Friday, 31 March 2023
दिनांक 31 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चोविस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही
व त्यानंतर पुढील चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 4 अं.से. ने वाढ होण्याची
शक्यता आहे. दिनांक 31 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तूरळक
ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40
कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 31 मार्च ते 06 एप्रिल 2023 दरम्यान व दिनांक 07 ते 13 एप्रिल 2023 दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते
सरासरीपेक्षा किंचित जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर
जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 05 ते 11
एप्रिल 2023 दरम्यान कमाल व किमान
तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता
आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
उन्हाळी तीळ पिकामध्ये फुले येण्याची
अवस्था व बोंडे धरण्याची अवस्था या सिंचन देण्यासाठी संवेदनशील अवस्था आहेत. या
अवस्थेत पाणी कमी पडल्यास उत्पादनात घट येते. मध्यम जमिनीत 8-10 दिवस व भारी जमिनीत 12-15 दिवसाच्या अंतराने सिंचन द्यावे.
सिंचन हे सकाळी किंवा संध्याकाळी शक्यतो तुषार सिंचन पध्दतीने द्यावे. काढणी
केलेल्या करडई पिकाची मळणी करून घ्यावी. मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी
साठवणूक करावी. काढणीस तयार असलेल्या व काढणी न केलेल्या हळद पिकाची काढणी करावी.
सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश
करणे ही कामे करून घ्यावी. कमाल तापमानात
झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे ऊस पिकास आवश्यकतेनूसार सकाळी
किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास
याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा
क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व
जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी संत्रा/मोसंबी फळझाडाच्या आळयात आच्छादन
करावे. बागेस सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन
पध्दतीचा अवलंब करावा. काढणीस तयार असलेल्या संत्रा/मोसंबी फळांची
काढणी करून घ्यावी. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित
राहण्यासाठी डाळींब फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. डाळींब बागेस आवश्यकतेनूसार
सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून
घ्यावी.
भाजीपाला
काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची
तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करावी. कमाल तापमानात झालेली वाढ व
वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील
ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी
देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा ठिबक) वापर करावा.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून
बाजार पेठेत पाठवावी. कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे
भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे.
पशुधन व्यवस्थापन
आपल्या पशुंना उन्हामध्ये बांधु नका
(निदान तिव्र उन्हाच्या कालावधीमध्ये त्यांना झाडाखाली/सावलीमध्ये किंवा
शेड/गोठ्यामध्येच बांधणे चांगले). पशुंना शक्यतो थंड/स्वच्छ/मुबलक पाणी दोन-तिन वेळेस
पाजावे. पाण्यामुळे पशुंच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (डीहायड्रोजन) होणार
नाही. जमल्यास पाण्यामधून क्षार द्यावेत, 5 लिटर पाण्यामध्ये चिमुटभर गुळ (25
ग्रॅम), थोडे मिठ (5-10 ग्रॅम) आणि 5 ग्रॅम क्षार मिश्रण
दिल्यास उत्तम, मात्र नजीकच्या पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच व्यवस्थापन करावे. अति
उष्ण काळामध्ये जनावरांच्या पाठीवर पोते टाकून ते पाण्याने भिजवून ठेवावे.
तुती रेशीम उद्योग
तुती बागेत तुती लागवडीनंतर जून
महिन्यात छाटणी करावी लागते. तुती लागवड पट्टा पध्दत (5X3X2 फुट) किंवा (6X3X2
फुट) असेल तर तुली छाटणी फांद्या खाद्य काढणे, वाहतूक खत टाकणे
सोईचे होते आणि सरी पध्दत लागवडी पेक्षा तुती पानाचे उत्पादन जास्त मिळते उदा.
व्हि-1 जातीचे वर्षाला 65 ते 70 मे. टन एवढे पानांचे व फांद्याचे दुप्पट उत्पादन
मिळते. जमिनीपासून 1.25 ते 1.50 फुटावरून छाटणी करावी आणि सव्वा ते दिड फुटापर्यंत
एकच झाड (वृक्ष) एकाठिकाणी राहिल याची काळजी घ्यावी. जमिनीलगत म्हणजे प्रत्येक
वर्षा खरड छाटणी करू नये. त्यामुळे काहि वर्षानंतर एका ठिकाणी 25 ते 50 शुट निघतात
आणि पानाची प्रत खालावते. दुसऱ्या वर्षापासून प्रत्येक 1.5 महिन्याला छाटणी करून
वर्षाला 8 ते 9 कोषाचे पिके घेता येतात.
