हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र,
मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 26 सप्टेंबर रोजी छ. संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 27 सप्टेंबर
रोजी छ. संभाजीनगर, व जालना जिल्हयात तर दिनांक 28 सप्टेंबर रोजी जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा
वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मुसळधार पावसाची
शक्यता आहे. दिनांक 27 सप्टेंबर रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 28 सप्टेंबर
रोजी छ. संभाजीनगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग
अधिक राहून मुसळधार ते खूप मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 27
सप्टेंबर रोजी परभणी, बीड व हिंगोली जिल्हयात तर
दिनांक 28 सप्टेंबर परभणी, बीड व धाराशिव
जिल्हयात तर दिनांक 29 सप्टेंबर छ. संभाजीनगर जिल्हयात तूरळक
ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 26, 29 व 30 सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 27 व 28 सप्टेंबर रोजी बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम
स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 26 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर, 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे
ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचीत कमी व
दिनांक 03 ते 09 ऑक्टोबर, 2025 दरम्यान
पाऊस सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान
तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
संदेश : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार मराठवाडयातील दिनांक 26 ते 30 सप्टेंबर दरम्यान हलक्या ते मध्यम
स्वरूपाच्या तर तूरळक ठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता असल्यामूळे पिकात, फळबागेत,
भाजीपाला व फुल पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त
पाण्याचा निचरा करावा. तूरळक ठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता असल्यामूळे फवारणीची
कामे टाळावीत किंवा पुढे ढकलावीत किंवा फवारणीची व आळवणीचे कामे पावसाची उघाड व वापसा बघून करावीत.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीन पिकात अतिरिक्त पाणी साचणार
नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. परिपक्कव अवस्थेत असलेल्या
सोयाबीन पिकात दीर्घकाळ ओलावा राहिल्याने दाणे कुजतात आणि तपकिरी होतात. तसेच पिक वारंवार ओल्या होऊन कोरडे होत राहिल्यास शेंगा तुटणे, फुटणे असा समस्या
होतात. प्रदीर्घ ओलाव्यामुळे कोंब फुटतात तर पिकाची गुणवत्ता लक्षणीयरीत्या कमी होते. ढगाळ व दमट हवामानामूळे उशिरा पेरणी केलेल्या सोयाबीनमध्ये रोगाचा प्रादूर्भाव दिसून आल्यास, रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट, शेंगा करपा, चारकोल रॉट आणि इतर बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव
दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65 % (पूर्वमिश्रित
बुरशीनाशक) - 500 ग्रॅम प्रति एकर किंवा टेब्युकोनॅझोल 25.9 % -250 मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन
20% - 150 ते 200 ग्रॅम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 13.3 % + इपिक्साकोनाझोल 5 टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) -300 मिली प्रति
एकर पावसाची उघाड बघून फवारावे.
कापूस पिकात अतिरिक्त पाणी साचून राहणार
नाही याची काळजी घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. आकस्मिक मर किंवा मूळकूज
दिसू लागल्यास 200 ग्रॅम युरिया+
100 ग्रॅम पांढरा पोटॅश
(00:00:50 खत )+25 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड 100 मिली याप्रमाणे आळवणी करावी. वरील प्रमाणे द्रावणाची आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची
माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी. सध्याच्या अवस्थेत सततचे ढगाळ वातावरण, हवेतील अति आर्द्रता व रिमझिम पाऊस कापूस पिकात आंतरिक बोंड सड दिसून
येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराइड
50% - 25 ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणे मिसळून
फवारणी करावी. बाह्य बोंडसड रोखण्यासाठी, पायराक्लोस्ट्रोबीन
20% - 10 ग्रॅम किंवा मेटीराम 55% + पायराक्लोस्ट्रोबीन 5% (पूर्व मिश्रित बुरशीनाशक)-
20 ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल 25% - 10 मिली किंवा ॲझोक्सिस्ट्रॉबीन 18.2% + डायफेनोकोनॅझोल
11.4% (पूर्व मिश्रित बुरशीनाशक) - 10 मिली किंवा प्रोपीनेब 70% - 25 ते 30 ग्रॅम प्रति
10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तूर पिकात अतिरिक्त पाणी साचून राहणार
नाही याची काळजी घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. सततच्या पावसामुळे जमिनीत
साचलेल्या पाण्यामुळे किंवा ओलाव्या मुळे तूर पिकात फायटोप्थेरा रोग मोठ्या प्रमाणात
पसरतो, प्रादूर्भाव
दिसून आल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी 500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात)
मेटालॅक्झील एम 4 टक्के + मॅन्कोझेब 64 टक्के (पुर्व मिश्रीत
बुरशीनाशक) प्रति एकर या प्रमाणात खोडावर आणि झाडावर फवारणी करून आळवणी पण करावी. किंवा
ट्रायकोडर्मा 500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात)
पाण्यात मिसळून प्रति एकर या प्रमाणात पावसाची उघाड बघून फवारणी व आळवणी करावी.
