हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार आकाश अंशत: ढगाळ राहून दिनांक 06 सप्टेंबर रोजी नांदेड, परभणी,
हिंगोली व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट,
वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 07 सप्टेंबर रोजी नांदेड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती
संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट,
वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 08 ते 10 सप्टेंबर दरम्यान मराठवाडयात
तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार
नाही तर पुढील 2 ते 3 दिवसात किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 06 ते 12 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा
व 13 ते 19
सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा
कमी राहण्याची शक्यता आहे.
संदेश :
मागील आठवडयात सतत झालेल्या
पावसामूळे पिकात / बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास साचलेल्या पाण्याचा लवकरात
लवकर निचरा करावा व फवारणीची कामे पावसाची उघाड बघून करावीत.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीन, कापूस, खरीप ज्वारी, ऊस
व हळद पिकात पाणी साचले असल्यास साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. सोयाबीन पिकावरील
किडींच्या व्यवस्थापनासाठी क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली किंवा इंडाक्झाकार्ब 15.8% 140 मिली किंवा असिटामाप्रीड 25%
+ बाईफेंन्थ्रीन 25%
100 ग्रॅम किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 9.3% + लँबडा सायहॅलोथ्रिन 4.6% 80 मिली किंवा आयसोसायक्लोसिरम 9.2% 240 मिली प्रति एकर यापैकी कुठलेही एक किटकनाशक पावसाची उघाड
बघून फवारावे. सोयाबीन पिकात करपा
रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65% (पूर्व मिश्रीत बूरशीनाशक) 25 ग्रॅम किंवा
टेब्यूकोनॅझोल 25.9% 12.5 मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% 7.5 ते 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड
बघून फवारणी करावी. कापूस पिकात आकस्मिक
मर किंवा मूळकूज प्रादूर्भाव दिसू लागल्यास 200 ग्रॅम यूरिया +100 ग्रॅम पांढरा पोटॅश
(00:00:50) + 25 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराइड प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तयार
द्रावणाची प्रति झाड 100 मिली याप्रमाणे आळवणी करावी. द्रावणाची आळवणी केल्यानंरत
सूकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने दाबून घ्यावी. खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव
दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून
फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी
करावी. ऊस पिकात हूमणीच्या अळ्या दिसून
येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4
किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10
किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा.
ऊस पिकावर खोड किडीचा
प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 %
25 मिली किंवा
क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत
असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25%
20 मिली किंवा डायमिथोएट 30
% 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ
शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). उघडे पडलेल कंद मातीने झाकून घ्यावेत.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू
बागेत पाणी साचले असल्यास साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. संत्रा/मोसंबी बागेत
फळगळ दिसून येत असल्यास एनएए 15 पीपीएम ची
पावसाची उघाड बघून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत फळवाढीसाठी 00:52:34 10
ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची
उघाड बघून फवारणी करावी. डाळींब बागेत फळवाढीसाठी 00:52:34 10 ग्रॅम प्रति लिटर
पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकात पाणी साचले असल्यास
साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी
करून घ्यावी. काकडीवर्गीय पिकात डाऊनी मिल्ड्यू
रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटालॅक्झील 4% + मॅर्न्कोझेब 64% 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून
फवारणी करावी.
फुलशेती
फुल पिकात पाणी साचले असल्यास साचलेल्या
पाण्याचा निचरा करावा. गणपती व गौरी उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी
आहे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून
बाजारपेठेत पाठवावी.
चारा पिके
चाऱ्यासाठी लागवड केलेल्या
संकरीत नेपियर पिकाची पहिली कापणी 65 ते
70 दिवसानी तर नंतरच्या कापण्या 40 ते 45 दिवसानी (7 ते 8 कापण्या) कराव्यात.
पशुधन व्यवस्थापन
जनावरांच्या गोठ्यात वाढलेली
आर्द्रता गोचिडासह विविध किटकाच्या वाढ व विकासासाठी पोषक असते, त्या किटकांचे
जीवनक्रम थांबवण्यासाठी व त्यापासून प्रसारीत होणाऱ्या रोगप्रतिबंधतेसाठी
गोठ्यातील भेगा व फटीतील अंडी व इतर अर्भकावस्था गोठ्यातून काढून टाकाव्यात.
तुती रेशीम उद्योग
रेशीम किटकांना उच्च प्रतीचा तुती
पाने खाद्य देणे गरजेचे आहे. पानात प्रथीने 23 टक्के शर्करी 13 टक्के व कार्बोदके
10 टक्के प्रमाण असणे आवश्यक आहे. बाल्य रेशीम किटकांना 100 अंडीपूजास पहिले आठ
दिवस एकूण फक्त 22 कि.ग्रॅ. कोवळी तुती पाने खाद्य द्यावे लागते. नंतरच्या
वाढिच्या तिन अवस्थेत कोवळ्या तुती पानांएवजी फांद्या खाद्य दिले तरी चालते.
पानाच्या दुप्पट म्हणजे 100 अंडीपूजास 1.5 टनापर्यंत फांद्या खाद्य लागते.
पावसात भिजलेली औली तुती पाने-फांद्या
खाद्य चालते. त्यात धूळ किंवा चिखल व घाण येता कामा नये. संगोपन गृहात 85
टक्केच्यावर आर्द्रता असेल तर फांद्या खाद्य देण्या अगोदर पांढरा चुना (केमिकल
विरहीत) 100 अंडीपूजास 15 कि.ग्रॅ. प्रमाणात धुरळणी करून पुन्हा फांद्या खाद्य
द्यावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 46/2024
- 2025 शुक्रवार, दिनांक
– 06.09.2024
No comments:
Post a Comment