सामुदायिक विज्ञान
स्वस्थ जीवनासाठी आश्यक बाबी : दररोज
संतुलीत आहार घ्या. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. आहारात साखर आणि मीठाचा वापर कमी करा. तेल आणि
मसालेदार पार्थांचा वापर कमी करा. सकाळची न्याहरी करण्यास कधीच टाळाटाळ करु नका.
जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळा.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 105/2022
- 2023 शुक्रवार,
दिनांक –
31.03.2023
Tuesday, 28 March 2023
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर पुढील तिन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर पुढील
तिन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.
मराठवाडयात दिनांक 31 मार्च ते 06 एप्रिल 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा
जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची तर किमान तापमान सरासरीपेक्षा कमी
राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर
जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 02 ते 08 एप्रिल 2023
दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त
राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या
बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे उन्हाळी भुईमूग पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील
ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी
देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा ठिबक) वापर करावा. काढणी केलेल्या
गहू पिकाची मळणी यंत्राच्या सहाय्याने करावी. मळणी करतांना दाणे फुटणार नाहीत याची
काळजी घ्यावी. मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकाची मळणी करून
घ्यावी. मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व
जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. बागेस
सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब
करावा. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी
आंबा फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. बागेस सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे
पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करावा. आंबा बागेत फळगळ दिसून येत
असल्यास 2 % 13:00:45 + एनएए 15 पीपीएम ची फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या द्राक्ष फळांची
काढणी करून घ्यावी.
भाजीपाला
काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची
तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करावी. कमाल तापमानात झालेली वाढ व
वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील
ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी
देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा ठिबक) वापर करावा.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून
बाजार पेठेत पाठवावी. कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या
वेगामूळे भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे.
पशुधन व्यवस्थापन
आपल्या पशुंना उन्हामध्ये बांधु नका
(निदान तिव्र उन्हाच्या कालावधीमध्ये त्यांना झाडाखाली/सावलीमध्ये किंवा
शेड/गोठ्यामध्येच बांधणे चांगले). पशुंना शक्यतो थंड/स्वच्छ/मुबलक पाणी दोन-तिन
वेळेस पाजावे. पाण्यामुळे पशुंच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (डीहायड्रोजन)
होणार नाही. जमल्यास पाण्यामधून क्षार द्यावेत, 5 लिटर पाण्यामध्ये
चिमुटभर गुळ (25 ग्रॅम), थोडे मिठ (5-10 ग्रॅम) आणि 5 ग्रॅम
क्षार मिश्रण दिल्यास उत्तम, मात्र नजीकच्या पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच व्यवस्थापन
करावे. अति उष्ण काळामध्ये जनावरांच्या पाठीवर पोते टाकून ते पाण्याने भिजवून ठेवावे.
सामुदायिक विज्ञान
स्वस्थ जीवनासाठी आश्यक बाबी : दररोज
संतुलीत आहार घ्या. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. आहारात साखर आणि मीठाचा वापर कमी करा. तेल आणि
मसालेदार पार्थांचा वापर कमी करा. सकाळची न्याहरी करण्यास कधीच टाळाटाळ करु नका.
जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळा.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 104/
2022 - 2023 मंगळवार,
दिनांक –
28.03.2023
Friday, 24 March 2023
दिनांक 25 मार्च रोजी धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 25 मार्च रोजी धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू 3 ते 5 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 24 ते 30 मार्च 2023 दरम्यान व दिनांक 31 मार्च ते 06 एप्रिल 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा
जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची तर किमान तापमान सरासरीपेक्षा कमी
राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी
झालेला आहे तर इतर जमिनीतील ओलावा किंचित वाढलेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 29 मार्च ते 04 एप्रिल 2023 दरम्यान कमाल व किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर
पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
काढणी व मळणी केलेल्या करडई, गहू व
रब्बी ज्वारी पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणीस तयार असलेल्या व काढणी
न केलेल्या हळद पिकाची काढणी पावसाची उघाड बघून करावी. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. हळदीची उघडयावर साठवण करू नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
काढणीस तयार असलेल्या मृगबहार फळांची
काढणी करून घ्यावी. लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% किंवा ॲझाडिरेक्टीन (10 हजार पीपीएम)
3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल
18.5 ईसी 2.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम किंवा विद्राव्य
गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी
फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे
तापमान संतुलित राहण्यासाठी संत्रा/मोसंबी, आंबा व डाळींब फळझाडाच्या आळयात
आच्छादन करावे. संत्रा/मोसंबी, आंबा व डाळींब बागेस आवश्यकतेनूसार सकाळी किंवा
संध्याकाळी पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या द्राक्ष फळांची काढणी करून घ्यावी व
सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
चारा पिके
काढणी केलेल्या ज्वारीचा कडबा सुरक्षित
ठिकाणी ठेवावा व पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण पावसात भिजल्यास
त्याची प्रत खालावून साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत.
