूसरा हप्ता देण्यात यावा. बहुवार्षिक चारा पिकाची पहिली कापणी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी करावी.

पशुधन व्यवस्थापन

वातावरणातील वाढीव आर्द्रतेमूळे कृमी (जत) व कॉक्सीडीयन परजीवीचा प्रसार होउ शकतो. त्यासाठी नियमीतपणे गोठ्यातील शेण/मलमूत्र याची योग्य विल्हेवाट लावावी व जनावराच्या गोठ्यामध्ये कोरडेपणा राखावा.

तुती रेशीम उद्योग

भाजीपाला उत्पादक शेतकरी 1 ते 1.5 एकर क्षेत्रावर रेशीम उद्योगाकडे वळू लागले आहेत. महाराष्ट्र राज्यात तुती लागवड केलेल्या 100 शेतकऱ्यांपैकी चौथ्या वर्षापर्यंत 40 टक्के रेशी उद्योगाकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. ज्या शेतामध्ये पुर्वी तंबाखू, मिरची सारखी पीके किंवा भाजीपाला घेत असेल अशा ठिकाणी किटकनाशकाचे अंश जमिनीत राहतात. तेथे तुती ची लागवड करू नये. अतंरप्रवाहि किटकनाशके तुतीच्या पानातून रेशीम किटकाच्या पोटात प्रवेश करतात व रेशीम किटक मृत पावतात. नविन शेतकऱ्यांनी एक एकर क्षेत्रासाठी 8 टन शेणखत कुजलेले किंवा 2 टन गांडूळ खत घालणे आवश्यक आहे. किटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक किंवा रासायनीक खत हे सर्व रसायणेच आहेत. त्याचा वापर कमी केला तरच रेशीम उद्योग होऊ शकतो.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक42/2024 - 2025         शुक्रवार, दिनांक 23.08.2024

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 04 एप्रिल रोजी बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर व परभणी जिल्हयात तर दिनांक 05 एप्रिल रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 06 ते 08 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील चोवीस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 3 ते 4 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील चोविस तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

    हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...