खरीप ज्वारी पिकात अतिरिक्त पाणी साचणार
नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
ऊस पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही
याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
हळद पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही
याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा वेळोवेळी निचरा करावा जेणेकरून कंदकुज होण्यास कारणीभूत असलेल्या बुरशीचा प्रसार कमी करता
येईल. कंदकूजचा प्रादूर्भाव
दिसून आल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी जमिनीतून कार्बेडेंझीम 50% -200 ग्रॅम (10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात)
किंवा मॅन्कोझेब 75% -600 ग्रॅम (30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड
50% -1000 ग्रॅम (50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकरी या प्रमाणात दरवेळी महिन्यातून
एकदा आळवणी करावी. (आळवणी करताना जमिनीमध्ये
वापसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास पाण्याचा थोडा ताण द्यावा.)
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी बागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी
व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. संत्रा/मोसंबी बागेत फळवाढीसाठी 00:52:34 1.5किलो + जिब्रॅलिक ॲसिड 1.5
ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
डाळींब बागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व
अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. डाळींब बागेत 00:00:50 1.5 किलो प्रती 100 लिटर
पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. डाळींब बागेतील अतिरिक्त फुटवे
काढावेत.
चिकू बागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व
अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून
घ्यावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व
अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून
घ्यावी.
फुलशेती
फुल पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व
अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून
घ्यावी.
तुती रेशीम उद्योग
भरपूर रेशीम उद्योजक शेतकरी तूती बागेस पशूधन व शेणखत उपलब्ध
नसल्यामूळे देण्याचे टाळत आहेत आणि पर्यायी बाजारात उपलब्ध जाहिरातीच प्रभावामूळे
तुती बागेत इतर निविष्ठा देत आहेत. जमिनीची प्रत खराब होण्यामध्ये मोठ्या
प्रमाणावर जबाबदार रासायनिक खतच आहेत. नऋयुक्त खताच्या अनिर्बंध वापर वाढला असून
त्यामूळे कपाशी, सोयाबीन सारखे पीके किडीस बळी पडत आहेत. रेशीम किटक संगापनानंतर
तुतीची पाने, फांद्या, रेशीम कीटक विष्ठा प्रती एकर 6 टन तर हेक्टरी 15 टन पर्यंत
शिल्लक राहते. त्यापासून कंम्पोस्ट खत किंवा गांडूळखत तयार करता येतो त्यासाठी 16 X 8 X 4 फुट आकाराच्या दोन खड्डयात 6 महिने तुतीचे
शिल्लक अवशेष कुजवल्यास उत्तम प्रकारचा खत तयार होतो.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळयात पशुचे खाद्य नियोजन व्यवस्थित ठेवावे व जनावरांचे खाद्य
स्वच्छ व कोरडे असावे. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात
भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 52/2025
- 2026 शुक्रवार, दिनांक
– 26.09.2025
No comments:
Post a Comment