भाजीपाला
काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची
तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. मिरची
पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड 20% एसपी 2 ग्रॅम किंवा
सायअँट्रानिलीप्रोल 10.26 ओडी 12 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जमिनीतील ओलावा
टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी भाजीपाला पिकात आच्छादन
करावे. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे.
पशुधन व्यवस्थापन
आपल्या पशुंना उन्हामध्ये बांधु नका
(निदान तिव्र उन्हाच्या कालावधीमध्ये त्यांना झाडाखाली/सावलीमध्ये किंवा
शेड/गोठ्यामध्येच बांधणे चांगले). पशुंना शक्यतो थंड/स्वच्छ/मुबलक पाणी दोन-तिन
वेळेस पाजावे. पाण्यामुळे पशुंच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (डीहायड्रोजन)
होणार नाही. जमल्यास पाण्यामधून क्षार द्यावेत, 5 लिटर पाण्यामध्ये
चिमुटभर गुळ (25 ग्रॅम), थोडे मिठ (5-10 ग्रॅम) आणि 5 ग्रॅम
क्षार मिश्रण दिल्यास उत्तम, मात्र नजीकच्या पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच व्यवस्थापन
करावे. अति उष्ण काळामध्ये जनावरांच्या पाठीवर पोते टाकून ते पाण्याने भिजवून ठेवावे.
दि. 25 मार्च रोजी तूरळक ठिकाणी वादळी
वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामूळे जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी
बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा
नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व
पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये. तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबु नये.
तुती रेशीम उद्योग
रेशीम कीटक संगोपनगृहात तापमान व
आर्द्रता उन्हाळ्यात लोखंडी पत्र्याऐवजी सिमेंट पत्रांच्या वर गवत/कडबा या सारखे
आच्छादन टाकून वरती स्प्रींकलरची व्यवस्था करून पाणी खेळते ठेवता येते. बाजूला
शेडनेटच्या बाहेरच्या बाजूस गोणपाट/चवाळ्याच्या साहाय्याने चोहिबाजूने आच्छादन
करून त्यास दोरीच्या साहाय्याने आवश्यक तेव्हा खाली वर करायची व्यवस्था ठेवता येते
व त्यावर ठिबक सिंचन 16 किंवा 20 मीमी
प्लास्टीक ट्यूब मध्ये 0.5 एच.पी. मोटारच्या साहाय्याने पाणी सोडण्याची व्यवस्था
केली तरा संगोपन गृहात आर्द्रता 80 ते 85 टक्के व तापमान 25 ते 28 सें.ग्रे. ठेवणे
शक्य होते व उन्हाळ्यात कोषाची 3 पीके काढता येतील. मराठवाडा विभागात उन्हाळ्यात
चांगला सूर्य प्रकाश मिळत असल्याने पानाचे उत्पादन ठिबक सिंचन व्यवस्था असेल तर
चांगले मिळते.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 103/2022
- 2023 शुक्रवार,
दिनांक –
24.03.2023
Tuesday, 21 March 2023
दिनांक 24 व 25 मार्च रोजी धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 24 व 25 मार्च रोजी धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.
मराठवाडयात दिनांक 24 ते 30 मार्च 2023 दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा
जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे
तर जमिनीतील ओलावा किंचित वाढलेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 26 मार्च ते 01 एप्रिल 2023 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी तर पाऊस सरासरीपेक्षा
जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
काढणीस तयार असलेल्या करडई, रब्बी ज्वार,
गहू पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. काढणी करून मळणी करावी. मळणी केलेल्या मालाची
सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. तूरळक ठिकाणी झालेल्या गारपीट व पावसामूळे काढणी
केलेले पिक भिजले असल्यास वाळल्यानंतर मळणी करावी. काढणीस तयार असलेल्या व काढणी न केलेल्या हळद
पिकाची काढणी लवकरात लवकर करावी. काढणी केलेल्या हळदीची सुरक्षित ठिकाणी साठवणूक
करावी.सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्यावी. तूरळक ठिकाणी
झालेल्या गारपीट व पावसामूळे काढणी केलेली हळद भिजली असल्यास वाळल्यानंतर साठवणूक
करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
काढणीस तयार असलेल्या मृग बहार फळांची
काढणी करून घ्यावी. तूरळक ठिकाणी झालेल्या वादळी वारा, गारपीट व
पाऊस यामूळे फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. तसेच मोडलेल्या फांद्यांची
छाटणी करून संत्रा/मोसंबी बागेत 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. तूरळक
ठिकाणी झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे आंबा बागेत रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये
म्हणून कार्बेन्डाझीम 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूरळक
ठिकाणी झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे डाळींब बागेत रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये
म्हणून कार्बेन्डाझीम 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
चारा पीके
तूरळक ठिकाणी झालेल्या वादळी वारा,
गारपीट व पाऊस यामूळे भिजलेला कडबा वाळल्यानंतर साठवणूक करावी.
