Friday, 22 August 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 24 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तर दिनांक 25 ऑगस्ट रोजी हिंगोली व नांदेड जिल्हयात तर दिनांक 26 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 22 ते 25 ऑगस्ट रोजी तूरळक ठिकाणी तर दिनांक 26 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 24 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तर दिनांक 25 ऑगस्ट रोजी हिंगोली व नांदेड जिल्हयात तर दिनांक 26 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 22 ते 25 ऑगस्ट रोजी तूरळक ठिकाणी तर दिनांक 26 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन ते तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही तर पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 22 ते 28 ऑगस्ट, 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे व दिनांक  29 ऑगस्ट ते 04 सप्टेंबर, 2025 दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

संदेश : मागील आठवडयातील दमट व ढगाळ वातावरणामूळे पिकात, फळबागेत व भाजीपाला पिकात किडींचा व रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, त्यासाठी आवश्यकतेनूसार फवारणीची कामे पावसाची उघाड बघून करावीत.  

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळी, शेंगा पोखरणारी अळी व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरांट्रानिलीप्रोल 18.5 % 60 मिली (3 मिली प्रति 10 लिटर)  किंवा इंडाक्झाकार्ब 15.8% 140 मिली (7 मिली प्रति 10 लिटर) किंवा असिटामाप्रीड 25 % + बाईफेन्थ्रीन 25 % (पूर्व मिश्रीत किटकनाशक) 100 ग्रॅम (5 मिली प्रति 10 लिटर) किंवा क्लोरांट्रानिलीप्रोल 9.3 % + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 4.6 % (पूर्व मिश्रीत किटकनाशक) 80 मिली (4 मिली प्रति 10 लिटर) किंवा आयसोसाक्लोसिरम 9.2 % 240 मिली (12 मिली प्रति 10 लिटर) प्रति एकर याप्रमाणे वरील किटकनाशकाची फवारणी प्रति एकर पावसाची उघाउ बघून आलटून-पालटून करावी. ढगाळ व दमट हवामानामूळे सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादूर्भाव दिसून आल्यास, रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट, शेंगा करपा, चारकोल रॉट आणि इतर बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65 % (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) - 500 ग्रॅम प्रति एकर किंवा टेब्युकोनॅझोल 25.9 % -250 मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% - 150 ते 200 ग्रॅम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 13.3 % + इपिक्साकोनाझोल 5 टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) -300 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारावे.

खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

उस पिकात पांढरी माशीचा व पाकोळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी, लिकॅनीसिलियम लिकॅनी या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. रासायनिक कीटकनाशकामध्ये क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 30 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 3 मिली किंवा ॲसीफेट 75 % 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारावे. इमिडाक्लोपीड 17.8% कीटकनाशकासोबत 2 टक्के युरिया (200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. ऊस पिकात पोक्का बोइंग या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्ल्यूपी 50 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 50% डब्ल्यू पी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह 10 ते 12 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या पावसाची उघाड बघून कराव्यात.

हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15 मिली प्रति 10 लिटर स्टिकरसह पाण्यात मिसळून आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. उघडै पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत व वेळेवर हळदीची भरणी करावी. हळदीवरील पानावरील ठिपके आणि करपा याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेंडेंझीम 50 %  20 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब 75 % 25 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 50 % 25 ग्रॅम प्रति प्रति 10 लिटर पाण्यात स्टीकरसह पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हळद पिकाची लागवड करून 60 दिवस झाले असल्यास 25 किलो नत्रासोबत 00:52:34 15.5 किलो व 00:00:50 5.5 किलो प्रति एकरी सूक्ष्म सिंचन पध्दतीने तीन ते चार वेळा विभागून द्यावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 25-30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत फळवाढीसाठी 00:52:34 15 ग्रॅम प्रति लिटर + जिब्रॅलिक ॲसिड 1.5 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. 

डाळींब बागेला 19:19:19 खताची मात्रा सूक्ष्म सिंचनाद्वारे द्यावे. डाळींब बागेतील अतिरिक्त फुटवे काढावेत. डाळींब बागेत रोगनाशकाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

जमिनीत वापसा असतांना चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

भाजीपाला

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात जमिनीत ओलावा व वापसा असतांना खत मात्रा द्यावी. जमिनीत वापसा असतांना भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. जमिनीत वापसा असतांना फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

तुती रेशीम उद्योग

रंशीम किटक संगोपन आणि कोष उत्पादन शेतीस पुरक उद्योग म्हणून विकसीत होत आहे. लहान व मध्यम शेतकरी मुख्य शेती व्यवसाय म्हणून स्विकारत आहेत. एक एकर तुती लागवडी करीता 82 X 23 X 15 फुट (लांबी, रूंदी व उंची) आकाराचे संगोपन गृह असावे. संगोपन गृह शिफारसीनुसार दक्षिणोत्तर असावे. पश्चिम बाजूस 6 फुट व्हरांडा आणि  6 X 4 X 3 फुट आकाराचा निर्जंतूक हौद असावा. 30 X 5 फुट आकाराचे 5 ताळी रॅक असावेत म्हणजे एकूण 750 चौ.फुट आकाराचे एक रॅक चार रॅकचे मिळून 3000 चौ.फुट क्षेत्र मिळते. त्यात 300 अंडीपूजाचे संगोपन करता येते. अशी 5 पिल्ले/एकर/वर्ष प्रमाणे कोषाचे उत्पादन घेऊन कमीत कमी एका वेळी 2 क्विंटल कोष X 5 = 10 क्विंटल/एकर कोष उत्पादन मिळते. रू. 500 किलो भावाप्रमाणे 5 लक्ष रू./एकर कोष उत्पादन मिळू शकते.

पशुधन व्यवस्थापन

गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी स्कीन रोगाचा प्रादूर्भाव अत्यंत वेगाने होत आहे. याची सर्वात जास्त झळ लहान वयातील वासरांना जाणवत असून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी नियंत्रणासाठी व त्यांची शारिरीक प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी 1) वासरांना चिक पाजावा. 2) वयाच्या सातव्या दिवशी जंतनाशक औषधीची मात्रा द्यावी. 3) महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक तत्वानूसार लसीकरण करून घ्यावे. 4)आजारी आणि निरोगी वासरे, गोधन स्वतंत्र पणे विलगीकरण करावे. 5) सर्वात महत्वाचे म्हणजे 20% सूश्रूषा व 80% काळजी (ज्यामध्ये पाणी, सकस चारा, जखमांची सुश्रुषा ईत्यादी) गोष्टी कराव्यात. 6) “माझे पशुधन माझी जबाबदारी” या सुत्रानूसार आपल्या गोवंशीय पशुधनाची या कालावधीमध्ये जास्तीत जास्त काळजी घ्यावी.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक42/2025 - 2026         शुक्रवार, दिनांक 22.08.2025

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 16 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तर दिनांक 17 सप्टेंबर रोजी बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 16 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 17 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, परभणी, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 18 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 19 सप्टेंबर रोजी जालना, परभणी, बीड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 16 ते 20 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...