हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवसात आकाश
स्वच्छ ते अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिनांक 04 ऑक्टोबर रोजी छत्रपती
संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तर दिनांक 05 ऑक्टोबर रोजी छत्रपती
संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, लातूर व नांदेड जिल्हयात तर दिनांक 06 ऑक्टोबर
रोजी धाराशिव, बीड व लातूर जिल्हयात तर दिनांक 07 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हयात तर
दिनांक 08 ऑक्टोबर रोजी लातूर, धाराशिव व नांदेड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना,
विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तूरळक ठिकाणी हलक्या
ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 09 ते 12 ऑक्टोबर दरम्यान
तूरळक ठिकाणी मध्यम ते मूसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन
दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर 2 ते 3 अं.सं. ने
हळूहळू वाढ होण्याची तर पुढील चोवीस तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार
नाही व त्यानंतर 2 ते 3 अं.सं. ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 04 ते 10 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा
कमी तर दिनांक 11 ते 17
ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात
बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
संदेश : प्रादेशिक
हवामान केंद्र, मुंबई येथून
प्राप्त झालेला पावसाच्या अंदाज पाहता ज्या शेतकऱ्यांनी पिकाची काढणी केली असल्यास
काढणी केलेल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. फवारणीची कामे पावसाची उघाड
बघून करावीत. बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्यामूळे पिकास, फळबागेस, भाजीपाला व
फुलपिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
काढणीस तयार असलेल्या सोयाबीन
पिकची काढणी लवकरात लवकर करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेले सोयाबीन पिक वाळल्यानंतर मळणी करावी. खरीप ज्वारी पिकात
लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन
बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा
स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची
आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक
पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. ऊस
पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस
20 % 25 मिली किंवा
क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 %
15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ
शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). उघडे पडलेल कंद मातीने झाकून घ्यावेत. हळदीच्या
पानावरील ठिपके याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4%
(पुर्वमिश्रित बुरशीनाशक)
10 मिली + 5 मिली स्टीकरसह
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हरभरा पिकाच्या पेरणीसाठी पूर्व
मशागतीची कामे झाली असल्यास पेरणी करून घ्यावी. कोरडवाहू हरभरा पिकाची पेरणी
ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाडयात करावी. करडई
पिकाच्या पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे झाली असल्यास पेरणी करून घ्यावी. हमखास
पावसाच्या भागात करडई पिकाची पेरणी 15 ऑक्टोबर पर्यंत करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी बागेत फळगळ दिसून
येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी चिलेटेड झिंक 5 ग्रॅम + चिलेटेड आयर्न 5 ग्रॅम
+ जिब्रॅलिक ॲसिड 10 मिली + 00:00:50 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची
उघाड बघून फवारणी करावी. डाळींब बागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी चिलेटेड झिंक 5 ग्रॅम + चिलेटेड आयर्न 5 ग्रॅम + जिब्रॅलिक ॲसिड
10 मिली + 00:00:50 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून
तण नियंत्रण करावे.
भाजीपाला
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला
पिकांची काढणी करून घ्यावी. गवार या
पिकामध्ये पावडरी मिल्ड्यू रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या
व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून
फवारणी करावी. भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
फुलशेती
नवरात्री व दसरा उत्सवामूळे
बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी असते. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी
टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी. फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून
तण नियंत्रण करावे.
तुती रेशीम उद्योग
किटकनाशक, तणनाशक, बुरशीनाशक
किंवा रासायनिक खत या चारही प्रकारच्या निविष्ठा रेशीम शेतीमध्ये चालत नाहीत. ज्या
शेतामध्ये मिरची किंवा तंबाखूचे पीक असेल तेथे तुती लागवड करू नये. रेशीम किटक
चौथ्या किंवा पाचव्या अवस्थेत मृत पावण्याचे हेच कारण होय. शेजाऱ्याने किटकनाशक
फवारणी केली तरीही रेशीम किटकांवर परिणाम होतो. तेव्हा 20 मे.टन शेणखत/हेक्टर
किंवा 5 टन गांडूळ खत/हेक्टर या प्रमाणात रेशीम शेतीमध्ये तुती लागवडीसाठी वापरणे
गरजेचे आहे. निव्वळ रासायनिक खत वापरून वाढवलेल्या तुती बागेतील पानात रसायण अंश
येत असल्याने अळ्या मृत पावतात.
पशुधन व्यवस्थापन
तापमानात वाढ झाल्यामूळे,
जनावरांच्या गोठ्याच्या छतावर साळीचे गवत किंवा स्प्रींकलरची व्यवस्था करावी,
जेणेकरून गोठयाच्या आतील तापमानात घट होईल. जनावरांना सावलीत किंवा गोठ्यामध्ये
बांधावे. गोठ्यात मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी ठेवावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 54/2024
- 2025 शुक्रवार, दिनांक
– 04.10.2024
No comments:
Post a Comment