भाजीपाला
काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची
तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करावी. तूरळक ठिकाणी झालेल्या वादळी
वारा, गारपीट व पाऊस यामूळे नूकसान झालेल्या भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज गोळा
करून नष्ट करावीत. तूरळक ठिकाणी झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे भाजीपाला पिकात
रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून कार्बेन्डाझीम 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून आळवणी करावी.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून बाजार पेठेत पाठवावी.
पशुधन व्यवस्थापन
आपल्या पशुंना उन्हामध्ये बांधु नका
(निदान तिव्र उन्हाच्या कालावधीमध्ये त्यांना झाडाखाली/सावलीमध्ये किंवा
शेड/गोठ्यामध्येच बांधणे चांगले). पशुंना शक्यतो थंड/स्वच्छ/मुबलक पाणी दोन-तिन
वेळेस पाजावे. पाण्यामुळे पशुंच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (डीहायड्रोजन)
होणार नाही. जमल्यास पाण्यामधून क्षार द्यावेत, 5 लिटर पाण्यामध्ये
चिमुटभर गुळ (25 ग्रॅम), थोडे मिठ (5-10 ग्रॅम) आणि 5 ग्रॅम
क्षार मिश्रण दिल्यास उत्तम, मात्र नजीकच्या पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच व्यवस्थापन
करावे. अति उष्ण काळामध्ये जनावरांच्या पाठीवर पोते टाकून ते पाण्याने भिजवून ठेवावे.
दि. 24 व 25 मार्च रोजी तूरळक ठिकाणी
वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामूळे जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी
बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा
नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व
पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये. तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबु नये.
सामुदायिक विज्ञान
नवजात शिशूची दररोज स्वच्छ व चांगल्या
प्रतीच्या खोबरेल तेलाने मालीश करावी. मालीश करतांना हाताची हालचाल एकाच दिशेने
म्हणजे ह्रदयाकडे जाणारी असावी. बाळाच्या ज्ञानेंद्रियात जसे-नाक व कान या सारख्या
अवयवांमध्ये तेल टाकणे टाळावे. बाळाच्या बेंबीचा भाग कोरडा व स्वच्छ ठेवावा.
बाळाच्या स्नानासाठी कोमट पाणी वापरावे. बाळाच्या संपूर्ण शरीरास पावडर
लावण्याकरीता पफचा (गादीचा) वापर करावा. बाळासाठी बेबी पावडरच वापरावे. बाळास पुरळ
येऊ नये म्हणून बाळाचे शौचास/लघवी केलेले कपडे त्वरील बदलावे. बाळाच्या कमरेपासून
खालच्या भागास पावडर लावून दूसरा स्वच्छ लंगोट बांधावा. बाळास झोपी घालतांना
व्यवस्थित गुंडाळून घ्यावे. बाळास काजळ, सुरमा, नख पॉलिश, टिकली इ. लावणे टाळावे.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 102/
2022 - 2023 मंगळवार,
दिनांक –
21.03.2023
Friday, 17 March 2023
दि. 17 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, धाराशीव, लातूर, नांदेड व हिंगोली जिल्हयात तर दि. 18 मार्च रोजी हिंगोली, लातूर व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार दिनांक 17 व 18 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, धाराशीव, जालना, बीड, लातूर,
हिंगोली, नांदेड व परभणी जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा
कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम
स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच दि. 17 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर,
धाराशीव, लातूर, नांदेड व हिंगोली जिल्हयात तर दि. 18 मार्च रोजी हिंगोली, लातूर व
नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 17 ते 23 मार्च 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त,
कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे तर दिनांक 24 ते 30 मार्च 2023 दरम्यान पाऊस
सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता
आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग परभणी
जिल्हयात किंचित वाढलेला आहे तर इतर जिल्हयात तो कमी झालेला आहे. मराठवाडयातील
सर्व जिल्हयात जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 22 ते 28
मार्च 2023 दरम्यान कमाल व
किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची
शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
काढणी केलेल्या हरभरा, करडई, गहू व
रब्बी ज्वारी पिकाची मळणी पावसाची उघाड बघून लवकरात लवकर करून घ्यावी. मळणी
केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी
केलेला माल ताडपत्रीने झाकून ठेवावा. काढणी/मळणी केलेला माल
पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. तूरळक ठिकाणी झालेल्या गारपीट व पावसामूळे
काढणी केलेले पिक भिजले असल्यास वाळल्यानंतर मळणी करावी. काढणी केलेल्या करडई
पिकाची मळणी पावसाची उघाड बघून लवकरात लवकर करून घ्यावी. काढणी न केलेल्या रब्बी ज्वारी
पिकाची काढणी पावसाची उघाड बघून करावी. काढणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकाची मळणी
पावसाची उघाड बघून लवकरात लवकर करून घ्यावी. काढणी केलेल्या कणसांची सुरक्षित
ठिकाणी साठवणूक करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेली कणसे ताडपत्रीने झाकून
ठेवावा. काढणीस तयार असलेल्या व काढणी न केलेल्या हळद पिकाची काढणी पावसाची
उघाड बघून करावी. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे,
वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. हळदीची उघडयावर
साठवण करू नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी
साठवणूक करावी. तूरळक ठिकाणी झालेल्या गारपीट व पावसामूळे
काढणी केलेले पिक भिजले असल्यास वाळल्यानंतर साठवणूक करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
काढणीस तयार असलेल्या मृग बहार फळांची
काढणी करून घ्यावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
तूरळक ठिकाणी झालेल्या वादळी वारा, गारपीट व पाऊस यामूळे संत्रा/मोसंबी, द्राक्ष,
आंबा बागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. संत्रा/मोसंबी बागेत मोडलेल्या
फांद्यांची छाटणी करून त्यावर 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी पावसाची
उघाड बघून करावी. तूरळक ठिकाणी झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे आंबा व डाळींब
बागेत रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून कार्बेन्डाझीम 30 ग्रॅम प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
चारा पिके
काढणी केलेल्या ज्वारीचा कडबा पावसात
भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण पावसात भिजल्यास त्याची प्रत खालावून
साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत. तूरळक ठिकाणी झालेल्या
वादळी वारा, गारपीट व पाऊस यामूळे भिजलेला कडबा वाळल्यानंतर साठवणूक करावी.
भाजीपाला
काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची
तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. तूरळक
ठिकाणी झालेल्या वादळी वारा, गारपीट व पाऊस यामूळे नूकसान झालेल्या भाजीपाला पिके,
टरबूज, खरबूज गोळा करून नष्ट करावीत. तूरळक ठिकाणी झालेला पाऊस व ढगाळ
वातावरणामूळे भाजीपाला पिकात रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून कार्बेन्डाझीम 30
ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
पशुधन व्यवस्थापन
जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू
नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास
खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती
अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये. तसेच पाऊस चालू होण्याच्या
वेळी झाडाच्या आडोशाला थांबु नये.
तुती रेशीम उद्योग
मराठवाडा विभागात हवामान उष्ण व कोरडे
(ड्रायहिट) या प्रकारचे आहे. पावसाळा या ऋतु व्यतिरीक्त हिवाळा व उन्हाळ्यात
संगोपनगृहातील आर्द्रता मर्यादित ठेवणे (म्हणजे 22 ते 28 अं.से. तापमान व आर्द्रता
80 ते 85 टक्के) आवश्यक असते. हे मराठवाडा विभागातील 98 टक्के कच्च्या शेडनेटगृहात
अवघड जात असून अडचणीचे ठरते, त्यामूळे शेतकऱ्यांनी हळूहळू सिमेंट काँक्रीटचे पक्के
संगोपन गृह बांधकाम करावे. म्हणजे आपले कोष उत्पादनात 15 ते 20 किलो प्रति 100
डीएफएलएस वाढ तर होतेच पण तापमान व आर्द्रता मर्यादित ठेवणे सोयीचे होते. 15 ते 20
वर्ष रेशीम उद्योग करणे शक्य होते.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 101/2022
- 2023 शुक्रवार,
दिनांक –
17.03.2023
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तूरळ...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 23 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालन...